मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यावर येवून ठेपली असतांना राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय देखील जोरदार चर्चेत असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, सरकारने मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपची नागपूरची जागा येणार नाही, असा इशारा त्यांनी गुरुवारी सत्ताधारी भाजप विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. माझ्या नादाला लागू नको, मी तुझा शत्रू नाही, असेही ते यावेळी फडणवीसांवर शरसंधान साधताना म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, मराठा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्यानिमित्ताने आज आपण जो बैलांसाठी साज देत आहोत ती एकप्रकारे बैलांप्रतीची कृतज्ञता आहे. आज यांत्रिकीकरण आलं तरी शेती मातीशी इमान असलेल्या आपल्या सारख्या बळी राजांनी आजही बैल राखून ठेवले आहेत. हीं आपल्या परंपरेची श्रीमंती आहे, ती श्रीमंती राखू या असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आसोदा येथे तुषार महाजन यांच्या संकल्पनेतून गणपती मित्र मंडळ व विविध कार्यकारी सोसायटी मार्फत आयोजित बैलांना साज वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा येथील…
जळगाव : प्रतिनिधी वरणगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयीताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज उर्फ मनोज सुरेश शिंदे वय-३९, रा. रामपेठ वरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरात पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पेट्रोलिंग करत असताना त्याला संशयित आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगत असल्याची…
धरणगाव : प्रतिनिधी येथील एरंडोल रस्त्यावरील गुड शेफर्ड शाळेसमोर रस्त्यावर दुचाकी (एमएच- १९, एव्ही- ९५३२) ने नीलेश झगडू सोनवणे (वय ३३) व त्याचा भाऊ अजय झगडु सोनवणे (वय ३०) हे दोन्ही घरी जेवणासाठी तालुक्यातील बांभोरी येथे जात होते. या वेळी अचानक मागून आलेल्या ट्रक (एमएच- १८, एम- ४५३३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात जागीच नीलेश सोनवणे याचा मृत्यू झाला. तर अजय सोनवणे यास गंभीर इजा झाली आहे.या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. याबाबत सुरेश गोपाल अहिरे यांनी दिलेल्या माहितीवरून ट्रक चालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. सत्यवान पवार करत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाचे शिक्षकाला दिलेल्या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाचे शिक्षक व चिंतामण मोरया नगरमधील प्रमोद नारायण पाटील (वय ३२, रा. आर्थे खुर्द, ता.शिरपूर) हे २७ ऑगस्टला धरणगाव येथून संध्याकाळी पत्नी, मुलगा, मुलीला घेऊन माहेरी गेलेले होते. त्यांना सोडुन परत येत असताना रात्री धरणगाव ते सोनवद रस्त्यावरील तरडे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन त्याने पोबारा केला. दरम्यान, जनार्दन पाटील यांच्या शेतात दुचाकी एमएच- १९, सीडी- ९२८३) व प्रमोद पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात सोनवद येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलमध्ये दारु पित असलेल्या भूषण रघुनाथ सपकाळे (रा. खेडी. बु. ता. जळगाव) याने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी त्याच्यासह आठ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबार करणारा भूषण सपकाळे याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून हद्दपार असतांना देखील त्याने जळगावात येऊन गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भास्कर मार्केटसमोरील हॉटेल शालीमार येथे रविवारी सायंकाळी हद्दपारीची कारवाई झालेला भूषण सपकाळे व मयुर सोनार यांच्यासह सात ते आठ जण दारु पिण्यासाठी आले. दारु पित असतांना अचानक त्या टोळक्यातील एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढून जमिनीवर गोळीबार केला. यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील ए.बी. पार्क परिसरात महिलेचे बंद घर फोडून घरातून ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता समोर आली आहे. यासंदर्भात मंगळवारी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप जोहरे (वय ३५, रा. ए.बी. पार्क) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट त्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मालवाहू वाहतूक करणारे वाहन थांबवून वाहनधारकास मारहाण करून लूट केल्याची घटना २६ रोजी रात्री डोलारखेडा परिसरात घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा जंगल परिसरातील रस्त्याने दीपक इच्छाराम पाटील (४१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) हा सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मालवाहू वाहनाने (एम. एच. १९/ सी. वाय. ८१४९) जात असताना जीप मधून येत पाच जणांनी समोरुन दीपक पाटील यांच्या वाहनाचा रस्ता अडवला व दीपक यास विनय प्रमोद चौधरी (रा. शिरसोदा, ता. जि. बन्हाणपूर), राहुल तायडे व आकाश रवींद्र पाटकर (दोन्ही रा. इच्छापूर, ता. जि.बन्हाणपूर), सौरव उखा पाटील आणि…
जळगाव : प्रतिनिधी नातेवाइकांना मुलगा झाल्याने त्यास रुग्णालयात पाहण्यासाठी जाताना दुचाकीला ट्रकने मागून धडक दिली. यात १७ वर्षीय तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू झाला तर २ वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी गुजराल पेट्रोलपंप ते मानराज चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिक्षिता राहुल पाटील (वय २७, रा. नाशिक), पायल (खुशी) देवेंद्र जलंकर (१७ रा. वाटिकाश्रम, जळगाव) असे मयत महिला व तरुणीचे नाव आहे तर रुद्र राहुल पाटील (वय २) हा गंभीर जखमी झाला आहे. दिक्षिता यांचे वडील अर्जुन पाटील हे शहरातील वाटिकाश्रम येथील व्दारकाई अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहेत. तर पायलदेखील आपल्या…
मेष राशी महत्त्वाच्या कामात संघर्ष होईल. पण परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत अधिक समन्वय निर्माण करण्याची गरज भासेल. वैयक्तिक काम आणि व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास फायदा होईल. शेतीच्या कामात लोकांना काही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल. राजकारणात प्रचंड जनसमर्थन मिळाल्याने तुमचे राजकीय वर्चस्व वाढेल. वृषभ राशी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. काही महत्त्वाच्या कामात विलंब होईल. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे शुभ राहील. भागीदारीच्या स्वरूपात व्यवसाय करण्याची शक्यता आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागल्यास त्यांना नवीन आशेचा किरण मिळेल. स्वत:वर प्रचंड विश्वास ठेवा मिथुन राशी…

