जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जळगाव लोकसभा मतदार संघातील जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर केली. जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी कल्पना पाटील, भूषण सोनवणे, विजय पाटील, डॉ. अशोक पाटील, रमेश पाटील, अनिल शिसोदे, शेख अल्लाउद्दीन शेख चिराउद्दीन, राजधर ठाकरे, डॉ. सुरेश पाटील यांची तर जिल्हा सरचिटणीस म्हणून यशवंत पाटील, धर्मराज पाटील, रणजीत पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. भगवान पाटील विशाल महाजन, निंबा पाटील, शिवाजीराव पाटील, प्रकाश महाजन यांची तर चिटणीसपदी रमेश पाटील, किशोर पडोळ, भाईदास महाजन, संजय राठोड, कैलास पाटील, मुश्ताक अहेमद…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी सुखनाथ महाराजांचा दर्शन घेवून परतणाऱ्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता धरणाव चोपडा रस्त्यावर घडली. या अपघातात युवराज काशिनाथ महाजन (वय ५०, रा. विखरण, ता. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले मच्छिंद्र सिताराम पाटील (वय ५०, रा. विखरण) हे गंभीर जखमी झालेल्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्डी येथे सुखनाथ महाराजांचा भंडार असल्याने एरंडोल तालुक्यातील विखरण येथील युवराज महाजन व मच्छिंद्र पाटील हे (एमएच १९, ४४९०) क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपून ते माघारी येत असतांना धरणगाव चोपडा रस्त्यावरील…
चाळीसगाव : प्रतिनिधी भरधाव बसने कारला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर १४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात देवळी गावानजीक मंगळवारी दुपारी घडला. काही जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन गंभीर रुग्णांना धुळे तर एकाला मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. शरद वासू माळी (३२) व शेख रेहमान शेख बाबू (४०, दोन्ही मालेगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव आगाराची बस क्रमांक (एमएच १४ बीटी ०३७५) ही • मंगळवारी दुपारी चाळीसगाववरून मालेगावकडे सुसाट वेगाने जात असताना देवळीजवळील वळणावर कार (एमएच ०४ सीटी २४९२) वर समोरून आदळली. अपघातात कार चालकासह एका…
जळगाव : प्रतिनिधी पती व सासरे धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना, घरी असलेल्या जयश्री अमित महाजन (२३, रा. नशिराबाद) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २५ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. तीन वर्षाच्या बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी व्यवसाय करणारे अमित महाजन हे त्यांच्या वडिलांसह एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे गेले होते. त्यामुळे जयश्री या तीन वर्षीय मुलीसह घरी होत्या. गल्लीतील मुले धूलिवंदन साजरे करत असताना, जयश्री महाजन यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा रडायचा आवाज आल्याने शेजारील मंडळींनी घरात पाहिले असता, विवाहितेने गळफास घेतल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका दुचाकीच्या अपघातात एक तरुण ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला. नशिराबाद पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश गणेश सावंदे (वय ३१, रा. चिंचोली, ता. यावल ह. मु, तुरखेडा, ता जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे. नीलेश सावंदे हा तुरखेडा येथे वीटभट्टीवर मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. सोमवारी रात्री तो मित्र प्रदीप पंडित (२९) याच्यासोबत चिंचोली येथून घरी तुरखेड्याकडे जात होता. नशिराबाद उड्डाणपुलाजवळ आले असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. प्रदीप पंडित याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू…
यावल : प्रतिनिधी शहरातील रेणुकादेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय दिव्यांग इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली. पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबविले. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आणि शवविच्छेदन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकादेवी मंदिरजवळ बाळू लक्ष्मण वाणी (वय ४५) याने घरात गळफास घेतल्याचे समोर आले. मात्र, त्याच्यावर अंत्यविधी होण्याआधीच पोलिसांनी स्मशानात जाऊन हा अंत्यविधी थांबविला आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला व त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी नीलेश नारायण वाणी यांनी पोलिसात माहिती दिली. त्यानुसार, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस…
मेष आजचा दिवस चांगला जाईल. विनाकारण सुरू झालेले अडथळे संपतील. आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे मन प्रसन्न राहील. अचानक काही धार्मिक कार्यात मदत करण्याची संधी मिळेल. जे केल्याने तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा जाणवेल. मुले त्यांच्या मनातील भावना त्यांच्या पालकांना सांगतील. त्यामुळे तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. आज तुमची परदेशी कंपनीशी भागीदारी होऊ शकते. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात होईल. शेजाऱ्यांचे काही सामाजिक कार्यात सहकार्य मिळेल. यामुळे लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. कौटुंबिक संबंध दृढ होतील. नोकरीच्या…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कंडारी रायपूर परिसरातील वाघूर धरणात रंगपंचमी खेळून झाल्यावर पोहायला गेलेला तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २५ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दि. २६ मार्च रोजी २४ तासांनी दुपारी १ वाजता मिळून आला आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील रोहित कैलास पाटील (वय १८) असे मयत इसमाचे नाव आहे. तो कुसुंबा गावात आई, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात तो कामाला होता. सोमवारी दि. २५ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त गावात तरुणांनी होळी खेळली. त्यातील काही तरुण हे पोहण्यासाठी कंडारी-रायपूर…
मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूक अनुषंगाने राज्यात आम्ही एकत्रित चर्चा करून राज्यात 48 जागांबाबत कोणी कोणती निवडणूक लढवणार आहोत, याबाबत 99 टक्के काम झाले आहे. 28 मार्च रोजी मुंबईत एकत्रित सर्व जागा घोषित होतील. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे निवडणूक लढवणार आहेत. विविध घटक पक्ष एकत्रित येऊन आम्ही राज्यातील सर्व जागा लढवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, संजय बनसोडे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटील हे 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून…
धरणगाव : प्रतिनिधी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात विखरण येथील 55 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला तर दुचाकीवरून एक जण गंभीर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. युवराज महाजन (55, रा.विखरण, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ युवराज महाजन हे दुचाकी (एम.एच.19-4490) वरून सहकार्यासोबत जात असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. अपघातानंतर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन आदींनी धाव घेत जखमीला उपचारार्थ हलवले.

