मुक्ताईनगर : प्रतिनिधी गुरांची अवैधरीत्या वाहतूक करणारे वाहन मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले. या मालवाहू वाहनात पाच बैल कोंबून वाहतूक केली जात होती, त्या बैलांची सुटका करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पूर्णाड फाट्याजवळ एका वाहनामधून (एमएच ४१, जी- ८९२) गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने १२ जून रोजी पहाटे पाच वाजता गाडी थांबविली. या वाहनाची तपासणी करीत वाहनामधील पाच बैलांची सुटका करण्यात आली. याबाबत चालकाजवळ विचारणा केली असता कोणताही परवाना नव्हता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दीपक घनंशराज चौकसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुरांना अंतुर्ली येथील कामधेनू गोशाळेत ठेवण्यात आले…
Author: editor desk
मेष राशी आज तुमचा दिवस बरा जाईल. या राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्या शॉपिंगसाठी जाऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. आज स्वतःवर विश्वास ठेवा. या राशीच्या मंत्र्यांचे परदेश दौरे होऊ शकतात. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. वृषभ राशी आज तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. जेव्हा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू कराल तेव्हा तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. केलेले प्रवासाचे बेत यशस्वी होतील आणि या प्रवासात तुम्हाला नवीन अनुभव मिळतील. लव्हमेट मदत करेल, आज कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी सोपे जाईल. आज व्यवसायात अधिक नफा मिळाल्याने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भडगाव व अमळनेर येथील तीन विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत झाल्यानंतर दि.१४ रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. त्या ठिकाणी चार जून रोजी सायंकाळी रशियामध्ये वालखोव नदीत बुडून अमळनेर येथील जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी (दाेघे अमळनेर) आणि हर्षल अनंतराव देसले (भडगाव) या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेनंतर चार दिवसानंतर त्यांचे मृतदेह सापडले होते. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तिघा विद्यार्थ्यांचे मृतदेह रशियातून त्या विद्यार्थ्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे…
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात. गजा मारणे हा कुख्यात गुंड असून त्याने नीलेश लंके यांची भेट घेतल्याने आता राजकीय वाद रंगणार आहे. दरम्यान खासदार नीलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने नीलेश लंकेंचा सत्कार केला. नीलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला…
जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. याच दरम्यान जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईंकडेच चौकशीची मागणी केली आहे. माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्याची मला यादी द्या, अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली आहे. दरम्यान, माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. वेळ आल्यावर त्या माणसाचं नावही घेणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला, त्यामुळे नेमके 100 कोटी कुणी कमावलेत या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कुवेतमध्ये सहा मजली इमारतीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांपैकी ४८ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार मृतांमध्ये केरळच्या २४ जणांसह ४५ भारतीयांचा समावेश असून तीन जण फिलिपाइन्सचे नागरिक आहेत. भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाचे एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह हेदेखील कुवेतमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील दुर्घटनेबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान मदतनिधीतून मृत भारतीयांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर केंद्र सरकार, केरळ सरकार आणि दोन व्यापाऱ्यांकडून केरळमधील मृत कुटुंबाच्या वारसांना एकूण १४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे गेल्या काही दिवसांत अडावद शहरासह परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पाटचारी भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीला गेलेल्या तब्बल ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. याच संशयिताचा घरफोड्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सप्टेंबर २०२२ मध्ये चोरी झालेली दुचाकी पाटचारी भागात राहणाऱ्या तरुणाकडे असल्याची गुप्त माहिती सपोनि संतोष चव्हाण यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अडावद परिसर पिंजून काढला; परंतु संशयित हाती लागला नाही. अधिक शोध घेतला असता तो जंगल रस्त्याने उनपदेवच्या जंगलात पसार झाला. पोलिसांनी सुमारे…
जळगाव : प्रतिनिधी बखळ प्लॉट नावावर करून देतो असे सांगून जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील एका तरुणाची १८ लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गौरव रवींद्र पवार (वय ४०, रा. कोजागिरी बंगलो, मुक्ताईनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याची चंद्रकांत सतीश तोष्णीवाल (रा. आदर्श नगर, जळगाव) याच्याशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून चंद्रकांत तोष्णीवाल याने गौरव पवार याच्याकडून वेळोवेळी एकूण…
यावल : प्रतिनिधी वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत अवैधरीत्या कटाई केलेल्या लाकडाची वाहतूक करताना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आला वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि. ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने सापळा रचून यावल शहरातील फैजपूर रस्ता मनुदेवी मंदिराजवळ टाटा कंपनीचे ३११८ या वाहन क्रमांक एमएच १८ बीजी २१५३ या चारचाकी वाहनाची चौकशी केली असता या मध्ये विनापरवाना अवैध लाकूड भरलेले दिसून आले, वाहनचालकाकडे लाकूड वाहतुकीसंदर्भात परवाना मिळून आला नाही. यावेळी वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने चारचाकी वाहन मुद्देमालासह लाखांचा अवैधरीत्या कटाई केलेला लाकूड पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन…
जामनेर : प्रतिनिधी एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्यात आले. या प्रकरणी सुभाष उमाजी भिल (३५) या संशयित आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची १० पथके तालुक्यासह वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. संशयितास पकडून देणाऱ्यास पोलिसांतर्फे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याने गुन्ह्यातील कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, मृत बालिकेच्या शवविच्छेदन अहवालावरून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी संशयित भिल याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्याचा ठावठिकाणा कळविणाऱ्यास किंवा पकडून देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल, असे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पोलिस अधीक्षक महेश्वर…

