धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात सोमवारी रंगपंचमीचा सर्वत्र उत्साह सुरु असतांना एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जितेंद्र माळी (20, रा.लोहार गल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रंगपंचमी खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर मित्रांसह पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून काढण्यात यश आले. दरम्यान, रंगपंचमीच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे धरणगावात सर्वत्र हळहळ…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी वाहनातून देशी विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या इसमास पोलिस पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या वाहनातून देशी- विदेशी दारू, बिअर व वाहन असा एकूण ५ लाख १८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनतर्फे नाकाबंदी करण्यात आली. २३ रोजी ७:३० वाजेच्या सुमारास पोनि. संदीप पाटील, योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार,…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील सत्रासेन गावाच्या हद्दीत अज्ञात इसम अवैधरीत्या गावठी पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत शनिवारी रात्री उशिरा एका आरोपीला 5 अटक केली आहे. त्याच्याकडून कट्टा, काडतूस, बुलेट आणि रोख रक्कम असा मिळून १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित दिवाकर वाघमारे (२४, माळीचिचोरे, ता. नेवासा, जि.अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रोहित हा गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता सापळ लावण्यात आला. त्याच्याकडून त्यास २५ हजार रुपय किमतीचे गावठी पिस्तूल, ३ हजान रुपये किमतीची तीन जिवंत काडतूसे…
जळगाव : प्रतिनिधी चालत्या रिक्षामध्ये त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबवताच रिक्षातून खाली पडून संजय आधार शिंपी (५५, रा. अर्जुन नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, २४ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. शिंपी यांचा मृत्यू नेमका उष्माघाताने की हृदयविकाराने झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन नगरमधील रहिवासी असलेले संजय शिंपी हे रिक्षाचालक होते. रविवारी दुपारी ते बसस्थानकाकडून जिल्हा क्रीडा संकुलाकडे रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३१६७) घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांना त्रास होऊ लागला त्या मुळे त्यांनी रिक्षा थांबवली व काह क्षणातच ते खाली कोसळले. शिंपी यांचा…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाड या गावात रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाच जण उमेश एकनाथ धनगर यांच्या पान टपरीत चोरी करत असल्याचे नागरिकांचे निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी आरडाओरड करून टपरीकडे धाव घेतली असता चार जण पसार झाले तर फैजान उर्फ दानिश खान अरिफ खान (वय १९, रा. तांबापुरा, जळगाव) याला नागरिकांनी पकडून पान टपरीत बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार, यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार चाकूसह एक हत्यार, मोटरसायकल व एक मोबाइल असा ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तरुणाने व त्याच्या साथीदारांनी गोकूळ नेवे उर्फ छोटूबाबा यांच्य घरातूनदेखील साहित्य…
अमळनेर : प्रतिनिधी होळीच्याच दिवशी घराला आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. ही दिलीप पाटील दुर्दैवी घटना पिंपळी (ता. अमळनेर) येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव पाटील, असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या पत्नी संगीता दिवा लावता असतानाच घरात अचानक आग लागली अन् त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोटही झाला. घराचे लाकडी छता आणि कापूस यामुळे आग पसरली दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा विकी आणि नात खुशी तातडीने घराबाहेर पळाले. मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कौटुंबिक स्तरावर तुमचा आनंद वाढू शकतो. तुमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे लोक आज नेहमीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतील. तुमच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. या राशीचे व्यापारी जर नवीन कामात पैसे गुंतवत असतील तर त्यांना फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर तुम्हाला समाधान वाटेल. कला क्षेत्राशी निगडित लोकांना सन्मान मिळू शकतो. मिथुन आज तुमचा दिवस चांगला जाईल. या राशीचे व्यापारी आजचा दिवस स्वतःसाठी अनुकूल करण्यात व्यस्त राहतील. नशीबाची साथ मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागू शकतो. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. घरातून निघताना आई-वडिलांचा…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर पोलिसांकडून सात ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अवैधरित्या गावठी दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत पथक तयार करुन पोलिसांनी दि. २२ रोजी गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांसह विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली. यामध्ये जामनेर तालुक्यातील महुखेडा, वाडी शिवार, गोंडखेल शिवार याठिकाणी कारवाई केली. या कारवाईत हजारो लिटर गावठी हातभट्टीची दारु, कच्चे रसायन व पक्के रसायन असा…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील यांनी धरणगाव येथील निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी अधिकारी धर्मेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेऊन पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याबद्दल तक्रार केली व तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केली असून सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतांना जनतेकडून सेतू सुविधा केंद्रावरून या योजनेअंतर्गत अवजारे खरेदीसाठीच्या नावाने पंधरा हजार रुपये मिळण्यासाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळणार या आशेने जनतेने गावागावात सेतू सुविधा केंद्रावर गर्दी केली आहे. हे आदर्श आचारसंहितेचे सरळसरळ उल्लंघन असून मतदारांनी सत्तापक्षाला…
चाळीसगाव : प्रतिनिधी ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना शनिवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याची घटना तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे घडली आहे. या आगीत संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, पैसे आदी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी कामगार काही महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. हे कामगार शुक्रवारी घरी परतले. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या झोपड्यांना आग लागली. कुटुंबातील सर्वजण दुपारी जेवण करून बाहेर झोपले होते. आगीत झोपड्या जळून खाक झाल्याचे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते. आग इतकी भीषण…

