मेष आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना अनेक नव्या ठिकाणी ज्ञानार्जन करण्याची संधी मिळण्याचा आहे. कुटुंबवत्सल लोकांना घरातील काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यवसाय चांगला करण्यासाठी नवीन उपकरणे घ्यावी लागतील. घरात सुखसुविधांच्या वस्तू खरेदी करण्यावर तुमचा भर असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आईचं जुनं दुखणं डोकं वर काढेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या कामात धावपळ करावी लागणार आहे. तुम्हाला तुमचा सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. वाहनांचा वापर अत्यंत सांभाळून करा, नाही तर अडचण होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या घरी एखाद्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबातील…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान मंगळवारी 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३ जून) विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संखेत राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवल्यास सुनेत्रा यांचा विजय सहज होईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती, मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामती…
जळगाव : प्रतीनिधी शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार १२ जून रोजी दुपारी १२.३० वाजता कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजल शेख कादिर वय-१८, रा. मास्टर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील तांबपुरा परिसरात असलेल्या खदानीजवळ फैजल शेख कादीर हा हातात तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक विकास सातदिवे,…
मुंबई : वृत्तसंस्था नुकतेच लोकसभा निवडणुकी मोठ्या उत्साहात झाली, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. या निवडणुकीत मनसेने देखील भाजपला पाठींबा दिला होता मात्र आता मनसे विधानसभेच्या तयारीला लागली असून आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची राज्य व्यापी बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केले नसल्याचे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले.…
धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सातत्याने सुरु असतांना आज नुकतेच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील एका अपंग असलेल्या पतीला २ जून रोजी दुपारी १ वाजता शेतात नेऊन विहिरीत ढकलून खून केला होता. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी उघडकीस आला आहे. यात प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा खून पतीनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याचे तिने कबुली दिली आहे या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश…
जळगाव : प्रतिनिधी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा. तांबापुरा) याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर तो परिसरातून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला. सविस्तर वृत्त असे कि, भोलासिंग बावरी याने ११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. त्याला शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकों राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी अटक केली होती. त्याला बुधवार, १२ जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर बाहेरून तो पोलिसांची नजर चुकवून पळून…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिसांच्या पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपीची घरझडती सुरू असताना एकाच्या घरात ३ धारदार हत्यारे सापडली. या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करतानाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, समाधान बळीराम निकम (शिव कॉलनी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याने त्याच्या घरात कोयता व सुऱ्यासारखे धारदार हत्यार ठेवले आहेत.या माहितीच्या आधारे त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घराच्या बैठक रूममधील लोखंडी पलंगाच्या बॉक्समध्ये लोखंडी धारदार कोयता व दोन लोखंडी सुरे, अशी एकूण ३…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात विकास दूध फेडरेशनची दूध पावडर घेऊन निघालेला ट्रक मुद्देमालासह गायब झाला आहे. या ट्रकमधून ७५ लाख ४५ हजार ७२० रुपयांची दूध पावडर लखनौ येथे नेण्यात येत होती; परंतु ५ जून रोजी जळगावहून निघालेला ट्रक लखनौ येथे इच्छित स्थळी पोहोचलाच नाही. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात ट्रक मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमध्ये (क्र. आरजे ११, जीबी ९५७९) २६ टन पावडर भरून ट्रक मालक रसतम कमलेश बघेल (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) आणि चालक फिरोज सरजुद्दीन (रा. आग्रा उत्तर प्रदेश) हे दोघे निघाले. परंतु दूध पावडरने भरलेला ट्रक पाच दिवस…
मेष : तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. वृषभ : ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरातील दुरुस्तीची…
मुंबई : वृत्तसंस्था सरकारकडून मध्यस्थीसाठी कुणीही येत नाही. सरकारने आरक्षणाचा विषय तातडीने तडीस नेतो, असे आश्वासन दिले म्हणून सलाईन लावली आहे. सरकारने जर शब्द फिरवला तर पुन्हा उपचार बंद करीन, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि. १२) पत्रकार परिषदेत दिला. आरक्षण तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारच्या वतीने आरक्षण विषय लवकर तडीस नेऊ, असे आश्वासन मिळाल्याने सलाईन लावली आहे. आमचा विषय मार्गी लागला पाहिजे, आमचे कुणबी प्रमाणपत्र निघायला हवेत. सरकारला आता पुराव्यांचा आधार मिळालेला आहे. आता सगे सोयरे कायदा व्हायला हवा. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार…

