पारोळा : प्रतिनिधी कापूस घेण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याने मापात फसवणूक केल्याने त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. ही घटना आडगाव, ता. पारोळा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी शेकडो ग्रामस्थ एकत्र जमले होते. पोलिस वेळीच पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील आडगाव येथे कापूस घेण्यासाठी पारोळा शहरातील व्यापारी आले होते. मात्र, कापूस घेताना ते मापात फसवणूक करीत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. याबद्दल ग्रामस्थांनी व्यापाऱ्याकडे विचारणा केली. मात्र, व्यापाऱ्याने उडवा- उडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी थेट व्यापाऱ्यालाच चोप देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गावात जमावही जमला होता. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही घटना पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव…
Author: editor desk
मेष राशी व्यवसायात प्रगती आणि प्रगतीची शक्यता आहे. नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. राजकारणात नवे मित्र बनतील. जे फायदेशीर ठरेल. आज व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक मदत मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत उघडतील. वृषभ राशी वैयक्तिक समस्यांवर उपाय शोधण्यात तुम्हाला यश मिळू शकते. वरिष्ठांशी समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. नफ्याचा प्रभाव हळूहळू वाढेल. महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यात अपेक्षित यश मिळणे कठीण होईल.घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. प्रलोभनात अडकून निर्णय घेऊ नका. मिथुन राशी एखादे का वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीने सरकार स्थापन केले आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वी होताना दिसत आहे. अशातच येत्या १५ तारखेला नागपुरात मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती होती. ती माहिती खरी ठरली आहे. येत्या १६ तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच १५ डिसेंबर रोजी नागपुरातच शपथविधी होणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, याउद्देशाने शनिवारऐवजी रविवारी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अवघ्या देशभरात ‘पुष्पा २’ सिनेमाचा धुमाकूळ सुरु असतांना हैदराबाद येथे ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलीसांनी अभिनेता अल्लू अर्जून याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान अल्लू अर्जुन पोलिसांना न कळवता प्रीमियरला गेला होता असा आरोप करण्यात आला होत. ज्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आणि चेंगराचेरीत महिलेचा मृत्यू झाला. शिवाय महिलेच्या मुलाची प्रकृती देखील चिंताजनक आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध विविध…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच धरणगावजवळ आज दि.१३ डिसेंबर रोजी पहाटे बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. धरणगाव तालुक्यातील दोनगाव जवळ असलेल्या स्मशानभूमी जवळ बसवरचा ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात आज दि.13 रोजी सकाळी 6 वाजेला झाला. यात 28 प्रवाशी जखमी झाले असून यामध्ये विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक एमएच १४ बीटी २८८७ नेहमीप्रमाणे १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली गावावरून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली. रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना…
जळगाव : प्रतिनिधी जूनियर कॉलेज संघटनेतर्फे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले NES boys शाळेत शाळेत एका छोटे खाणे कार्यक्रमानिमित्ताने साहेब आले होते. आ.तांबे यांना संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. शशिकांत पाटील सर तसेच उपाध्यक्ष विजयकांत पाटील सर सचिव प्रभाकर पाटील सर तसेच जिल्हा संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. संदीप पाटील सर यांनी सादर केले. विधानसभेत आमच्या मागण्यांच्या सकारात्मक विचार व्हावा असे निवेदन देण्यात आले पदवीधर आमदार यांच्या निधीतून संगणक व पोडियम साहित्य आमदार साहेबांच्या स्थानिक निधीतून शाळांना वाटप करण्यात आले. त्याच प्रसंगी माननीय तांबे साहेबांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोग करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे व स्वतः तंत्रसायक बनावे असा…
जामनेर : प्रतिनिधी बनावट तृतीयपंथींयाना भिक्षा मागताना पकडल्याने चौघांनी बनावट तृतीयपंथीयांना मारहाण केली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. यावेळी या बनावट तृतीयपंथीयाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जामनेर येथील आठवडे बाजार असल्याने भुसावळ येथील तृतीयपंथी तेथे येत असतात. आज काही बनावट तृतीयपंथी भुसावळ रस्त्यावरील विशाल लॉनजवळ भिक्षा मागत असल्याचे पाहून हा प्रकार घडला. लक्ष्मी रेणुका जोगी (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भावना कुंवर, चुटकी कुंवर, रेश्मा कुंवर, दुर्गा कुंवर (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट तृतीयपंथीयांना पोलिस ठाण्यात आणल्याचे पाहून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
जळगाव : प्रतिनिधी नाताळच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने येथील बेकरींसह अन्य आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीत साठवणूक केलेला ३ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा साठा जप्त करण्यात आला आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे. अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके, के. एच. बाविस्कर, श.म. पवार यांनी…
यावल : प्रतिनिधी अंकलेश्वर ब-हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडे जाताना साकळी गावाच्या पुढील वळणावर दुचाकीला वाचवण्याच्या बेतात ट्रक रस्त्यावर उलटला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ट्रकमधील साहित्य रस्त्यावर पसरले होते. परिणामी रहदारीला अडचण निर्माण होत वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर उलटलेले वाहन बाजूला करून रस्ता मोकळा केला. मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर-ब-हाणपूर राज्य मार्गावर यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकळी गावाच्या पुढे वळण आहे. या वळणावरून दुचाकीने (एम. एच १९/सी.बी. ९०२९) एक जण जात होता. भरधाव वेगात जात असताना वळणावर अचानक चोपडाकडून यावलकडे येत असलेला ट्रक (जी. जे. २३/ए. डब्ल्यू, ९९००) हा समोर…
भुसावळ : प्रतिनिधी सुनसगाव येथील ग्रामपंचायत सदस्याच्या गोठ्यास मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. कोणीतरी ही आग लावल्याची चर्चा गावात आहे. आग लावण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत सदस्य व धनगर समाजाचे कार्यकर्ते सुनील परशराम कंकरे यांचा वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गुरेढोरे व म्हशी तसेच चारा व लाकडे ठेवण्यासाठी गोठा आहे. सुनील कंकरे यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने या गोठ्यात म्हशी बांधलेल्या होत्या. ३ रोजी गावात रात्री एका महिलेचे निधन झाल्याने गावातील कार्यकर्ते संबंधितांकडे जागरण करण्यासाठी बसलेले होते. यावेळी मध्यरात्री सुनील कंकरे हे घरी गेले असता मध्यरात्री २ वाजता गोठ्यास आग लागल्याचा प्रकार…

