नाशिक : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे हे मोदींपेक्षा मोठे नेते नाहीत, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना फटकारले. भुजबळ म्हणाले, विधानसभा आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण नाही, हे जरांगे यांना माहीत नाही. आता आम्ही येवल्यात लढतो, तेथून निवडून येतो. ज्यांना एवढेही समजत नाही, त्यांना आपण काय सांगणार? यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हणाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभा होत आहेत.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन तिची चोरटी वाहतूक करण्याचा प्रकार सुरुच आहे. नांदगाव शिवारात शेत गट क्रमांक 33 येथील गिरणा काठाजवळ अवैधरित्या वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी कारवाईतून जप्त केले. वैजनाथ, टाकरखेडा शिवारात गिरणानदीपात्रातून चोरी चुपके वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची सतत ओरड होत असते. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नांदगाव येथे गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पथक नेमून ते रवाना केले. शनिवार दि. २७ रोजी पहाटे तीन वाजता पोलिसांनी अवैधरित्या वाळूने…
पाचोरा : प्रतिनिधी भाग्यश्री हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटकडून नगरदेवळा येथील यात्रेकरूंची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रघुनाथ सुखदेव सोनार (७०, नगरदेवळा, ता. पाचोरा) या यात्रेकरूने दक्षिण भारत यात्रेसाठी भाग्यश्री हॉलिडे, मालाड-मुंबई या कंपनीचे एजंट भूपेश भीमभाई सुरती (मालाड) यांच्याशी जाहिरातीवरून ऑनलाइन बुकिंगसाठी संपर्क केला. भूपेश सुरती हा नगरदेवळा येथे येऊन त्याने १७ ऑक्टोबर रोजी रघुनाथ सोनार याच्यासह बारा यात्रेकरूंशी संपर्क केला व आरक्षणासाठी पैशाची मागणी केली. या यात्रेकरूंनी १७ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २३ दरम्यान वेळोवेळी ऑनलाइन बैंकिंगद्वारे भूपेश भीमभाई सुरती याच्या अकाउंटवर एकूण २ लाख १३ हजार रुपये टाकले. त्यानंतर भूपेश सुरती याने कोणत्याही प्रकारचा संपर्क…
जळगाव : प्रतिनिधी भाजपाने २०१४ ची निवडणूक १५ लाख रुपये आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर चालविली. त्यानंतर २०१९ ला पुलवामा आणि आता देश-विदेशाच्या मुद्यावर चालविली जात आहे. परंतु, मला देश-विदेशाच्या मुद्द्यांवर हायफाय भाषणं करून गल्लीचे प्रश्न संपवायचे नाहीत. जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्हीच भाजपाला एक-दोन नव्हे तर ३०-४० वर्षे संधी दिली. आता एक वेळ आम्हालाही संधी द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले. जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे महाविकास आघाडीच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादी…
मुक्ताईनगर भाऊंचे नाव महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे. एकाच वेळी १२ खात्यांचे धुरा असण्याचा रेकॉर्ड यांच्या नावावर आहे. महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यात आपल्या कुटुंबाला कोणी पर्याय होऊच शकत नाही आणि तो आलाच तर तो येनकेन प्रकारे आपण संपवतो असा आविर्भाव भाउंकडे आहे. हा आविर्भाव आला कुठून ?जेंव्हा यांनी एक एक व्यक्ती राजकारणातून बेदखल करण्याची सुरुवात केली तेंव्हा पासून. यांच्याच लेवा समाजातील माजी खासदार व आमदार राहिलेले कै. हरिभाऊ जावळे यांची राजकीय कारकीर्द संपविली ती आदरणीय मुक्ताईनगरच्या भाउंनीच. हरिभाऊ जेंव्हा तिसऱ्यांदा खासदार होणार होते त्यावेळी यांनी पक्षाच्या नेत्यांना आपल्या घरातील महिलेसाठी भावनिक साद घालून हरीभाऊंचे खासदारकीचे तिकीट कापले..तिसऱ्या वेळी हरीभाऊ खासदार झाले…
जळगाव : प्रतिनिधी जागतिक पातळीवरील दूध भुकटी व लोणी चे दर खालावल्यामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सहकारी व खाजगी दुध संघांनी आपले दुध खरेदी दर कमी केले होते. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या किमान २७ रुपये प्रति लिटर या दरापेक्षा कमी म्हणजे २५ रुपये पर्यंत काही दुध संघांनी दर कमी केले असताना देखील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने आपल्या दुध खरेदी दर २७ रुपयांच्या खाली जाऊ दिले नाही. जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दुध खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र व गुजरात मधील सहकारी व खाजगी दुध संघांनी सुगीच्या काळात म्हणजे दुधाची मागणी कमी व पुरवठा जास्त असतो अश्या वेळी देखील…
चाळीसगाव : प्रतिनिधी आडगाव येथील गरीब शेतमजूर कै.बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अकाली निधन झाले. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या कै. बापू यांची लहान मुलगी कु.दुर्गा हिचे लग्न दि.२ मे रोजी ठरले असून ऐन लग्नाच्या महिनाभर अगोदर हा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कै. बापूंच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्न कसे पार पाडावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण यांना कळाली असता त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली…
जळगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून रविवार, दि.२८ रोजी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद पाहून ही प्रचार रॅली विजयी रॅलीच वाटत होती. नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घरा-घरांवरून फुलाची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा देत करणदादा पाटील यांचे स्वागत केले. जळगाव शहरातील राजमालतीनगरातील श्री हनुमान मंदिर आणि जिल्हा दूध संघासमोरील साईबाबा मंदिरात नारळ…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतील रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांच्या जागी उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र रवींद्र भैय्या पाटील यांची उमेदवारी कापण्यात कटकारस्थान झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर रवींद्र भैया यांनी दिलेल्या खुलासा केला असून, उमेदवारी कापण्यात कुठेही कटकारस्थान झाले नाही, मी तिकीट मागितले होते, साहेबांचे राजकीय गणित असतात त्यामुळे त्यांनी मला थांबायला सांगितले, आणि त्यांच्या आदेशाची मी पालन करत असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जोमाने आमचे काम सुरू आहे असा खुलासा पाटील यांनी केला. रवींद्रभैय्या पाटील यांच्या गावाजवळी अंतुरली चांगदेव…
चोपडा : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यात आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली. आजच्या प्रचार दौऱ्यात निमगव्हाण, खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरे, कोळंबा, वडगांव सिम व मंगरूळ येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत श्रीराम पाटील यांनी संवाद साधला. यावेळी माजी शिक्षक आमदार तात्यासाहेब दिलीपराव सोनवणे , चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड संदीप भैय्या पाटील, माजी आमदार सुरेश बापू पाटील, गोरख तात्या पाटील, माजी सभापती जगन पाटील, हातेड सूतगिरणीचे संचालक रमेश नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील, राजेंद्र भास्कर…

