Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा याच्यासह सहा जणांवर एमपीडीएअंतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले. सविस्तर वृत्त असे कि, यामध्ये विशाल उर्फ विक्की मांडवा नामदेव सपकाळे (२८, रा. शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (३०, रा. डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (३८, रा.जळगाव खुर्द, ता. जळगाव), शांताराम सुका बोरसे (४५, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव), भैय्या मंगल पाटील (३०, रा. चोपडा), छायाबाई रमेश सकट (५८, रा. राजीवगांधी नगर) या हातभट्टी दारु विकणाऱ्यांसह वाळूमाफियांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणारा वाळूमाफिया विशाल सपकाळे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळू शकते. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वडिलधाऱ्यांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळू शकेल. जबाबदारी चोख पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. मुले तुम्हाला काही चांगली बातमी देतील, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला निरोगी वाटेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे नाव काही रचनात्मक कार्यात असेल. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक…

Read More

पुणे : वृत्तसंस्था मोदी सरकारने सत्तेचा उन्माद दाखवला आहे. मोदींकडून गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. पुण्यात आज खासदार अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”मागील दहा वर्षात मोदींनी अनेक आश्वासने दिली. यामध्ये तरुण वर्गाला रोजगार आणि नोकऱ्या देण्याचा आश्वासन होते. मात्र गेल्या दहा वर्षात देशात नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. देशभरातील तरुण वर्गापैकी 86% तरुण…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी (दि.१८) सकाळी ७.४५ च्या सुमारास ५५७.४ किमी अर्थातच सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरील (क्र.एमएच २० -जीटी ००९१) वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पलटी झाली. वाहनचालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ (२१) मिनाबाई रामकिसन गडगूळ (४६, सर्व रा.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, आगामी लोकसभा निवडणूकीच्या काळात शांतता व भयमुक्त वातावरण होण्यासाठी चाळीसगांव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगार राहूल आण्णा जाधव, श्याम उर्फ आण्णा नारायण गवळी आणि हैदरअली आसीफअली सैय्यद तिघे रा.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नाटेश्वर पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी मंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, भूषण भदाणे यांनी निवड केली आहे. आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसत्त्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामन्यापर्यंत पोहचवून पक्ष बळकटी करणार तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असा मला विश्वास आहे. त्यांच्या या निवडी बद्दल आपले हार्दिक अभिनंदनः !

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गांधी मार्केट जवळ एका तरूणाला चाकूने वार करून ४ हजार रूपये किंमतीची चांदीची चैन चोरून नेली. ही घटना रविवारी दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोएब तस्लीम खान (वय २६ रा. पिंप्राळा हुडको) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्यास असून तो बांधकामचे काम करून उदरनिर्वाह करतो. रविवार दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता तो कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे असलेला होता. त्यावेळी त्याला दोध्या उर्फ उमेश धोबी, भुषण (पुर्ण नाव माहित नाही)…

Read More

रावेर: प्रतिनिधी लगतच्या मध्य प्रदेशातील ब-हाणपूर येथून महाराष्ट्रात एक लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या पारोळा येथील एका वृद्धाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने येथे मुद्देमालासह पकडले. यातील आरोपीला अटक केली आहे. १६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हे. कॉ. ईश्वर चव्हाण, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. विशाल पाटील पो कॉ महेश मोगरे यांचे पथक गस्त घालत असताना रावेर शहरातील बसस्थानकात झाडाखाली बसलेला एक वृद्ध व्यक्ती पोलिस वाहन पाहताच दचकला. त्याची संशयास्पद हालचाल पाहताच त्याच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या रेक्झीनच्या गठ्ठयांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १ लाख…

Read More

यावल  : प्रतिनिधी शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेलिफोन ऑफिस समोरून दुचाकीने जाताना कारने धडक सेवानिवृत्त दिल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी १७ रोजी दुपारी झाला. अशोक किसन तायडे (६५, रा. आंबेडकरनगर, बोरावल गेट, यावल) हे दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून यावलकडे भरधाव जाणाऱ्या कारने (एम. एच. १४/ के. एफ. २१७०) धडक दिली. अनिकेत नारखेडे (रा. बुलढाणा) असे कारचालकाचे नाव आहे. या अपघातामध्ये अशोक तायडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यावल येथे सकाळी गुरुवारी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी एमपीडीएमधून सुटून आल्यानंतर लागलीच शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालत पोटात चाकू मारला होता. जयवंत पाटील याला गंभीर जखमा झाल्या होत्या. हल्ला केल्यानंतर शुभम फरार झाला होता. तो अनेकदा शहरात आल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांच्या हातात लागत नव्हता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर याना शुभम देशमुख हा धुळे येथे मालेगाव रस्त्यावर खान्देश खानावळीत जेवण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने या हॉटेलमध्ये जाऊन दाऊद यास पकडले.

Read More