मेष राशी दुनिया तुमच्या विरोधात कटकारस्थान करत आहे, असं तुम्हाला नेहमी वाटतं. तुम्ही महत्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या विविध कार्यांना गती मिळेल. तुमचे उत्कृष्ट प्रयत्न सर्वांना प्रभावित करतील. संशय दूर होतील आणि तुम्हाला इच्छित माहिती मिळेल. तुम्ही लोकांशी यशस्वीपणे जोडले जाल आणि आनंददायक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हाल. तुम्ही जलद प्रगती कराल आणि वैयक्तिक नातेसंबंध सुधारतील. परिस्थिती अनुकूल होईल. तुमची शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन उत्पन्न चांगले राहील. प्रवास आणि मनोरंजनाच्या संधी वाढतील. वृषभ राशी तुमच्या कामात स्पष्टता वाढेल. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. घरात आनंद आणि सुख राहील. कुटुंबातील सदस्य तुमचे समर्थन करण्यास उत्सुक होतील. इतरांच्या सल्ल्याने प्रगती कराल,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील पाथरी येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सहकार्याने व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून जीपीएस परिवार पाळधी व पाथरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती या शिबिराच्या ठिकाणी लाभली. नामदार पालकमंत्री यांचा सत्कार उपसरपंच पंडित महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन केला ,रमेश पाटील यांचा सत्कार प्रतिभा पाटील यांनी केला , सचिन पाटील यांचा सत्कार दीपक चव्हाण यांनी केला, डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार भावेश कासे व सागर कासे यांनी केला. जळगाव दूध संघाचे संचालक रमेश पाटील जळके, वडली येथील सचिन पाटील ,माजी…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याद्वारे महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही रस्सीखेच सुरू नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी यासंबंधी आपल्या मित्र पक्षांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. मविआतील काँग्रेस व शरद पवारांच्या पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला तरी माझी हरकत नाही. त्याला मी येथेच पाठिंबा जाहीर करतो. कारण, ही निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता जपणारी असून, कोणत्याही स्थितीत महायुती सरकारला सत्तेतून खाली…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना दि.15 ऑगस्ट रोजी 12 वाजेच्या दरम्यान चारचाकी कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा-शेलुबाजार जवळ असलेल्या IC9 टोल प्लाझा जवळ दि.15 ऑगस्ट रोजी 12 वाजताच्या दरम्यान कारचा भीषण भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात कार चालकाला झोप लागल्यामुळे घडल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाने मुंबई वरून वर्धा येथे जात असताना MH 43 BK 6284 क्रमांकाच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या MH 04 HD 9981 क्रमांकाच्या आयशर…
मुंबई : वृत्तसंस्था देशात पाच राज्यातील निवडणूक आज दुपारी ३ वा.जाहीर होत असतांना सर्वच पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली असतांना आज महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मुंबईत आज सकाळी साडेदहा वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे,नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून रणनीती…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येवून धडकल्या असतांना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जोरदार सुरु असतांना नुकतेच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही ठरवले आहे. त्यामुळे गोरगरिबांनी ठरवले आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. 20 तारखे पर्यंत चित्र बदललेले दिसत, देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मला हलक्यात घेऊ नका, मी एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुढे बोलताना म्हणाले की, आमची आणखी तरी प्रामाणिक भूमिका आहे. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली असतांना आज पहाटेच्या सुमारास एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील महाराष्ट्रासह 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत 14 ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. 9 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या टीमसह जम्मू-काश्मीरला भेट दिली. 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. विदेशातून व्यापार करणाऱ्या लोकांना मोठा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. तुम्ही एखादी संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता आणि तुमची ही योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सुख-सुविधा वाढवणारा असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या काही मित्रांची भेट होईल. तुम्हाला वरिष्ठांकडून काही सल्ला मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चालू असलेली खटपट दूर करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी शोधणार्यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली आहे. तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीच्या टप्पा क्रमांक 1 व 2 ला मान्यता मिळाली असून वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेजलाही मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी जनतेसमोर चूक मान्य केल्यावर देखील पुन्हा अजित पवार विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा निवडणुकीबाबत एक सूचक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आपले दुसरे पुत्र जय पवारांना उतरविण्याच्या प्रश्नावर पवारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. बारामती विधानसभेची निवडणूक मी सात-आठ वेळा लढलोय आहे. त्यामुळे आता मला बारामतीत इंटरेस्ट नाही. कार्यकर्त्यांची मागणी असेल, तर जय पवारला संधी देऊया, असे महत्त्वपूर्ण विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार स्वत: थांबून पुत्र जयला रिंगणात उतरविणार का ? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया…

