धरणगाव : प्रतिनिधी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे अर्थ व वाणिज्य मंडळाचे आणि अर्थशास्त्र विभागाच्या 2024 -25 या वर्षाच्या भीत्ती॑पत्रकाचे उद्घाटन दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ. ए .डी. वळवी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक विशाल हौसे सर उपस्थित होते. प्राध्यापक विशाल हौसे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रिप्टो करेंसी म्हणजे काय ,बिटकॉइन म्हणजे काय यात गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध ॲप तसेच यातील गुंतवणुकी संदर्भात सुरक्षितता व धोके या संदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले तर प्राचार्य…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल-नेरी रस्त्यावर जळके येथून पवन गोपाल सूर्यवंशी वय १७ वर्षे व अलताफ बंन्डु तडवी वय १९ वर्षे हे मोटर सायकल क्रमांक MH 19BV7531ने वावडदा येथे पोळा सण असल्यामुळे बैलासाठी साज घेण्यासाठी गेला होता परतीचा प्रवास करत असताना लहु पाटील यांच्या शेताजवळ सकाळी ९:३०वाजता नेरीकडुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक HR 73-9316 याने उडवलं यात मोटारसायकलवर मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी या तरुणांच्या अंगावरुन ट्रक चे चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अर्शिद सत्तार खान ( चालक) वय वर्षे ५० हा व त्याचा किन्नर…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी गावात राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. धनुष भागवत कोळी (वय ५८) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनुष कोळी यांचे कुटुंब खाजगी कंपनी नौकरीच्या निमित्ताने भोपाळ मध्यप्रदेश येथे स्थायिक झाले असुन, धनुष हे आजाराने त्रस्त झाल्यामुळे मागील चार ते पाच महीन्यापासुन आपल्या मुळ डांभुर्णी गावात येथे राहात होते. आज दि.१ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धनुष कोळी यांनी आपल्या डांभुणी गावातील वाल्मीक नगर मधील घरात गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची खबर मयताचा मुलगा विशाल…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने संजय दिनकर कोळी (वय ५१, रा. सुनंदिनी नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. १ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुनंदिनी नगरात संजय कोळी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. वेल्डिंग दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते वेल्डिंगचे दुकान बंद घर तरून घराकडे निघाले होते. दरम्यान, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२१ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील विरवाडे येथील रहिवासी तथा अभियंता नितीन प्रवीणसिंग पाटील (४५) यांचा ३१ रोजी पाय घसरल्याने गूळ धरणात बुडून मृत्यू झाला. ते विद्युत अभियंता होते. ते सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मालापूर येथील गूळ धरणावर फिरायला गेलेले होते. तेथे त्यांचा पाय घसरल्याने धरणाच्या १५ मीटर पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विरवाडे गावात घटना समजताच कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गूळ धरण गाठले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनीही पीएसआय बापू साळुंखे, पोकॉ. किशोर माळी आदींना घटनास्थळी पाठविले. परंतु धरणात पाणी खूपच असल्याने शव बाहेर काढता आले नाही. सावळदे (ता. शिरपूर) येथील पट्टीचे पोहणारे कैलास शिरसाठ, नारायण शिरसाठ, सुनील शिरसाठ,…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील यावल-चोपड़ा मार्गावरील हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोरील मोकळ्या जागेवर पाटचारी परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय जगदीश फिरंग्या बारेला सोलंकी या मजुराचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. खून कोणी व का केला, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. त्याच्या डोक्यावर व अंगावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने तसेच गळ्याभोवती फास आवळल्याची निशाणी दिसल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अडावदचे स.पो.नि. प्रमोद वाघ, पो.उ.नि. राजू थोरात, भरत नाईक, भूषण चव्हाण, गणेश बोरसे, सागर बागुले, संजय माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाने संशयितांचा काही अंतरापर्यंतच माग दाखवला. चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील ईटवे येथे गॅसवर स्वयंपाक करीत असताना गॅसची नळी लिक असल्याने अचानक गॅसने पेट घेतल्याने घरात आगीचे वातावरण पसरले असून त्यात दोघं नवरा-बायको जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आज दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास इटवे येथील उषाबाई या गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका होऊन त्यात उषाबाई व योगेश माळी राहणार आहे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेत एरंडोल येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी भेट देत गावकऱ्यांच्या सहकार्याने घरातील वस्तू काढून बाहेर फेकल्या तर बरचसे नुकसान…
मेष राशी सरकारी नोकरीत बढती मिळेल. राजकारणात विरोधक पराभूत होतील. व्यवसायात नवीन सहकारी लाभदायक ठरतील. जुन्या प्रकरणातून दिलासा मिळेल. नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षा स्पर्धांमध्ये यश मिळेल. परदेश सेवेत आणि आयात-निर्याताशी संबंधित लोकांना अचानक मोठे यश मिळेल. नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल. लांबचा प्रवास किंवा परदेश दौऱ्यावर जाण्याची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. अन्यथा हा वाद मारामारीचे रूप घेऊ शकतो. वृषभ राशी संयम राखा. कामाच्या ठिकाणी घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. नोकरीत बढतीचे योग येतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसकडून कौतुक आणि प्रोत्साहन मिळेल. उद्योगक्षेत्राच्या विस्ताराची योजना यशस्वी होईल. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला…
अमळनेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना अमळनेर तालुक्यात देखील अपघाताच्या घटनेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी लावून बाजूला उभा असलेल्या तरुणाला वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देत पळ काढला. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजता अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द गावाजवळ घडली. याप्रकरणी सकाळी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटू दगा चव्हाण रा. कर्ले ता. सिंदखेडा जि. धुळे असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे भटू चव्हाण हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. दरम्यान…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात आज रविवारी महाविकास आघाडीकडून मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले, त्याची उदाहरणे सांगत आता काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का? असा प्रश्न विचारून थेट कोंडीत पकडले आहे. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून…

