नागपूर : वृत्तसंस्था नागपूरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आज दि.१७ ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आज नागपूर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहोचले असून यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. वास्तविक परंपरेप्रमाणेच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते माजी मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, छगन भुजबळांनी अजून संपर्क केला नसला तरी छगन भुजबळ अधून-मधून माझ्या संपर्कात असतात, नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत आहे, असेही त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेतर ठरवायला आणखी थोडा वेळ घेतला तर काय हरकत आहे. भुजबळांसह अनेकांच्या बाबतीत मला वाईट वाटले. काही जणांचे जॅकेट वाट बघत असतील अशा लोकांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. अजितपवर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या सरकारने अनेक दिग्गज मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे अनेक नेते देखील नाराज झाले आहे. तर विरोधक देखील आता सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र सोडू लागले आहे. यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जलांगे पाटील यांच्या विषयी टोकाची भूमिका घेतली होती. त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती, असे आमचे मत होते. मात्र आता त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती, असे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर करण्यात आला,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे तर लवकरच खाते वाटप देखील जाहीर होणार आहे. तत्पूर्वी महायुतीतील काही नेते नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. यावर महायुतीमधील नेते उदय सामंत यांनी यावर वक्तव्य केले आहे. खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही. याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. यावरुन सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहेत. या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात मंत्रीपदावरुन वाद सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. यात…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा – यावल रस्त्यावर नावरे फाट्याजवळ कॅटर्सचे साहित्य आणि कामगार घेऊन जाणाऱ्या वाहनाचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघतात ४ महिला जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी धाव घेतली व जखमी महिलांना तेथून उपचाराकरिता जळगावला हलवले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही तरी केटर्सचे साहित्य तसेच तयार जेवण सांडले जावून नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा – यावल रस्त्यावर साकळी गावाच्या पुढे यावल कडे जातांना नावरे फाटा आहे. या फाट्याजवळ सोमवारी सकाळी जळगाव येथून दहिगाव या गावात कॅटर्सचे साहित्य आणि कामगार घेऊन जाणारे वाहन क्रमांक एम. एच. १९ बी.एम. ५७२२ यास अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनातील चार महिला…
जळगाव : प्रतिनिधी बीएचआर’ प्रकरणी दाखल आलेल्या गुन्ह्यात मदतीसाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात तर मविप्र प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी दिल्ली सीबीआयचे पथक सोमवारी जळगावात दाखल झाले. हे पथक या गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांची चौकशी करुन त्यांचे जाबजबाब नोंदविण्यासाठी आठ दिवस ठाण मांडून बसणार आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुनिल झंवर यांना कोठडीत मदत करण्यासाठी चाळीसगावातील एका मद्य विक्रेत्याच्यामार्फत तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी सुरज झवर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव पोलिस ठाण्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण…
अमळनेर : प्रतिनिधी राज्यातील जनतेने महायुतीला मोठे यश दिल्यानंतर महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला आहे तर जळगाव जिल्ह्याला यंदाच्या मंत्रीमंडळात देखील तीन मंत्री पद दिले असून यात अजित पवार गटाचे एकमेव आमदार व माजी मंत्री अनिल पाटील यांना डच्चू दिला आहे. यावर आता आ.अनिल पाटील यांनी मौन सोडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मंत्रिपद मिळालेले नसले तरी माझ्या कामकाजात फरक पडणार नाही. प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करत राहणार आहे. जनसेवेसाठी मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला त्यावर आपली कोणतीही नाराजी नाही, अशा शब्दांत माजीमंत्री तथा आ. अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले…
पाचोरा : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू असून, महसूल पथकाला गुप्त माहिती मिळताच प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गिरड येथून रविवारी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले. यावेळी पथक प्रमुख भडगाव तहसीलदार शीतल सोलट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महसूल सहायक महादू कोळी, लोकेश वाघ यांनी चोख कामगिरी केली. मौजे कराब (ता. भडगाव) येथून दि. १५ रोजी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारा १ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले. मौजे परधाडे (ता. पाचोरा) येथून अवैध गौण खनिज वाळू…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिस वाहन तपासणी करीत आहेत. दोन दिवसांत शहरात १९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे एक लाख १९ हजाराची दंड आकारण्यात आला आहे. यामुळे पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांच्या पथकाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. मुलांच्या हट्टापायी पालक मुलांना दुचाकी देतात मात्र, शाळकरी विद्यार्थी नियमांना बगल देतात. यासाठी पोलिस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहेत. परिवहन विभागानुसार, १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतच असून, रविवारच्या तुलनेत सोमवारी पुन्हा रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली. सोमवारी रात्री पारा ७.८ अंशापर्यंत घसरला होता. दिवसाच्या तापमानातदेखील लक्षणीय घट झाल्यामुळे दुपारच्या वेळेस गारठा जाणवत आहे. दरम्यान, १७ व १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीपासून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम संपूर्ण जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो थंडीच्या काळात घराबाहेर निघणे टाळावे. थंडीपासून बचाव करतील अशीच कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

