Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी कोयता घेऊन दहशत पसरवत असलेल्या गजानन उर्फ गणेश रवींद्र चौधरी (वय १९, रा. शनिपेठ) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार दि. ३० मार्च रोजी पहाटे रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना रेल्वे स्थानक परिसरात एक जण कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या वेळी पथकाने तेथे जाऊन गजानन चौधरी याला अटक केले. त्याच्या जवळ आढळून आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

चोपडा : प्रतिनिधी गेरूघाटी ते वैजापूर रोडवरील न वनविभागाच्या नाक्याजवळ अवैधरीत्या गावठी पिस्तूल व एक न जिवंत काडतूससह संशयिताला चोपडा क ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रेहमल जेमल पावरा (३३, जिरायत पाडा, पो. मेलाने, ता. चोपडा) असे न संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ३:३० वाजता रेहमल हा विना नंबर प्लेटच्या वे दुचाकीवरून जात होता. रेहमलला थांबवून विचारपूस केली असता त्याच्याकडे एका गावठी पिस्तूलसह न काडतूस मिळून आले. गावठी बनावटी कट्टा, काडतूस, न दुचाकी असा एकूण ७६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पोकॉ. चेतन सुरेश महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माहेराहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी करत तसलीनबी शेख जाबाज (२१) या विवाहितेच्या तोंडात मुंग्या मारण्याचे औषध टाकून सासरच्या मंडळींनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार, २९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या तसलीनबी शेख यांचा विवाह जळगावातीलच जाबाज शेख सलीम याच्याशी झाला. माहेराहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी विवाहितेकडे केली जाऊ लागली. विवाहितेने पैसे आणले नाहीत म्हणून पती जाबाज शेख आणि सासू समन्नुख शेख यांनी शिवीगाळ व मारहाण करत विवाहितेच्या तोंडात मुंग्या मारण्याचे…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी आमोदा येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री जुगारावर धाड घालून दोघांना ताब्यात घेतले. मेहबूब नबाब तडवी व तुषार दिनकर चौधरी (दोघ रा. आमोदा) अशी आरोपींचे नावे आहेत. दोघांकडून २६३० रोख व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा-बामणोद येथे गेल्या काही दिवसापासून सट्टा जुगार जोरात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने शुक्रवारी रात्री आमोदा बसस्थानकाच्या जवळ टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाड घातली. यात सट्टा घेताना मेहबूब तडवी याला ताब्यात घेतले यावेळी तुषार चौधरी जुगार खेळविताना आढळून आला. स्थानिक गुन्हा शाखेचे महेश महाजन यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभियंता असलेले संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी संजय ब्राह्मणे जाहीर करण्यात आली आहे. रविवारी पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातील घोषणा केली. ब्राह्मणे हे बी. ई. सिव्हिल झाले आहेत. ते नंदुरबार येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. मूळचे धुळे येथील रहिवासी असलेले ब्राह्मणे हे सध्या भुसावळात वास्तव्यास आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सन २०१४ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा निवडणक लढविली होती

Read More

मेष स्वतःसाठीही थोडा वेळ घालवा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमच्या जबाबदाऱ्या वाटून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ दिल्याने तुम्हाला अपार आनंद आणि आध्यात्मिक शांती मिळेल. वृषभ तुमच्या आवडीनुसार कामांमध्ये वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे मानसिक शांतीही मिळेल. आता तुम्ही मनाच्या आवाजाला प्राधान्य द्या, तुम्हाला नवीन संधी मिळतील. जे भविष्यात फायदेशीर ठरेल. मिथुन दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी येतील. पण दुपारनंतर परिस्थिती तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल. हितचिंतकांची मदत तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि युवकही त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय आणि गंभीर होतील. कर्क आज तुम्हाला फोनद्वारे किंवा नातेवाईकाकडून महत्त्वाची माहिती मिळेल.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. फेब्रुवारी 2024 मध्ये अडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा झाली तेव्हा त्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. अडवाणी म्हणाले की, ‘आज मला मिळालेला भारतरत्न मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. यामध्ये सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक 02 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी भंडाऱ्यातून समोर आली आहे. चारचाकीची दुचाकीला धडक बसल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तुमसर मार्गावरील खापा येथील घटना असून पती-पत्नीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर कार पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. अपघातात भोजराम कोल्लू राणे (५५) तर रत्ना भोजराम राणे (५०) रा.सालई खुर्द अशी मृतकांची नावे आहेत. तुमसर तालुक्यातील सालई खुर्द येथील भोजराम राणे आपल्या पत्नी रत्ना यांच्यासह मोटारसायकलने तुमसर येथे एका नातेवाईकाकडे गेले होते. त्यांना भेटून आपल्या गावाकडे परत जात असताना खापा शिवारात विरूद्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मध्यस्थीच्या माध्यमातून झालेल्या विवाहानंतर अडीच महिने संसार केल्यानंतर माहेरी गेलेली नववधू बेपत्ता झाल्याची घटना घडली. लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्यांसोबत संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये वरपक्षाची अडीच लाखात फसवणुक झाली असून याबाबतची तक्रार एमआयडीसी पोलिसात दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, समाजात मुलींची संख्या घटत असताना उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढत असल्याने तरुणांच्या लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दलालांच्या माध्यमातून व ओळखीतून मुलीकडील व्यक्तींना पैसे देऊन लग्न लावले जात असल्याने तालुक्यातील बिलवाडी येथे असाचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावातील समाधान पंढरीनाथ पाटील या तरुणाचा विवाह मध्य प्रदेशातील निर्मला पावरा या तरुणीशी…

Read More