Author: editor desk

यावल : प्रतिनिधी यावल ते फैजपूर रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ अचानक दुचाकीने सोमवारी दुपारी पेट घेतला. सुदैवाने प्राणहानी टळली. सविस्तर वृत्त असे कि, मनीषा संजय महाजन (४०, रा. फैजपूर) या आपल्या दुचाकीने १ रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजेच्या दरम्यान यावलकडून फैजपूर येथे जात असताना सांगवी पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दुचाकी अचानक जाम झाली. यामुळे थांबून पाहणी करीत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला व जळून खाक झाली. यावेळी जवळच असलेल्या रसवंती चालकाच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुचाकी धावत असताना आग लागली असती तर इजा पोहोचू शकली असती. दरम्यान अचानक पेटलेली दुचाकी पाहून या मार्गावरुन येणारे जाणारे वाहनचालकही थांबून घडला…

Read More

बोदवड : प्रतिनिधी मुक्ताईनगर रस्त्यावरील नाडगाव शिवारात दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. दि. १ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात दुचाकीवरील श्रीकांत ऊर्फ बबलू वंजारी व राजेंद्र हरी खराटे (वय ३५, दोन्ही रा. वंजारीवाडा, बोदवड) हे गंभीर जखमी झाले. सविस्तर वृत्त असे कि, नाडगाव येथील धनराज गायकवाड यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु ग्रामीण रुग्णालयात असलेल्या १०२ व १०८ या दोन्ही रुग्णवाहिकांवर चालक नसल्याने जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून भुसावळला उपचारासाठी हलविण्यात आले. १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेले सोपान राणे हे कर्तव्यावर असूनसुद्धा वेळेवर आले नाहीत. यामुळे नगराध्यक्ष आनंद पाटील यांच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येने रुग्णालयात आले होते व तणाव…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी चोपडा येथील प्रियकर व प्रेयसी अशा दोघांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेप तर वकिलासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अमळनेर येथील न्या. पी. आर. चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा, चोपडा) व वर्षा समाधान कोळी (२०, रा. सुंदरगढी, चोपडा) अशी मृत प्रियकर आणि प्रेयसीची नावे आहेत. १२ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा येथे खुनाची घटना घडली होती. घटनेच्या दिवशी राकेश हा वर्षा हिला पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील काही जणांनी त्यांना मोटारसायकलने वराड रस्त्यावर नेले. तिथे एका अल्पवयीन मुलाने गावठी पिस्तूलने राकेशच्या डोक्यात गोळी घातली.…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था नवापूर तालुक्यातील खर्डीबर्डी येथील सासुरवाडीला पत्नीला न्यायला आलेल्या पती आणि त्याच्या आई-वडिलांना पत्नीच्या माहेरच्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. उमेश वामन देसाई (रा. टेंभे ता. साक्री) असे मारहाण झालेल्या पतीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, उमेशचा विवाह खर्डीबर्डी गावातील अश्विनीसोबत झाला होता. त्यानंतर वाद झाल्याने अश्विनी ही माहेरी आली होती. शनिवारी उमेश व त्याच्या आई- वडिलांनी अश्विनी हिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यातून वादावादी झाली. विवाहितेचे वडील सुक्या गावित (५०) यांच्यासह गावातील इतर नातेवाइकांनी मिळून उमेश व त्याच्या आई-वडिलांना मारहाण केली. याप्रकरणी उमेश देसाई यांनी नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या…

Read More

मेष नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. काही भावनिक आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींना साथ द्याल. आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. मीडिया कम्युनिकेशनच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील. एखाद्या सुंदर ठिकाणी सहलीला जाऊ शकता. प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुम्हाला जीवनात महत्त्वाचे बदल दिसतील. विद्यार्थ्यांची सर्जनशील कार्याची आवड वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. ज्यामुळे तुमच्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक बळ मिळेल. कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळासखेडे येथे अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करत पतीचा खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत किशोर शिवाजी पाटील वय ४५ यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या पत्नी पुष्पा पाटील हिच्या सोबत वास्तव्याला होते. दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे अनेक वेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते.…

Read More

जळगाव-प्रतिनिधी  सध्या सुरू असलेल्या अतिशय कडक उन्हात आपल्याला जर कुठे मनोरंजनासह धमाल मस्ती करायची असेल तर आपल्यासाठी एकमेव गारेगार पर्याय म्हणजेच शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्ट असल्याची माहिती याचे संचालक नीरज जेसवानी यांनी दिली. ते याबाबत आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरसोली रोडवर अनुभूती स्कूलच्या मागे, पाचदेवी माता मंदिराजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सीझन मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याच्या होळी धमाका महोत्सवाला देखील उदंड प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती देण्यासाठी या वॉटरपार्कचे संचालक नीरज जेसवानी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. याप्रसंगी त्यांनी सर्वप्रथम खान्देशातील जनतेकडून मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादाबाबत आभार व्यक्त केले.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात आता चांगलेच उन तापायला लागले आहे. त्यामुळे अनेक लोक न्हाळ्याची सुट्टी लागली की, बाहेर फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे अनेकांना फिरण्याची आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिपचा प्लान करतो. यंदाच्या एप्रिल महिन्यात तुम्हाला फिरायचे असेल तर IRCTC ने भन्नाट टूर प्लान आणला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत देवदर्शनाचा प्लान करु शकता. जाणून घेऊया टूर प्लानबद्दल सविस्तर पॅकेजचे नाव – “मानखंड एक्सप्रेस – भारत गौरव टुरिस्ट ट्रेन” पॅकेज कालावधी – 10 दिवस आणि 11 रात्री टूर पॅकेज तारीख – २२ एप्रिल प्रवास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल येथील एका शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतले परंतु पावसाचा लहरीपणामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे आता कर्जफेड कशी करायची याची विवंचना होती. यातूनच शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील भगवान गंभीर महाजन (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी, दोन मुले, आई, भाऊ यांच्यासह गावात वास्तव्यास होते. शेती काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु उत्पन्न चांगले न आल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. यामुळे भगवान महाजन हे सतत विचारात राहत…

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक घटना महाबळेश्वर तालुक्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. कोयना विभागातील वाळणे गावातील कोयना जलाशयात पोहायला गेलेल्या ३ मुली बुडाल्या होत्या. त्यातली दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका मुलींना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व मुली १२ ते १३ वयोगटातील असून वाळणे गावावर शोककळा पसरली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्या होत्या. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू…

Read More