Author: editor desk

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात सुरू झाला आहे. अर्थात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आता तिच्या मधल्या टप्प्यावर आहे. रावेर मतदार संघातील निवडूनिकाचा ज्वर वाढत आहे. एकीकडे माजी मंत्री व विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे विरुद्ध उद्योजक श्रीराम पाटील असा थेट सामना रंगणार आहे. परंतु हा सामना अधिक नाट्यमय होतोय तो एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यावरून. अर्थात मूळचे काँग्रेसी नंतर भारतीय जनता पक्षात अनेक वर्षे कार्य केलेले तब्बल १२ खात्यांचे मंत्री असलेले खडसे स्वपक्षियांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून भा. ज. पा. ला राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कन्या रोहिणी सोबत दाखल झाले. आता नाथाभाऊंचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे खरे कारण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने पायी जात असलेल्या तरूणाला किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शहरातील गेंदालाल मिल गेटजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राजमालती नगरात राहणारा फैजान राजू पटेल हा तरूण शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फैजान पटेल हा बहिणीसोबत गेंदालाल मिल गेट जवळून पायी जात होता. त्यावेळी राज अजय सुरवाडे रा. राजमालती नगर याने किरकोळ कारणावरून फैजान पटेल याला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फैजान याने शहर पोलीस ठाण्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापत भाजपने येथून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात आता निकम लढत देणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वीच उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. गायकवाड यांच्या विरोधात महायुतीत भाजप येथून कोणाला उमेदवारी देणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरू होते. भाजपत अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर भाजपने शनिवारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना येथून उमेदवारी दिल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. मागील काही महिन्यांपासून…

Read More

लातूर : वृत्तसंस्था मागच्या दहा वर्षांत देशातील अनेक घटना पाहता लोकशाहीसाठी घातक आहेत. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार विकत घेतले गेले. संविधानाच्या विरोधात अनेक घटना बघायला मिळत आहेत. भारताच्या लोकशाहीसाठी अनेकांनी त्याग केला आहे. परंतु, भाजप नेते, मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भारतीय लोकशाही कमजोर करण्यासाठी संविधान बदलण्याची मानसिकता भाजपची असल्याचे ‘दावे के साथ कहती हूँ’ असे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केला. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विश्रांती करीत असलेल्या खोलीमध्ये जाऊन आक्षेपार्ह फोटोंची धमकी देत महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तन करीत तिचा रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याने विनयभंग केला. तसेच विवाहितेच्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात घडली. याप्रकरणी हिमालय कांतीलाल वाघेला याच्याविरुद्ध २६ एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयामध्ये सहायक नेत्र चिकित्सक म्हणून काम करणाऱ्या एका विवाहितेची १४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्या एका खोलीमध्ये विश्रांती करीत होत्या. याचवेळी तेथे काम करणारा हिमालय वाघेला हा त्या ठिकाणी आला आणि त्याने दरवाजा बंद करून विवाहितेसोबत जबरदस्ती करू लागला. त्यानंतर…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. आज तुमच्यासाठी काही जमीन किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळतील. तुमच्यासाठी जागा बदलण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज तुम्हाला पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामावर सगळेच खूश दिसतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आदर वाढेल. तुमचे कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील. सार्वजनिक डोमेनमधील तुमच्या प्रतिमेनुसार तुम्हाला परिणाम मिळतील. आज एखाद्याशी बोलताना संयम बाळगा. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, तर त्याचा विस्तार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” योजना राबवून गावांना सक्षम करण्याचा व तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, वृद्ध महिला यांना न्याय देण्याचा प्रयत्न भावी काळात केला जाईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ तालुक्यातील गावांना शुक्रवारी प्रचार भेटी दरम्यान श्री पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . भुसावळ तालुक्यातील साकेगाव, गोजोरा. सुनसगाव, गोंभी, वेल्हाळा , मांडवे दिगर, भिल्लमळी या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. मांडवे दिगर व भिलमळी गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मागील १० वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. कशा भूलथापांना आपण बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार, दि.२६ रोजी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, रा. कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे जतन करून ठेवल्या आहेत. बहिणाबाईंच्या ओव्या असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील त्या सतत प्रेरित करत असतात. जळगाव शहराला देखील विकासाच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे, त्यासाठी कमळ फुलवण्याचा निर्धार उपस्थित सर्वांनी यावेळी केला. भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी जुन्या जळगावातील बौद्ध विहार तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे खाजगी आराम बस शनिवारी दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पलटल्याने ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरत येथून शुक्रवारी संध्याकाळी सुरत- अकोला ही खाजगी आराम बस निघालेली होती. शनिवारी दि. २७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात बस आली असताना अचानक टायर फुटल्याने पलटली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. गावातच रहिवासी असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बस बाहेर काढून त्यांनी रुग्णवाहिकेतून शासकीय…

Read More