भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असताना यावल रोडलगत असलेल्या साई चंद्रनगर येथील तीन दुमजली रो हाऊस पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने ही घरे कोसळण्याआधी तडे पडल्याचे लक्षात आल्याने घरातील व्यक्ती घराबाहेर मैदानावर आल्याने कोणासही इजा झाली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अशात शहरातील यावल रोडलगत असलेल्या साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत कोसळण्याआधी या इमारतीला तडे पडले. याचा अंदाज आल्याने घरातील नागरिक घराच्या बाहेर पडले व अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने ही इमारत पडली. इमारत कोसळल्याच्या व्हिडीओ येथील नागरिकांनी चित्रित केला व लगेचच व्हायरल झाला. या…
Author: editor desk
नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस खास असणार ! आजचे राशिभविष्य दि २६ ऑगस्ट २०२४ मेष राशी आज महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. जुन्या वादावर पडदा पडेल. तुमची मेहनत आणि हिंमतीमुळे कुटुंबातील एखादं काम मार्गी लागेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. काही वेळ आत्मचिंतनात घालवा. प्रचंड आत्मविश्वास तुमच्या अंगाशी येऊ शकतं. गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या. कुणाशीही चर्चा करताना नकारात्मक शब्द वापरू नका. नाही तर तुमचे संबंध बिघडतील. वृषभ राशी काही समस्या राहतील, पण तुम्ही विचारपूर्वक त्या समस्यांवर मार्ग काढाल. ऑनलाइन शॉपिंगमधील घडामोडीत तुमचा वेळ जाईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या घरी जाण्याचं निमंत्रण मिळेल. घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची अवहेलना करू नका. एखाद्या…
जळगाव : प्रतिनिधी वसंतवाडी तालुका जळगाव येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण व प्रविण पाटील यांना आमच्या अंगणवाडीसाठी मंत्री महोदय यांच्याकडून थोर पुरुषांच्या प्रतिमा मिळवून देण्याची मागणी केली सदर विषय जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे तसेच युवा नेते प्रतापराव पाटील यांच्याकडे केला. कुठलाही विलंब न करता नियमित समाज सेवेत अग्रेसर असणाऱ्या प्रतापराव पाटील यांनी मंत्री महोदय यांच्याकडून वसंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतवाडी व वसंतवाडी येथील दोन्ही अंगणवाडीना थोर पुरुषांच्या प्रतिमांचे संच हे भेट म्हणून दिले. अंगणवाडी येथे थोर पुरुषांच्या प्रतिमा संच कार्यकुशल नेतृत्व प्रतापराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील शेतकरी रमेश चव्हाण या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. या शेतकरी कुटुंबावार कमवता व्यक्ती गेल्याने आर्थिक संकट कोसळले याची जाणीव जळगाव शिवसेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण यांना झाली. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे यांच्या सहकार्याने या मयत शेतकरी रमेश चव्हाण यांच्या पत्नी झिपाबाई चव्हाण यांचा गोपिनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला व त्यासाठी पाठपुरावा करून त्यांना दोन लाख रुपयांची रक्कम मिळवून दिली.झिपाबाई चव्हाण यांना गोपिनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,पवन भाऊ सोनवणे यांच्या हस्ते…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच नागपूरवरून अमरावतीकडे येणाऱ्या शिवशाही बसचा राष्ट्रीय महामार्ग सहावर नांदगाव पेठ जवळ आज (रविवार) सकाळी भीषण अपघात झाला. गाईला वाचविताना बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात दोन प्रवासी ठार झाले असून, 28 जण जखमी आहेत. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी शिवशाही बस क्रमांक एमएच 09 ईएम 1778 ही नागपूर वरून अकोला येथे जाण्यासाठी 35 प्रवासी घेऊन निघाली होती. दरम्यान अमरावती मार्गावर नांदगाव पेठ रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक बसच्या समोर एक गाय आडवी आली. त्यामुळे बस चालकाने गाईला वाचविण्याचा प्रयत्न…
मुंबई : वृत्तसंस्था बदलापूरातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आता अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने प्राथमिक तपास अहवाल शिंदे सरकारला सादर केल्याचे वृत्त आहे. या प्राथमिक अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. खरे तर बदलापूर क्रूरता प्रकरणात एकनाथ शिंदे सरकारने समिती स्थापन करून या प्रकरणात कुठे चुका झाल्या याची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता या समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केल्याची माहिती समोर येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सुमारे 1 इंच जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत अनेकवेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मोदींकडून जळगाव जिल्ह्यासाठी काही नवीन घोषणा केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहेत. वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दीदींशीही त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्या आहेत. जळगाव ही सोन्याची भूमी असून माझ्या…
जळगाव : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदी मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दिदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दिदी संमेलन स्थळी आगमन झाले. प्रधानमंत्र्यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसांत सततधार पाऊस सुरु असून सरासरीपेक्षा २४%अधिक पावसाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील ४० मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सरासरी ३४.२ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्टमधील पावसाची मोठी तूट पडली होती. ती आता २१.८% राहिली आहे. मात्र राज्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे. राज्यात सरासरीपेक्षा २४% अधिक पावसाची नोंद झाली आहे. २४ ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी ७५६ मिमी पावसाची नोंंद होते, यंदा त्यापेक्षा अधिक ९४० मिलिमीटर पाऊस कोसळला. तसेच आगामी ४८ तासांत पुन्हा जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात…
मेष राशी मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. वडिलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या मदतीने कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अधीनस्थांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात संयम आणि समर्पणाने काम करा. प्रगतीसोबत प्रगती होईल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी लांबचा प्रवास टाळावा अन्यथा प्रवासादरम्यान त्यांना दुखापत होऊ शकते. कार्यक्षेत्रातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्याकडून परत घेतली जाऊ शकते. मारामारीमुळे तुमची प्रतिमा खराब होईल. राजकारणामुळे तणाव आणि नैराश्य येऊ शकते. व्यवसायात अचानक नफा किंवा तोटा संभवतो. दारू पिऊन गाडी चालवू नका. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी परिस्थितीनुसार काम केल्याने फायदा होईल. विरोधकांची…

