जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीने नाव जाहीर केल्यानंतर भाजपाच्या उमेदवार बदलीची चर्चा सुरु असतांना आता रावेर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील हे १४ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर आज शरद पवार गटातर्फे रावेर लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात येणार असून त्यांचे नाव रावेर…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी निंबोल येथील श्रीकृष्ण केला चिप्स फॅक्टरीतील पाच लाख रुपयांच्या विविध यंत्रांची चोरी झाल्याची फिर्याद मालक नीरज सुनील पाटील यांनी दिली होती. मात्र विम्याच्या रकमेसाठी हा चोरीचा बनाव नीरज पाटील (वय २४) यानेच रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि, नीरज पाटील याने चिप्स फॅक्टरीवर पाच लाखांचा विमा काढला होता. या रकमेचा फायदा घ्यावा यासाठी त्याने दोन नोकराच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि चोरी केली. त्यानंतर स्वतः पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे कारवाई केली. त्यात नीरज पाटील, उमेश शांताराम…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील नागदुली येथील एका मजुराचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नागदुली येथील समाधान साहेबराव महाजन (१९) हा मजूर खेडगाव तांडा येथे देवराम पवारस यांच्या घराच्या सेंट्रिंगचे काम करीत होता. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान हा तीन वर्षांपासून सेंट्रिंग कामावर मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, दोन चुलते असा परिवार आहे. या परिवाराची घरची…
सावदा : प्रतिनिधी राज्यभर उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना अशीच एक घटना सावदा शहरात लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, सावदा बस स्थानकाजवळ दुकाने आहेत. त्यातील एका गॅरेजमधून धुराचे लोट निघू लागले असता नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली होती. सावदा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली. दरम्यान, या आगीत दोन्ही दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले होते. या ठिकाणी जवळपास २० दुकाने एकमेकांना लागून आहेत. मात्र, सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठे…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या १५ वर्षीय मुलाचा झटके आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमन मनोहर निकम (१५, रा.चिंचखेडा, ता. चाळीसगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अमन हा पोहण्यासाठी आला. त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र काही वेळात पाण्यातच त्याला झटके येत असल्याचे गार्ड मधुकर चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज देत इतर गार्डच्या मदतीने अमनला बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी तलावाचे…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदलून व्यवस्थित राहिल्यास तुमचे काम लवकर पूर्ण होईल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरच्या समस्या अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मदतीने सोडवाल. काही प्रतिकूल परिस्थितीही निर्माण होईल. आज कोणाशी वाद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कोणताही छोटा-मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांनी आपला मौल्यवान वेळ सोशल मीडियावर वाया घालवू नये.जर तुम्ही तुमची मेहनत चालू ठेवली तर तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. मिथुन आज तुम्हाला लोकांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कार्यालयीन कामकाज…
चंद्रपूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचं ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. मोदीजी यांच्या सभेने सर्व वातावरण बदलते आहे. आज विदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे. मात्र मोदींच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. चंद्रपूरनंतर रामटेक मध्ये देखील 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभांनी पूर्ण विदर्भातील वातावरण ढवळून निघेल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत, या…
नागपूर : वृत्तसंस्था मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनाहून अधिक कार-दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होतील की अनेक कारचा चेंदामेंदा झाला व एक कार तर थेट दुसऱ्या कारवरच चढली. या अपघातात 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार, धडक दिलेल्या वाहनांमध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा जास्त कारचे नुकसान झाले आहे. अनेक कारचा अक्षरशः चुराडा झाला. दरम्यान, कारमधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी करुणा संतोष बोदडे (२२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु.दीक्षितवाडी, जळगाव) हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने खोलीत एकटी असतानाच करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना रविवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळची यावल तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी असलेली करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात (नर्सिंग) पदव्युत्तरचे (जीएनएम) शिक्षण घेत होती. ती अन्य तीन…

