मुंबई : वृत्तसंस्था इयत्ता दहावी व बारावीच्या यंदाच्या बोर्ड परीक्षांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मास कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 81 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित केंद्रांवरील गैरप्रकारांचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून समोर आल्यानंतर राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक 224) सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. प्रशासनाने या प्रकरणी 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले. विशेष म्हणजे, हा प्रकार परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारीला घडल्याचे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात डीबी रायटर म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथे राहत्या घरी गळफास घेत जीवन संपविल्याची घटना सोमवारी (दि. सकाळी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश पाटील हे डीबी रायटर म्हणून कार्यरत होते. मूळ चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी असलेले निलेश पाटील शनिवारी गावी एक कार्यक्रमासाठी गेले होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. सोमवारी सकाळी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमीत मनेल यांनी भेट दिली असून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा सुरू असून मृताचा मोबाईल ताब्यात घेण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम” असल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस म्हणाले, “ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराच्या गुलामीत गेले, त्यांनी देशाला सार्वभौम कसे ठेवतात आणि देश चालवतात, हे आम्हाला शिकवू नये.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षित ठेवली आहे. “आज टॅरिफ वॉर झाला तरी भारत झुकला नाही, वेगवेगळ्या देशांशी टॅरिफ करार करून भारताने मजबुती दाखवली,” असेही फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीतील लोखंड प्रकरणावरही मुख्यमंत्री आक्रमक झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोलीचे लोखंड परदेशातून पाठवून पुन्हा विकत घेण्याचा आरोप…
हिंगोली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत, “अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र सरकार अक्षरशः शरण गेले आहे. त्यांनी अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर न होता ठामपणे भारताची भूमिका मांडावी,” असे स्पष्टपणे म्हटले. सपकाळ यांच्या नेतृत्वात आज हिंगोली येथे भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ‘शेतकरी संघर्ष पदयात्रा’ काढण्यात येत आहे. या पदयात्रेत हिंगोलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. पदयात्रेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी तू इकडे का आला आहेस असे बोलण्याच्या राग आल्याने विक्की ज्ञानेश्वर माळी (वय २१, रा. जानकीनगर) या तरुणासह त्याच्या मामीवर धारदार कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास जानकी नगरात घडली. याप्रकरणी संशयित मिलींद अरविंद चौधरी (रा. ज्ञानदेवनगर,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जानकी नगरात विक्की माळी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास विक्की हा घराजवळ उभा होता, त्यावेळी आनंद चौधरी हा त्यांच्याजवळ आला. विक्की याने त्याला तु कशासाठी आला आहे असे विचारले, त्यावेळी आनंद याने त्याचा मित्र तेजस पवार याला…
जळगाव : प्रतिनिधी पैसे कर्जाने काढून हॉटेल उभे केले, पण मध्येच ते बंद करण्यास सांगत असल्यामुळे मानसिक व आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीक प्रमोद पुरुषोत्तम पाटील (वय ५६) यांनी हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये त्यांनी परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील यांनी परेश पाटील यांच्यासोबत भागीदारीतून हॉटेल आस्वाद सुरू केले होते. मात्र काही कारणांमुळे हे हॉटेल मागील काही दिवसांपासून बंद होते. दरम्यान, संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीत सुरू होते ती जमीन परेश सुभाष पाटील व सुभाष…
भडगाव : प्रतिनिधी दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या दोघांच्या बलिदानाने रविवारी संपूर्ण भडगाव तालुका सुन्न झाला. गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या लहान मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उतरलेल्या नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून, अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यांनी या निष्पाप जीवांचा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात काही लहान मुले पाण्यात वाहतांना दिसून आली. जवळच काफिया कपडे धुत होती. त्यांना वाचवण्यासाठी काफीयाने नदीत उडी घेतली. तिला पाण्याचा अंदाज न लागल्याने ती…
आजचे राशिभविष्य दि. ९ मार्च २०२६ मेष राशी शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यात व्यस्त असतील. आज तुमचा व्यवसायातील नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या जुन्या प्रकरणामुळे गोंधळून जाल. तुमच्या कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाणे फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला आर्थिक मदत करू शकाल. घरातील बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस आरामदायी वाटेल. तुमच्या मोठ्या बहिणीचा सल्ला फायदेशीर ठरेल. रंगपंचमीला तुमचे प्रेम जीवनही सुधारेल. वृषभ राशी आज, तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी दयाळूपणे वागाल आणि तुमचे शब्द काहींना प्रभावित करतील. आर्थिक स्थैर्य राहील. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जेवायला जाऊ शकता. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना हा दिवस…
जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान जळगाव : प्रतिनिधी आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिला अबला नसून सबला आहे. समाजाचे रक्षण…
मुंबई : वृत्तसंस्था इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. राज्यात कुठेही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, काही माध्यमांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी गर्दी केली आणि मोठ्या रांगा लागल्या. मात्र प्रत्यक्षात राज्यात कुठेही इंधन टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने ऊर्जा सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली…

