जळगाव : प्रतिनिधी केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या किर्ती बापू साळुंखे (रा. निमखेडी शिवार) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी पाच हजार रोखकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना दि. ८ जून ते दि. १३ जून दरम्यान घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निमखेडी शिवारातील विष्णूपार्क परिसरात राहणाऱ्या किर्ती साळुंखे या पती, मुलांसह वास्तव्यास आहेत. दि. ८ जून रोजी त्या कुटुंबियांसह केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेला गेलेले आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख पाच हजार…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या सार्वे गावानजीक ६० वर्षीय वृद्धाचा रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचालक ही जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, सार्वे गावाजवळ सुखदेव गोबा ठेलारी (६०, सार्वे, ता. पारोळा) हे रस्त्याच्या कडेला उभे असताना जळगावकडून धुळ्याच्या दिशेने नीलेश अशोकराव पाटील (नागपूर) हे दुचाकीने (एमएच ३१टी००४५) भरधाव वेगात जात होते. त्यावेळी उभ्या असलेल्या सुखदेव ठेलारी यांना त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. अपघातात पाटील हेही जखमी झाले. याबाबत पारोळा पोलिसात रविकांत सुकदेव ठेलारी यांच्या…
जळगाव : प्रतिनिधी शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी करून न देता बांधकाम व्यावसायिक पीयूष कमलकिशोर मणियार (२६, रा. गणेशवाडी) यांची ७० लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २८ डिसेंबर २०२३ ते १४ जूनदरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी व एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन एजंटला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, बांधकाम व्यावसायिक पीयूष मणियार यांना शेतजमीन घ्यायची आहे. त्यासाठी रिअल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंगरोड, जळगाव) याने रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) या शेतकऱ्याची शिरसोली प्र.बो. येथील…
जामनेर : प्रतिनिधी कर्जाची रक्कम वसूल करून परतणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन लाखांची रक्कम लुटून नेली. ही घटना पळासखेडे काकर ते देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) दरम्यान १२ जून रोजी घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नीलेश राधेशाम यादव (रा. पिपलीय कायथा, जि. उज्जैन) हे जामनेर येथील नम्र फायनान्स कंपनीत शाखा व्यवस्थापक आहेत. ते दीपक सुरडकर यांच्यासोबत १२ जून रोजी महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी दुचाकीने पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथे गेले होते. वसूल झालेली सुमारे २ लाख ७ हजारांची रक्कम घेऊन…
मेष : तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. वृषभ : जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशस्वी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक उत्साहात झाली. नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळवण्याचा आमचा मार्ग आणखी सुकर होईल, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्त मतदान झाले असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र 18 सभा झाल्या तसेच एक रोड शो झाला. ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या आणि रोड शो झाला, त्या – त्या जागेवर जनतेने महाविकास…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील छत्तीसगडमधील अबुझमरहमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्याचे ANIने दिले आहे. अबुझमदच्या जंगलात नक्षलींनी आश्रय घेतला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त शोध मोहिम राबवली. अबुझमदच्या कुतुल फरसाबेदा कोडामेटा भागात अद्याप चकमक सुरु आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील माडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडामधील डीआरजी, एसटीएफ,आणि ITBP 53 व्या बटालियनचे सैन्य या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सरोदे हॉस्पिटलच्या गेटसमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार १२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार १३ जून रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, हरीश राजेश निकुंभ (वय २९) रा. सुधाकर नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील सरोदे हॉस्पिटले येथे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीके ९६८२ ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी ही हॉस्पिटलच्या समोर पार्कीगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोणवाडी गावातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अंगलट करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार १२ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील लोणवाडी गावातील एका भागात २२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १२ जून रोजी रात्री ११ वाजता त्याच गावात राहणारा संशयित आरोपी मिलीन हा महिलेच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर महिलेशी अंगलट करून अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.…
जळगाव : प्रतिनिधी शेतात सकाळी नांगरटी केली आणि त्यानंतर शेतातचा झाडाला गळफास घेत अलोक रवींद्र लुले (वय १८, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १४ जून रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. वडिलांच्या अपघातानंतर शेतीकामात त्यांना मदत करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधार हरवला आहे. सविस्तर वृत्त असे कि, देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व अंघोळ करून पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर शेजारील शेतातील मंडळींना अलोक हा गळफास…

