जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन दिग्गज नेत्यांनी प्रवेश घेतल्याने जळगाव जिल्ह्यात आता ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. यात ज्येष्ठ नेत्या डॉ.अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे. जळगाव जिल्हा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लागलीच करण…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव MIDC मधील कत्तलखाना संदर्भात उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथील बिल्डींग मटेरीअल व्यापारी प्रेमचंद खिवसरा यांचे नाव घेऊन आरोप केला होता. यावर आता प्रेमचंद खिवसरा यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर खुलासा केला आहे. त्यात त्यांनी २०१५ मध्ये उन्मेष पाटील हे आमदार असताना कत्तलखाना प्रकरण कस उघडकीस आणले होते, ? तेव्हा त्यांच्या सोबत कोण कोण होते ? नेमका बिल्डींग मटेरीअल सप्लाय चा आणि त्यांचा सबंध काय ? २०१५ मध्ये स्थगिती मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर देखील कत्तलखान्याचे काम कसे सुरु राहिले याबाबत त्यांनी सर्व घटनाक्रच आपल्या खुलाश्याच्या माध्यमातून मांडले आहे. प्रेमचंद खिवसरा यांनी केलेला जाहीर खुलासा जश्याचा तसा सर्वाना जय…
रावेर : प्रतिनिधी दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले. एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिला अन् अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम पाटील यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिला. महायुतीच्या रक्षा खडसे उमेदवार आहेत. यामुळे…
पुणे : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. निकालानंतरही अनेक प्रलंबीत कामांप्रमाणे राम मंदिराचे काम प्रलंबीत राहिले असते, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी…
सांगली : वृत्तसंस्था सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी यांच्या कार्यकर्त्यांनी आता रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताने पत्र लिहीत ते पत्र विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावण्यात आले आहे. विशाल पाटील यांच्यासाठी असे पत्र लिहिणारे धनगर समाजातील कार्यकर्ते असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आपण विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षणाबाबत खोटे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे. रक्ताने लिहिलेल्या त्यांचे हे पत्र विशाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करत धनगर बांधवांचा विशाल पाटील यांनाच पाठिंबा असल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये महाआघाडीच्या…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. हवामान…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री शिवारात दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात छत्रपती संभाजी नगर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या माळी वाडड्यातील चालक लक्ष्मण मन्साराम महाजन (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पिंप्री ते चिंचपुरा दरम्यान वळण रस्त्यावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील जैनोहीन कॉलनीतील दादाराव बाबूराव अहिरे याने आपल्या ताब्यातील अशोक लेलन्ड कंपनीची गाडी (एमएच- २०, ईएल- ७११८) ने भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या महेंद्रा पीकअप गाडी (एमएच- १९, बीएम- ३४५९) ला समोरुन जबर धडक दिली.…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे अंगाचा थरकाप उडवणारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली शुक्रवारी (दि. १२) या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून, देऊळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी विवाह झाला होता. पतीला सुरुवातीला मद्याचे व्यसन असल्याने छोटी-मोठी कुरबुर व्हायची. परंतु, गेल्या काही काळात विशालने प्रतिभाचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. दोन…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीला कूलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षदा किशोर मोरे (१२) असे मयत मुलीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, अक्षदाचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवते. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कूलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील सातपुडा भागात पोलिसांसह वनविभागाच्या पथकाने ५ वटवाघळांची तस्करी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मध्य प्रदेशातील असून त्याची व्हॅनही जप्त करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भारसिंग ग्यानसिंग बारेला (गुलझिरी, पो. पाडल्या बोरवाल, जि. खरगोन) असे या आरोपीचे नाव आहे. एम.पी.०९-बीसी-४९३८ या व्हॅनने तो पाच जिवंत वटवाघळांची तस्करी करीत होता. तशातच वैजापूर वनविभागाचे व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना त्यांच्या नजरेस व्हॅन पडली. त्यांनी व्हॅन रोखली. तपासणी केल्यावर वाहनामध्ये पाच जिवंत वटवाघूळ आढळून आले. या पथकाने वटवाघळांसह वाहन ताब्यात घेतले आणि आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम…

