Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी  श्री.आयुष प्रसाद सर यांनी जिल्हा महिला बालविकास विभागाच्या मासिक आढावा बैठकीत जिल्ह्यातील बालविवाह निर्मूलन जनजागृती संदर्भात आदेश दिले असता. मा.जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री आर.आर.तडवी सर यांनी जिल्ह्यातील हॉटस्पॉट १७० गावांची निवड केली . जिल्हा महिला बालविकास विभाग व युनिसेफ, एसबीसी – थ्री यांच्या आर्थिक साहाय्याने जळगाव जिल्ह्यातील 50 हॉटस्पॉट गावांमध्ये बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी सर्वप्रथम युनिसेफ एसबीसी – ३ समन्वयकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले यामध्ये बालविवाह निर्मूलनाची संपूर्ण माहिती PPT च्या सहाय्याने दाखवली – कायदा, तरतुदी, निकष, बालविहाचे परिणाम, कारणे, व NFHS -4 आणि NFHS -5 नुसार जळगाव जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी दि.30 रोजी सकाळी दिवे अंजुर गावाच्या हद्दीत एका वेरणा चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. नाशिकच्या दिशेने जाणारे वाहन दरम्यान दिवे अंजूर भागात आली असता, अचानक वाहनाच्या पुढील भागाला आग लागली. अचानक धूर निघायला लागल्यावर वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवत वाहन थांबवले आणि इतर सहप्रवासी बरोबर बाहेर पडल्याबरोबरच वाहनाने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे वाहनाचा पुढील भाग जळून खाक झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना भेट घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच निर्णय होतो. याच्या मागे काही लपले आहे, हा संशोधनाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की शरण आला म्हणजे गुन्हा संपत नाही. 14 गुन्हे असूनही बॉडी गार्ड घेऊन फिरतो. या सगळ्या आरोपींना मोक्का लावणार असे तुम्ही म्हणाला होता, त्यावर मोक्का लावणे महत्त्वाचे आहे. संभाजीराजे म्हणाले, खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केली आणि नंतर बेल घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही सहन करणार नाहीत. तुम्ही मोका कसे लावणार, खुनाचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठे बंड करून महायुतीसोबत आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला प्रंचड बहुमत मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी आग्रही दिसत असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. विधानसभेला पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार, खासदार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ८, ९ जानेवारीला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घ्यावा यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करून एकच राष्ट्रवादी जोमाने वाढवावी अशीही त्यांची भूमिका आहे. त्यावर शरद…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उपसरपंच पदी शिवसेनेच्या शोभाताई दिलीप माळी पाटील यांची दि 30 डिसेंबर 2024 रोजी उपसरपंच पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामपंचायत मध्ये जाऊन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी केला. या प्रसंगी युवा सेनेचे उपतालुका प्रमुख उगलाल पाटील,तालुका संघटक हेमंत भाऊ चौधरी,युवा सेनेचे अजय महाजन,दिलीप महाजन, रविंद्र माळी प्रशांत माळी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख धनराज माळी सर,भावडू पाटील तसेच ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपस्थित होते. ग्रामसेवक पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. शोभाताई यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब,युवा नेते प्रतापराव पाटील,तालुका प्रमुख देविदास पाटील,गजानन नाना पाटील,मोती आप्पा पाटील, विलास महाजन,विजय महाजन पप्पू…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी जळगाव चौफुली परिसरातील रहिवासी असलेल्या ऊसतोड मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सुरेश उदागे (३२, वरखेडी नाका, जळगाव चौफुली, पाचोरा) याने घरी कुणीही नसताना दुपारी ४:३०च्या सुमारास राहत्या घरी रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हा ऊसतोड कामगार व वाहन चालक होता. गेल्या महिन्याभरापासून सुनील हा ऊसतोड कामावरून घरी परत आला. होता. त्याची पत्नी व लहान २ मुले, मुलगी हे बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. सुनील हा आई व बहीण यांच्यासोबत राहत होता. आई व बहीण हे बाहेर गेल्याची वेळ साधून त्याने छताला रुमाल बांधून गळफास घेतला व जीवन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खून, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश ऊर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२३), पवन ऊर्फ बद्या दिलीप बाविस्कर (२३) व आकाश ऊर्फ आक्या ब्रो रवींद्र मराठे (२२, सर्व रा. तुकारामवाडी) या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीदेखील वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामध्ये तुकारामवाडी परिसरातील आकाश ठाकूर याच्यावर सात, पवन बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश मराठेविरुद्ध खुनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या हद्दपारीचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (५४, रा. खोटेनगर) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी (३० डिसेंबर) दुपारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप वानखेडे हे गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात कॅफोसह गेले होते. जेवणाचा डबा नसल्याने महाराष्ट्र बँकेलगत ते पराठे घेण्यासाठी आले. पोलिस निवासस्थानाजवळ वाहन लावून ते पायी रस्ता ओलांडत असताना क्रीडा संकुलाकडून भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. यात ते हवेत फेकले जाऊन खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना खासगी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अवैध वाळू चोरीविरुद्ध कारवाई सुरूच असून तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैधपणे वाळूचे उत्खनन करणारे मशीन महसूल पथकाने जप्त केले. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कालिंका माता चौकात झालेल्या अपघातानंतर वाळूविरुद्ध कारवाई सुरू आहे. त्यात तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू असताना महसूल पथकाने रात्री कारवाई केली. यावेळी नदीपात्रात लोखंडी वायर रोपफावडा मशीन आणि उपसा केलेली पाच ब्रास वाळू आढळून आली. पथकाने हे सर्व साहित्य जप्त केले. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांनी तालुका पोलिस…

Read More