चाळीसगाव :- प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी नाही तर माझ्या खानदेशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे. चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात आज सकाळी दहा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १० एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ती जेवण करून कुटुंबासह झोपली होती. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही बाबत १० एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता उघउकीला आले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध…
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात शरद पवार गटाने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाराज झाले होते, तर नुकतेच भुसावळ येथे माजी आ.संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा सुद्धा झाला असून याच मेळाव्यात माजी आ.चौधरी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. २१ रोजी मी त्यांना भेटेल, त्यांनी सध्या दिलेला उमेदवार बदलला नाही तरी आपण २४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत माजी आमदार संतोष चौधरींनी बंडाचे निशाण फडकावले. चौधरी म्हणाले की, पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनीच आपल्याला उमेदवारी करण्याबाबत विचारणा केली होती. आपण आदेश द्याल तर निवडणूक लढू, असे त्यांना सांगितले. यानंतर पक्षाकडे…
धुळे : वृत्तसंस्था घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती साक्री यांना देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या साक्री पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याला धुळे एसीबीने अटक केली. परेश प्रदीपराव शिंदे (34) असे लाचखोराचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, 40 वर्षीय तक्रारदार यांना शासनाच्या शबरी आवास योजनेंतर्गत घर बांधायचे आहे. तक्रारदार यांना सदर योजनेंतर्गत अनुदानित निधी प्राप्त करण्याकरीता आरोपी शिंदे यांच्याकडून तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती, साक्री येथे सादर करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजारांची लाच सोमवारी मागितली व तक्रार…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील दोन मुलांचा सोमवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. रोहन काशिनाथ श्रीखंडे (१७, रा. रामानंदनगर) आणि प्रथमेश शरद सोनवणे (१७, रा वाघनगर), अशी या मुलांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, हे दोघे जळगावहून दुपारी १ वाजता शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी आले होते. यानंतर ते समोरच असलेल्या तापी नदीत अंघोळीसाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही जण बुडाले. काही जणांनी त्यांना बाहेर काढले. लागलीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागेल. कौटुंबिक संबंध जपण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना मोठे पद मिळू शकते. तुमच्या व्यवसायात काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळत असल्याचे दिसते. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळात टाकणारा आहे. तुम्हाला कोणत्याही अनावश्यक वादात पडणे टाळावे लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कामावर तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल. तुमचा पगार वाढू शकतो. तुम्हाला कोणत्याही चुकीच्या गोष्टीला…
अमळनेर : प्रतिनिधी काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रोहिदास सुभाष पाटील वय-५२, रा. चोपडाई ता. अमळनेर हे शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते त्यांच्या चोपडाई शिवारातील शेतात काम करत असतांना काहीही कारण नसताना निशांत ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी रामदास पाटील आणि गोकुळ रामदास पाटील सर्व रा. नाव्हरी ता. अमळनेर या चार जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नांदूर शिंगोटे पुणे येथून नाशिककडे येत असलेल्या खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून दहा ते पंधरा फूट कोसळून अपघात झाला. यामध्ये १ ठार, तर ३३ प्रवासी जखमी झाले. सविस्तर वृत्त असे कि, सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा परिसरात रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृताचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (३५, रा. अहमदाबाद) असे आहे.पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास १:०० वाजता पुण्याहून नाशिककडे जात होती. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाच्या लोखंडी अँगलल धडकून दोन…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कनाशी येथे दि.१३ च्या मध्यरात्रीनंतर ४ ते ५ अज्ञात – चोरट्यांनी चार घरे फोडत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली. एकाच रात्रीत चार घरांमध्ये घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कनाशी येथील कजगाव-कनाशी मार्गावर तीन घरे तर तेथून काही – अंतरावर असलेले एक घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. यात एका घरातील -महिलेस गेटचे कुलूप तोडत असताना आवाज आल्याने ती जागी झाली चोरट्यांना पाहून तिने आरडाओरडा करू लागताच या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्र लावले. याच घरातील एकावर टॉमी रोखत चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. दुसऱ्या घरात प्रवेश करत घरातील दोन सदस्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून त्यांना चोरट्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेची गर्दीचा फायदा घेत, सोन्याची पोत लांबवल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन ३० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना टॉवर परिसरात शनिवारी घडली. शहरात वास्तव्यास असलेल्या महिलेची सोन्याची पोत तुटल्याने ती दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी पोत सराफाकडे नेण्यासाठी एका लहान पर्समध्ये ठेवली. त्यानंतर ही पर्स एका बॅगमध्ये घेत मुलगा तसेच एका तरुणीला सोबत घेत दुपारी टॉवर चौकात आले. सुरुवातीला त्या फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत…

