चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मेहुणबारे येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे मंगळवारी उघडकीस आली. लक्ष्मीबाई (२६) व गोपाल पावरा उर्फ बारेला (३०) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी तळोंदे प्र.दे. शिवारातील शिवाजी पाटील (रा. पिंप्री बुद्रूक प्र.दे.) यांच्या शेतातील खोलीत गोपाल पावरा उर्फ बारेला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याने तिचासुद्धा मृत्यू झाल्याचे आढळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे पो.ना. प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, हनुमंत वाघेरे…
Author: editor desk
मेष राशी नोकरीत पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी मिळेल. सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. उद्योग विस्ताराची योजना यशस्वी होईल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात मान-सन्मान वाढेल. दिवस तुमच्यासाठी सामान्यतः लाभाचा आणि प्रगतीचा दिवस असेल. हळूहळू कामे होतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. वृषभ राशी कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल. प्रवासाची शक्यता आहे. मनोरंजनाचा आनंद लुटत तुम्ही आनंदाने तुमच्या ठिकाणी पोहोचाल. राजकारणात तुमच्या भाषणाचा जनतेवर चांगला प्रभाव पडेल. घरगुती जीवनात आकर्षण आणि प्रेम वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कला-अभिनय क्षेत्राशी निगडित व्यक्ती काही महत्त्वाची कामगिरी करतील. घरात चैनीच्या वस्तू आल्याने कुटुंबात आनंद मिळेल.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरातमध्ये गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला असून दरम्यान पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १७०० लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर २३८७१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे राज्य सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र आहे. त्यामुळे आणखी पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने २९ ऑगस्टपर्यंत राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात जोरदार वारे वाहतील आणि मुसळधार पाऊसही पडेल, असे विभागाने म्हटले आहे. ताज्या बुलेटिनमध्ये, IMD ने म्हटले आहे…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यात राज्यातील एका जिल्ह्यात तर विविध ठिकाणी अक्षरशः जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागातर्फे रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे जिल्हाभरात अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात पर्जन्यमानात वाढ झाल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साक्री तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पांझरा नदीला पुर येऊन बहुतांश गावातील संपर्क तुटलेला आहे. तसेच धुळे शहारातील लहान तीनही पुलांवर पाणी आल्याने रहदारीबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी काढले आहे. जळगाव एमआयडीसी, यावल आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तिन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर वय-२४, रा. तुकाराम वाडी, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिऱ्हाडे वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, यावल यांच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 8-9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ विद्यार्थी आणि कामगार संघटना मंगळवारी नबन्ना येथे मोर्चा काढत आहेत. नबन्ना हे पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय आहे, जिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सर्व मंत्री आणि अधिकारी बसतात. पश्चिम बंग छात्र समाज आणि संग्रामी जौठा मंच नबन्ना अभिजान या रॅलीचे आयोजन करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॉलेज स्क्वेअर, संत्रागाछी आणि हावडा मैदानावर ते जमतील. ते दुपारी 1 वाजता नबान्नात पोहोचतील आणि निदर्शने करतील. हिंसाचाराचे कारण देत पोलिसांनी रॅली बेकायदेशीर घोषित केली आहे. आंदोलकांना नबान्नाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी 7 मार्गांवर…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग होतो आहे. गिरणा, वाघूर, अंजनी यासह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन सुरक्षित राहावे आणि अडचण आल्यास जिल्हा प्रशासन अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्ती पासून स्वतःचा बचाव करावा याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे. राज्यात तसेच जिल्ह्यात दिवसें-दिवस पावसाचा जोर वाढत असून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणाची स्थिती बघितली तर हतनूर धरणातून 61,872 क्युसेक्स विसर्ग केला जातो आहे.गिरणातून 35 हजार ते 40 हजार क्युसेक्स विसर्ग…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी नदी जवळ असलेल्या सर्वे क्रमांक ७८ ब मधिल साईचंद्र नगरात रविवार २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या स्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी इतर घरांना तडे गेल्या नाहीत ना याची खात्री करून घेतली. इमारत पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून सर्व नियमाप्रमाणे बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र मिळते. ते एनओसी या बिल्डरने घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भुसावळ शहरात अजुन किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसताना पप्पू जहांगीर शेख (२५, पिंप्राळा हुडको) यांना तीन जणांनी शिवीगाळ करीत चॉपरने वार केला, यात शेख जखमी झाले. ही घटना २४ ऑगस्ट रोजी आझादनगरात घडली. याप्रकरणी रविवारी (दि. २५) रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ ऑगस्ट रोजी आझादनगर परिसरात पप्पू शेख यांना पिंप्राळा हुडकोमधीलच तीन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने चॉपरने वार करून जखमी केले. याप्रकरणी शेख यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) रोजी काढले. या प्रकरणात संबंधिताची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून निलंबन काळात धनगर यांना मुख्यालयात रहावे लागणार आहे. रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली होती. त्यानंतर कार काढताना दोन दुचाकींना धक्का देत त्या पाडल्या व काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले होते. या प्रकरणी सोमवारी (२६…

