जळगाव : प्रतिनिधी मैत्रीणीसोबत शिरसोली रस्त्यावरील कुरुक्षेत्र टर्फ परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दि. ७ रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य विलास चेके (वय २२, रा. श्रीधरनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित शेख रोशन शेख उस्मान (रा. तांबापुरा) याने आदित्य व त्याच्या मैत्रीणीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता संशयिताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर आदित्य चेके यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि ९ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या धाकट्या भावाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल. या राशीचे प्रेमी आज भेटवस्तूंची देवाणघेवाण करतील, ज्यामुळे त्यांचे प्रेम द्विगुणित होईल. लोखंड व्यवसायात असलेल्यांना आज लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. आज अनावश्यक वाद टाळा. ताणलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मेष राशी आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या धाकट्या भावाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) संघटनेत जळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षा पदावर नव्या नेतृत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले. या नियुक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा व महासंसदरत्न खा.मा. सुप्रियाताई सुळे, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजीयाताई खान, माजी मंत्री मा.आ. जयंतराव पाटील साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे, महिला संघटना अधिक सक्रिय करणे, तसेच पक्षबांधणीसाठी प्रभावी काम करणे, अशी…
मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेपासून त्यांच्या मृत्यूवर विविध पातळ्यांवर संशय व्यक्त केला जात असून, आमदार अमोल मिटकरी सातत्याने या प्रकरणात चौकशीची मागणी करत आहेत. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणात नवे गंभीर मुद्दे उपस्थित केले. मिटकरी यांनी सांगितले की, अजित पवार ज्या…
शेगाव : वृत्तसंस्था संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा अक्षरशः महासागर लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भजनी दिंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत ७५० हून अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. दिंड्या येण्याचा ओघ अद्याप सुरूच असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षी २०२५ मध्ये श्रींच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त सुमारे ७०० भजनी दिंड्यांनी शेगाव गाठले होते. मात्र यंदा ७ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंतच दिंड्यांची संख्या ७५० च्या पुढे गेली असून, भाविकांचा उत्साह दुपटीने वाढलेला दिसून येत आहे. गतवर्षी सुमारे १ लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले होते. यंदा दर्शनासाठी…
जळगाव : प्रतिनिधी यावल-रावेर रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीजजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (रा. महाराणा प्रताप नगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी ७ फेब्रुवारी पहाटे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकलने (एमएच १९ डिक्यू ३७०६) रावेरकडून यावलकडे येत होता. यावल शिवारातील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या मालिकेला अखेर ब्रेक लागला असून, सोने व चांदीचे दर विक्रमी पातळीच्या खाली आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत सोन्याचे दर तब्बल २३ हजार रुपये, तर चांदीचे दर १ लाख ३८ हजार रुपयांनी घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी चढ्या भावात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेत काही प्रमाणात घट झाल्याचे संकेत मिळत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल कमी झाला आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या दरांमध्ये होत असलेली दिवसागणिक वाढ थांबली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मौल्यवान धातूंनी उच्चांक गाठला…
आजचे राशिभविष्य दि.८ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमची नियोजित कामे स्वतःहून पूर्ण करू शकाल. अनेक बाबींवर तुमच्या मनात काही नवीन आणि सकारात्मक कल्पना येतील. तुमचे शब्द तुम्हाला सर्वकाही पूर्ण करण्यास मदत करतील. तुम्ही तर्कशुद्ध बोलाल. आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. बेरोजगारांना आज नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. संगीताशी संबंधित संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हा शुभ दिवस आहे. वृषभ राशी प्रेमातील जोडीदारांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला आहे. कॉलेजमधील तुमच्या चांगल्या कामगिरीने तुमचे शिक्षक खूश होतील. आज तुमचे आरोग्य खूप चांगले असेल. आज नशीब तुमच्या बाजूने…
मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळाजवळ धावपट्टीवर विमान कोसळले आणि यात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्यामुळे सरकारने सखोल चौकशीचे आदेश दिले. सीआयडीने अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सविस्तर चौकशी चार तासांपेक्षा जास्त वेळ चालवली. चौकशीत बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचा आराखडा, विमान प्रवासाची तयारी आणि अपघाताच्या अगोदर झालेल्या चर्चांचा तपशील नोंदवण्यात आला. सीआयडी…
फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक जण व्हॅलेंटाइन वीकच्या तयारीला लागतात. कारण हा आठवडा आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो. व्हॅलेंटाइन वीक म्हणजे फक्त गिफ्ट्स देणं-घेणं नाही, तर आपल्या मनातल्या भावना पार्टनरपर्यंत पोहोचवण्याचा एक खास मार्ग आहे. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा प्रेमाचा आठवडा आपल्या भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी उत्तम ठरतो. याच काळात आपण आपल्या पार्टनर, क्रश किंवा लाइफ पार्टनरसाठी ते आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत, हे दाखवू शकतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर चला जाणून घेऊया, 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक खास दिवस कसा अधिक खास आणि लक्षात राहणारा बनवता येईल. 7…

