मुंबई : वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कर्जमाफीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेचा नायनाट झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र काही माध्यमांत आणि राजकीय वर्तुळांमध्ये, ही कर्जमाफी कुठल्या बँकेकडून घेतलेल्या कर्जावर लागू होणार नाही याबाबत वेगवेगळे दावे होऊ लागले होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, “मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली असून नव्या दरानुसार १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर दिल्लीत आता ९१३ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर ८५३ रुपयांना मिळत होता. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो आता १८८३ रुपयांना मिळणार आहे. वाढीव दर ७ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे देशात गॅस तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करत देशातील…
चाळीसगाव : प्रतिनिधी व्हिडिओ कॉलद्वारे १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा विवख व्हिडिओ करून ब्लॅकमेल करीत त्याच्याकडून ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार ५ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील १९ वर्षीय तरुण नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ५ सप्टेंबर रोजी तो फेसबुक पाहत असताना त्याने ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करा’ अशा मेसेजला क्लिक केले. त्यानंतर एक अॅप ओपन झाले व त्यात मुलींच्या नावाचे वेगवेगळे खाते दिसले. यापासून वाचायचे असल्यास व्हिडिओ डिलिट करण्यासाठी डिलीट कार्ड लागेल…
मुक्ताईनगर : वृत्तसंस्था मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (४) आणि अंकिता संजय नाफडे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडून सातोडच्या दिशेने ही कार जात होती.…
आजचे राशिभविष्य दि.७ मार्च २०२६ मेष राशी तुमचा व्यवसाय वाढेल, आर्थिक नफ्यात लक्षणीय वाढ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल. या राशीखाली जन्मलेल्या खेळाडूंना मोठ्या कामगिरी किंवा विजयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होईल. आज तुम्ही तुमच्या मित्राला त्यांच्या घरी भेटायला जाल. जर तुमचे पूर्वी एखाद्या नातेवाईकाशी मतभेद झाले असतील, तर आजचा दिवस संबंध सुधारण्यासाठी चांगला आहे. तुमचे विरोधक कदाचित त्यांच्यापासून दूर राहतील. वृषभ राशी आज ऑफिसमध्ये तुम्हाला एका मोठ्या कामाची जबाबदारी देण्यात येईल, जी तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. जर तुम्ही तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड दिले तर तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या 2026 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लागू करण्याची घोषणा केली. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार केवळ थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच दिलासा देण्यात येणार नाही, तर जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेद्न फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा सरकारचा दावा आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
नागपूर : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत लॉबीवादावर निशाणा साधत म्हणाले, “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ”, ज्यावर उपस्थितांनी जोरदार हसले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. गडकरी यांनी या भाषणात देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, भारताला भविष्यात मजबूत आणि स्वावलंबी बनवायचे असेल तर पर्यायी ऊर्जेवर भर देणे आवश्यक आहे. “काही वर्षांपूर्वी जेव्हा मी जैवइंधन, इथेनॉल…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच मराठा आरक्षण व त्यासंबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुढील दिशा ठरविण्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. समितीच्या अहवालानुसार राज्यभरात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या असून, त्यावर आधारित 12 लाख 11 हजार 303 जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. यामुळे मराठा समाजातील अनेकांना आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. प्रदेशानुसार पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात…
भुसावळ : प्रतिनिधी लग्नसमारंभात वऱ्हाडी असल्याचे भासवून शिरलेल्या चोरट्यांनी नववधूच्या दागिन्यांची पर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ येथे तब्बल दहा दिवस ठाण मांडत दोन संशयित आरोपींना अटक केली. रितीक सिकंदर सिसोदीया आणि कृषी निरज बेडीया (दोघे रा. कडिया सांसी, तहसील नरसिंहपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ येथील बालाजी लॉन्स येथे ६ फेब्रुवारी रोजी उज्ज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडत होता. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास नववधूचे दागिने…

