मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कुठल्याही क्षणी लागण्याची दाट शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. आज सकाळी ९ वाजता महत्त्वाच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही शिंदे सरकारची शेवटची कॅबिनेट असल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. विधानसभे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला. दरम्यान, आजची कॅबिनेट शेवटची असून लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या राज्यमंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची १२५ एकर…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूक येत्या दोन दिवसावर घोषित होणार असतांना भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. या यादीवर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासह चर्चा होणार आहे. यासाठी फडणीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतर भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुस्लिम पंचमंडळला दिलेला शब्द पाळला असून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मुस्लिम समाजाच्या विविध 9 ठिकाणी 2 कोटी 64 लाख रुपये निधी तर विविध विकास कामांसाठी 75 लक्ष निधी मंजूर करून मुस्लिम समाजासाठी विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाच्या सभागृहाच्या उभारणीमुळे मुस्लिम समाजातील समता आणि एकता दृढ होण्यास मदत होवून सामाजिक प्रगती साधता येईल. धरणगाव येथे मुस्लिम समाज व पंच मंडळ आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की, “मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासह शासन कायमच प्रयत्नशील आहे. या सभागृहाच्या…
जळगाव : प्रतिनिधी घरमालकाशी असलेल्या वादाच्या कारणातून घरात प्रवेश करीत रवींद्र उर्फ गोलू भागवत चौधरी (रा. खेडी बुद्रुक) याने एका महिलेचा विनयभंग केला. तसेच या महिलेच्या पतीलाही धक्काबुक्की केली. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिला वास्तव्यास आहे. ती महिला घराच्या दरवाजाचे कुलूप उघडत असताना रवींद्र चौधरी हा त्याठिकाणी आला. व त्याने घरमालकाशी असलेल्या वादाच्या कारणातून महिलेला अश्लील शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. महिलेचे पती वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील धक्काबुक्की…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील लालमाती येथे रविवारी रात्री हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी एका गटातील ११ जणांविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तफा शित्र तडवी याने चिथावणी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे रमेश नारायण पवार (४४) हे त्यांना याबाबत विचारणा करण्यास गेले असता शिवीगाळ करण्यात आली. याचबरोबर धमकी देत लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तर सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रमेश नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिकंदर शित्र तडवी, शब्बीर उर्फ चंवा शित्र तडवी, मुस्तफा शित्र तडवी, हसन जहात तडवी, हुसेन जहात तडवी, कालु…
जळगाव : प्रतिनिधी फोनवर बोलणे करुन व दिल्याचा राग आल्याने टोळक्याने प्रौढासह त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच कोणत्यातरी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी जळगाव तालुक्यातील धानवड येथे घडली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड तांडा येथील पोपट उखा राठोड (वय ४०) हे वास्तव्यास आहे. दि. १० रोजी सायंकाळी ते घरी असतांना गावातील गोरख धनसिंग चव्हाण व मिथून मकराम चव्हाण यांनी त्यांच्या मुलाच्या फोनवरुन कॉल करुन त्यांना शिरसोली रस्त्याकडे बोलावले. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर तु रविंद्र ईश्वर राठोड याच्यासोबत बोलणे का करुन…
जळगाव : प्रतिनिधी तालक्यातील म्हसावद येथील इंदिरा नगर मधील रहीवाशी असलेले रफीक शेख भैय्या व त्यांची पत्नी फिरोजाबी शेख रफीक हे आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहेत रविवार दिनांक १३ ऑक्टोबर दुपारी दोन च्या सुमारास त्यांची दोन्ही मुले अनुक्रमे नवाज रफीक शेख वय वर्षे १२ आणि हसनैन रफीक शेख हे गावातील दुर्गा विसर्जन पाहण्यासाठी गिरणानदीवर गेले असतांना हसनैन शेख याचा पाय घसरून तो नदीपात्रात पडला. हे त्यांच्या सोबत असलेल्या त्याचा भाऊ नवाज शेख याने पाहीले व त्याने भावाला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली परंतु दोन्ही पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याठिकाणी नागरीकांना मधुन हुसेन शहा या तरुणाने क्षणात नदीत उडी घेऊन नवाज शेख…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. नोकरदारांना जर आपल्या कामात काही अडचण जाणवत असतील तर ती दूर होईल. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या काही गोष्टींचं वाईट वाटू शकते. एखाद्या जुना मित्राला खूप काळानंतर भेटणार आहात. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल. जर तुम्ही एखादे काम घाईगर्दीत केले तर त्यात गडबड होऊ शकते. वृषभ राशी आज तुम्ही एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीच्या बाबतीत समस्या असल्यास त्यातून त्यांची सुटका होईल. तुमचा एखादा सहकारी तुझ्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला एखाद्याशी काहीतरी बोलताना खूप विचार करून बोलावे लागेल. जर तुमची एखादी प्रिय…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव, एरंडोल शहराची ओळख पांडव नगरी म्हणून आहे. शांतता प्रिय शहर तसेच कुठलीही राजकारण डोक्यात न घेता काम करणारे हे शहर असून अलीकडे पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाचा आशीर्वाद लाभल्यामुळे टोळी दोन नंबर वाल्यांची निर्माण झाली आहे. मागील महिन्यातच विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या पथकाने पत्त्यांच्या क्लबसह चांदर पलटी कार्यक्रमावर एक हॉटेलमध्ये धाड टाकून गद्दाराच्या हस्तकाचा कार्यक्रम उधळून लावला. विशेष म्हणजे गद्दाराच्या मुलाच्या पुस्तकाने पोलिसांच्या हप्ते कसे मिळतात याचा पडदा फास देखील सोशल मीडियाद्वारे केला. एकेकाळी बिनविरोध नगरपालिका निवडणूक होऊन राज्यात इतिहास घडला होता म्हणजेच सांगायचे तात्पर्य असेल या एरंडोल तालुक्यात प्रचंड दोन नंबर टोळी गदराच्या मुलाने पोचण्यास सुरुवात केली आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचार सहित लागण्याचे संकेत असल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून यात मनसेने देखील महत्वाची भूमिका घेतली आहे. नुकतेच आज मनसेचा मेळावा झाला असून यात राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती सोबतच आघाडी सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधील पक्ष असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदारांनी महाराष्ट्र निर्माण सेनेवर विश्वास दाखवावा, त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हे हेवा वाटावा असा महाराष्ट्र…

