जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात राहणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ११ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षे चिमुकली आपले आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. दरम्यान गावात राहणारा एकाने याने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला. त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील सईदा सुखल गावात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफ कॉन्स्टेबल कबीर दास जखमी झाले. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थही जखमी झाला आहे. हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला पोलिसांनी ठार केले आहे. दुसरा दहशतवादी गावातच कुठेतरी लपला आहे. त्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या डीआयजी आणि एसएसपी कठुआ यांच्या वाहनावर गोळीबार केला. दोघेही थोडक्यात बचावले. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू…
जळगाव : प्रतिनिधी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील भुरे खान जखमी झाला. तो बालंबाल बचावला मात्र रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना महामार्गावरील साकेगाव पुलाजवळ रविवार दि. ९ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील हेडकरी मोहल्ल्यात मेहमूद खान सरफराज खान (वय ३४) हे रिक्षाचालक वास्तव्यास आहे. ते त्यांचे भाऊ भुरे खान यांच्याोबत (एम.एच.१९ सी. डब्ल्यू ०८५३) क्रमांकाच्या रिक्षाने भुसावळकडून नशिराबाद येथे येत होते. रिक्षा साकेगाव पुलावरून जात असताना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एम. एच. ४ एल.वाय. ४०७१) क्रमांकाच्या कंटेनरन…
जळगाव : प्रतिनिधी बैलगाडी घेवून शेतात जात असलेल्या शेतक-याला रेल्वेच्या बोगद्यामध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पाण्यात बैलगाडी टाकली, परंतु पाणी दहा ते बारा फुट असल्यामुळे शेतकऱ्याने बैलाची सुटका केली. मात्र सुकलाल लालचंद माळी (वय ६३, रा. असोदा, ता. जळगाव) यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता असोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याजवळ घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले, मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात सुकलाल लालचंद माळी हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात मुसळधार…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याच्या चर्चेमुळे महायुतीला फटका बसला. अशातच कांद्याने रडवले, सोयाबीन, कापसाच्या उतरलेल्या दराचाही मतदानावर परिणाम झाला, अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. शेतपिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चिती करण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आणि किंमत आयोगाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही कबुली दिली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीची चर्चा घडवून आणल्याने फटका बसला. राज्यातील संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याची चर्चा आदींमुळे महायुतीला मोठा फटका बसला. अनेक जागा यामुळे गमवाव्या लागल्या. ४०० पार या घोषणेमुळे काहीतरी गडबड होईल, या भीतीने लोकांनी एनडीएला मतदान केले नाही. शिवाय राज्यातील शेतकऱ्यांनीही विरोधात मत दिल्याचे…
अमळनेर : प्रतिनिधी शटर व कुलूप तोडून चार दुकानातून मोबाइल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेल्याची घटना ९ रोजी रात्री उशिरा ते १० जून सकाळच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, खड्डा जीनला लागून असलेल्या दुकानाजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भावसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे वरचे अर्धे शटर कापलेले दिसून आले. दुकानदाराने पाहिले असता त्याच्या दुकानातील ग्राईंडर मशीन, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिकल साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरीला गेले होते. त्याच्या बाजूला असलेल्या दोन-तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाइल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून दुरुस्तीला आलेले ८ ते १० अँड्रॉईड मोबाइल,…
चोपडा : प्रतिनिधी आदिवासी भागात सातपुडा पर्वतरांगांमधील वैजापूर गावाच्या हद्दीत खाऱ्यापाडा ते वैजापूर या रोडवर मंगळवारी सायंकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (३०, पार उमर्टी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हा तीन गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतुसे घेऊन जाताना ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये पोहेकॉ मनोज दुसाने यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे तीन गावठी कट्टे आणि दहा हजार रुपये किमतीची १० काडतुसे, असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोहेकॉ पल्लवी सुभाष वाणी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कावेरी…
जळगाव: प्रतिनिधी गेल्या एक ते दीड महिन्यापासून आजीकडे आलेल्या मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, ११ जून रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास जळगावातील हरिविठ्ठल नगरात घडली. सविस्तर वृत्त असे कि, दरम्यान, ही आत्महत्या नसून विवाहितेच्या पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीनाचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यापूर्वी जळगावात हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आली होती. काही दिवसांपूर्वीच एका खासगी डॉक्टरकडे कामाला…
मेष : ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. वृषभ : आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती…

