Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिनावल शिवारातील वडगाव रस्त्यावरील सुकी नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार बंडू कापसे यांनी तीन तलाठींसह शुक्रवारी पहाटे चार वाजता या ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्यांनी आलेल्शा शाहरूख शेख सगीर (रा. चिनावल, ता. रावेर) यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. चिनावल शिवारातून ट्रॅक्टरवर बसून तहसील कार्यालयापर्यंत तहसीलदार बंडू कापसे यांनी हे ट्रॅक्टर आणले व जप्त केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच सुकी नदीपात्रात ही करवाई केली. यावेळी तहसीलदार कापसे व तलाठी स्वप्नील परदेशी आणि गुणवंत बारेला (रावेर सजा) तथा गोपाळ भगत (खानापूर सजा) यांच्यासह दोन मोटारसायकलवर कडाक्याच्या थंडीत वडगाव मार्गे चिनावल…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील घोडसगाव येथे मुलीच्या भेटीसाठी आलेल्या पित्याला पूर्णाड फाट्याजवळील हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मयताचे नाव विकास रघुनाथ इंगळे (वय ५३) असे आहे. ते वाघाडी ता. रावेर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विकास इंगळे हे मुलीला भेटण्यासाठी घोडसगाव येथे आले होते. दरम्यान, सायंकाळी गावात फिरून येतो, असे सांगून घरातून निघून गेले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलीचे नातेवाईक आकाश भालेराव यांनी तिचे पती सागर वानखेडे यांना फोन करून सांगितले की, अज्ञात वाहनाच्या धडकेत तुमचे सासरे जागीच ठार झाले आहे. त्यानुसार मुलगी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील नवोदय उड्डाणपुलाजवळ भुसावळहून चिखलीकडे जाणारा एक ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आदळून उलटला. सुदैवाने यात चालक व क्लिनर बालंबाल बचावले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धाग्यांचे बंडल घेऊन हा ट्रक (क्र. एमएच- १८-बीजे-८४२३) राजकोट येथून वर्धा शहराकडे जात होता. भुसावळ शहरातील महामार्गाने जात असताना नाहाटा कॉलेजनजीक नवोदय उड्डाणपुलाजवळ तीव्र गोलाकार वळणावर चालक बबन मोरे (२६, रा. एरंडोल) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरच्या दुभाजकावर जाऊन आदळत उलटला. ट्रकमध्ये धाग्याचे तीनशे बॉक्स होते. यात चालकासह क्लीनर सुरेश पाटील बालंबाल बचावले आहेत. धोकादायक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील हंबर्डीकर चाळ परिसरात शहर पोलिस ठाणे हद्दीतील वयोवृद्धाच्या घरातून चोरट्यांनी ५ लाख ५७ हजारांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची घटना ८ ते ९ नोव्हेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. २६) रात्री शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हंबर्डीकर चाळ परिसरातील हॉटेल घासीलालच्या मागील भागात राहणारे अरुण दोधू चौधरी (६८) हे ८ रोजी दुपारी १२:३० ते ९ रोजीच्या सायंकाळी साडेपाचदरम्यान बाहेर असताना चोरट्यांनी केव्हातरी संधी साधत घराच्या कपाटातून ५ लाख ५७ हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी सर्वत्र मुद्देमालाचा शोध घेतला मात्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर परिसरात १८ लाखाची घरफोडी करणाऱ्या साहिल प्रवीण झाल्टे उर्फ साहिल शेख (रा. पवन नगर, धुळे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन मुक्काम ठोकून धुळ्यातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यास शुक्रवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. रामानंद नगरात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता वनिता जगन्नाथ चौधरी या प्रवचनाला गेल्या असता चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून १८ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घरफोडी दिवसा झाल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची कुंडली काढण्याचे आदेश दिले. ही घरफोडी…

Read More

मेष राशी आज तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा, कुटुंबात अनावश्यक वाद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या मदतीने व्यवसायातील अडथळे दूर होतील. संचित भांडवली संपत्तीत वाढ होईल. महत्त्वाच्या व्यक्तीशी जवळीक वाढेल. आज आर्थिक स्थिती सुधारेल. काही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर झाल्यास आर्थिक लाभ होईल. वृषभ राशी आजचा दिवस आनंदाचा आणि प्रगतीचा असेल. महत्त्वाच्या कामात कोणताही मोठा निर्णय वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊनच घ्या. सामाजिक उपक्रमांबाबत अधिक जागरूक राहा. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना व्यवसायात नफा आणि प्रगतीची संधी मिळेल. मिथुन राशी आज तुम्ही तुमचे काम सोडून मौजमजेत गुंताल. ऐषारामात प्रचंड रस असेल. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. व्यवसायात तुमचे काम इतरांवर सोडण्याची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती लवकरच सरकार स्थापन करणार असून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. याबाबत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत झाली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून दुसरीकडे महायुती सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आव्हाड हे शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी खुलासा केला आहे. आव्हाड ठाण्याचे आहेत. त्यामुळे मित्र म्हणून त्यांना भेट घ्यायची असेल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आव्हाड आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. सामंत म्हणाले की, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. एकनाथ…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. भंडारा- गोंदिया शिवशाही बसला हा अपघात झाला असून त्यात सुमारे १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३० ते ३५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनास्थळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आज शुक्रवारी सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बसचे गोंदियाला जात असताना सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सुवर्ण व्यावसायिकाला देण्यासाठी कारागिराने दिलेले ९७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मणी घेऊन दुकानातील कर्मचारी परस्पर पसार झाला. हा प्रकार दि. १४ ऑगस्ट रोजी घडला. याप्रकरणी दि. २७ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात योगेश भगवान गोयल (३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश पुंडलिक सोनवणे (३२, रा. श्रीकृष्णनगर, विठ्ठल पेठ) हे सोने घेऊन त्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. दि. १४ ऑगस्ट रोजी त्यांनी योगेश गोयल याच्याकडे ऑर्डरचे ९७ हजार ५०० रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे ७८ सोन्याचे मणी दिले. ते सराफ बाजारातील सुवर्ण व्यावसायिकाकडे देण्याचे सांगितले. परंतु योगेश गोयल याने ऑर्डरची डिलिव्हरी न…

Read More