जळगाव : प्रतिनिधी चोरवड येथे मध्य प्रदेश सीमातपासणी नाक्यावर राज्य विधानसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या सर्वेक्षण पथकाने ब-हाणपूरहून फैजपूरकडे आणला जात असलेल्या १४ लाख २१ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे, तसेच सोबत मालवाहू वाहनही जप्त केले आहे. ही कारवाई दि. ६ रोजी मध्यरात्रीनंतर करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पो. कॉ. विशाल पाटील, पो.कॉ. रवींद्र भांबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री १:५० वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे जात असलेल्या छोट्या मालवाहू चारचाकी (क्र. एम.एच. ०४ एच.वाय. ६५१५) वाहनाला अडवून त्याची झडती घेतली. त्यातील आरोपी रिजवान शेख रऊफ (वय २८) व त्याचे सोबत असलेल्या शेख अयुब…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळ्यातील श्रीरत्न कॉलनीत सुरेंद्रकुमार शंकरलाल जैन यांच्या मालकीचे ज्वेलरी दुकान फोडणाऱ्या समीर शेख इकबाल (वय २४, रा.हुडको, रा. पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली, त्याचा दुसरा साथीदार पसार असून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या पाठीमागे पिंप्राळ्यातील श्रीरत्न कॉलनीत सुरेंद्रकुमार जैन यांच्या मालकीचे ज्वेलरी दुकान आहे. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर जैन घरी गेले होते. मध्यरात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडल्याचे शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जैन यांना कळवले. त्यांनी लागलीच दुकानात येऊन पाहणी केली असता दुकानातील ८ हजार रुपये किमतीचे चांदीचे १६ जोडवे, ७ हजार २ रुपये किमतीच्या सोन्याच्या १२…
अमळनेर : प्रतिनिधी येथील विकास प्रवीण पाटील (वय २९) या तरुणाच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील विकास पाटील याच्याकडून ३ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास गाडीचे इंडिकेटर तुटले. त्या कारणावरून विकास याला अमळगाव ते जळोद रोडवर अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, रोहित सीताराम पाटील (रा. गांधली व पिळोदा, ता. अमळनेर) यांनी मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगावसह राज्यभरात निवडूकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे उस्फुर्त स्वागत होत असून दारोदारी महिला भगिनी रांगोळ्या काढून आनंदाने स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी औक्षण करून विजयासाठी आशिर्वाद मिळत असून आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के प्रचार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुर्ण केल्याचे दिसून येत आहे. आ.मंगेशदादा चव्हाण हे शहरात प्रचार करत असतांनाच त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण यादेखील ग्रामीण…
मेष राशी आज तुमचा दिवस थोडा संघर्षमय असेल. चालू कामात अडथळे येतील. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमच्या बुद्धीने वागा. सामाजिक कार्यात रस कमी राहील. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. नोकरदारांच्या मदतीने व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आजचा दिवस अधिक आनंदाचा असेल, तुम्हाला लांबच्या प्रवासात जाण्याची संधी मिळेल नवीन व्यवसायात वाढ होईल, सरकार आणि सत्तेशी संबंधित यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगा. मिथुन राशी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. धर्मादाय कार्यात तुमची आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी काही चढ-उतार होतील. व्यवसाय आणि उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात जास्त मेहनत केल्याने सुधारणा होईल. कर्क राशी…
जालना ; वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर आली असून मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आवाहन केले आहे. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही. या समाजाला मायबाप मानले आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्या प्रचाराला आणि सभेला जाऊ नका. माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचे, पण शक्यतो पाडापाडी कराच, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय…
मुंबई : वृत्तसंस्था बीकेसीमधील महाविकास आघाडीच्या सभास्थळी पोहोचल्यानंतर सुरक्षारक्षकांना मुंबई पोलिसांनी अडवल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. आत घ्या सगळ्यांना पहिला, कोण आहे तो त्याचं नाव घ्या असं म्हणत उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. शेवटी एका पोलिस अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी निघून गेले. मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले आणि इतर नेते उपस्थित होते. सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे काहीसे उशिरा पोहोचले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. बीकेसीच्या सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवले, त्यांना आत प्रवेश देण्यास नकार…
जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी पिंप्राळ्यातील काही भागात प्रचार केला. बारीवाडा परिसरातील “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेल्या रांगोळीतून एका भगिनीने दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा पाहून आ. राजूमामा भोळे भारावून गेले. तर प्रचारामध्ये ‘प्रति मकरंद अनासपुरे’ खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. पिंप्राळा भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून व पुष्पहार अर्पण करीत आ. राजूमामा भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. गर्जना चौक, बारीवाडा परिसर, कोळीवाडा…
जळगाव : प्रतिनिधी “ग्रामविकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले. धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सुजदे, देऊळवाडे येथे गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः लाडक्या ग्रप – ग्रुप ने बहिणींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देत आहे. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, भाजपचे राजू सोनवणे, अनिल सोनवणे, मन्नूभाऊ सोनवणे होते. गुलाबराव पाटील यांनी या परिसरात केलेल्या सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर गावकऱ्यांमध्ये अपार विश्वास…
जळगाव : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात तीन दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. त्यात बुधवारी (६ नोव्हेंबर) पुन्हा दोन हजार रुपयांनी घसरून चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. सोने मात्र ७९ हजार २०० रुपयांवर स्थिर आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचे भाव वाढत जाऊन २३ ऑक्टोबर रोजी एक लाख रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर भाव ३१ ऑक्टोबर रोजी ९९ हजार रुपयांवर आले. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन चांदी ९७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. – त्यानंतर पुन्हा घसरण कायम राहत ४ नोव्हेंबर रोजी चांदी ९५ हजार ३०० रुपयांवर आली. ५…

