मेष राशी आज तुम्ही सर्वांचे उत्साहाने स्वागत कराल आणि आदर राखाल. नफ्याची टक्केवारी वाढलेली राहील. जीवनशैली सुधारण्यात रस असेल. कौटुंबिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. लोकांशी संपर्क वाढवण्यात रस असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि सहवास मिळेल. वृषभ राशी सामायिक कामात नवीन करार होण्याची शक्यता आहे. गोड वागणुकीमुळे नफा वाढेल. नोकरीच्या क्षेत्रात कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. मनामध्ये आनंद आणि समाधान वाढेल. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. तुमच्या अडचणी आणखी वाढू देणार नाहीत. मिथुन राशी आर्थिक बाजू सुरळीत राहील. व्यावसायिकांना भेटाल. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. हरवलेली मौल्यवान वस्तू सापडू शकते. उद्योग सुरू करण्याच्या योजनेला गती…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था देशातील भाजप सारख्याच पक्षात चहा विकणाऱ्या मुलगा हा एका राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. कारण भाजप हा लोकशाहीने चालणारा जनतेचा पक्ष आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. आज महाराष्ट्रात भाजपचे 1 कोटी तर देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. सदस्यता मोहिम ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भाजपला जगातील सर्वांत मोठा पक्ष बनवण्याचे अमित शहा यांचे टार्गेट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात 2300 हून अधिक पक्षांची नोंदणी आहे. यामध्ये बोटावर मोजण्या इतके पक्ष हे राष्ट्रीय आहेत. भाजपा आणि भाकप…
नागपूर : वृत्तसंस्था जगभरात सन २०१९ मध्ये कोरोना आजाराचा हाहाकार सुरु झाला होता तर आता पुन्हा एकदा नव्या विषाणूमुळे चीनमध्ये पुन्हा हाहाकार सुरु झाला असून राज्यात देखील आता चिकनगुनियाने हातपाय पसरले आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढली आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली आहे. राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहे. मुंबईसह अनेक शहरात या रोगाने डोके वर काढले आहे. तर नागपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. थंडीचा कडाका पु्न्हा वाढला आहे. तर मुंबई सारख्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. पालिका क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारात…
जळगाव | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे.या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत.अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गावकारभारी दबावाखाली असतात.सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून राज्यातील ग्रामपंचायती एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहेत,असे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्व.संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन येत्या गुरुवारी 9 जानेवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचे संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे गेल्या आठवड्यात दि. २८ रोजी किराणा व्यापाऱ्याची ९६ हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली होती. किराणा दुकानात काम करणाऱ्या युवकाने चोरीचा खोटा बनाव रचला आणि त्यात स्वतः अडकला आहे. कैलास शंकर सटाले (३५, मुंदखेडा, ता. जामनेर) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पहूर बस स्थानक परिसरातील जळगाव ते छत्रपती संभाजी नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या किराणा दुकानातील मालविक्रीची ९६ हजार रुपयांची रक्कम वर्धमान स्टील दुकान मालक उज्ज्वल सिसोदिया यांच्याकडे जमा करण्यासाठी जात असताना, दि. २८ रोजी संध्याकाळी अज्ञात चोरट्यांनी त्याच्या हाताला झटका मारून बॅगसह रक्कम लांबविल्याची फिर्याद…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात झालेल्या वादातून पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली नाही, म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ३ रोजी घडली आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, त्यानुसार ३ रोजी सकाळी ९ वाजता ही महिला गच्चीवर कपडे टाकायला गेली होती. तिची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी लहान भावाला झोक्यात झोपवून झोका देत होती. मुलीचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने महिला घरात आली असता भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे हा झोक्याजवळ उभा दिसून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. मुलीने सांगितल्यानुसार या महिलेने जाब विचारला असता भाऊसाहेब याची आई…
जळगाव : प्रतिनिधी दीड महिन्यापूर्वी गणेश कॉलनीत बांधकामाच्या ठिकाणी इमारतीवरून पडून मुलाचा मृत्यू झाला तर आता डोळ्यासमोरच पतीचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाला. पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) असे मृत पतीचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता लमांजन येथे गिरणा नदीपात्रात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाईसह शनिवारी खर्ची (ता. एरंडोल) येथून लमांजन (ता. जळगाव) येथे नातेवाइकांकडे पायी चालतच गेले. गिरणा नदी ओलांडत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यामध्ये ते पडले. पाणी खोल असल्याने ते बुडायला लागले. पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी येथे किरण बापू माळी (३५) यांचा अल्पशा आजाराने दि. ३ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर माळी यांची मुलगी निधी (वय १०) हीनेच वडिलांचे अंत्यसंस्कार केले. बालिका दिनीच ही घटना घडली. तिने मन खंबीर करत आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिला. सविस्तर वृत्त असे कि, साकळी येथील महाजन वाडा भागातील रहिवासी असलेल्या किरण बापू माळी या उच्चशिक्षित युवकाची अल्पशा आजाराने दि. ३ रोजी भल्या पहाटे तीन वाजेदरम्यान जळगाव येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. या घटनेने गावात शोककळा पसरली. त्यानंतर शुक्रवारीच दुपारी १२ वाजता मृत किरण माळी यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. किरण माळी यांची एकुलती एक मुलगी…
मेष राशी तुमच्या कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगतीसाठी चांगली गती राखाल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमचे काम मनापासून करा. एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. कोर्टाच्या कामात थोडे सावध राहा. वृषभ राशी महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन काम सुरू करू शकाल. तुमच्या कार्यशैलीने सर्वजण प्रभावित होतील, प्रशंसा होईल. आधीच प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मिथुन राशी आर्थिक घडामोडी वाढतील. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. सर्वांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नोकरीत बढती मिळेल. जुने प्रश्न सुटतील. यशाचे नवे मार्ग खुले होतील. कर्क…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची परदेश यात्रेची गोपनीयता संपणार आहे. ते कुठे प्रवास करतात, कोणासोबत प्रवास करतात आणि तिकीटासंबंधीची संपूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध असणार आहे. कारण, विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे १९ प्रकारचे वैयक्तीक तपशील सरकारला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून सुरु होणार आहे. परदेशात जाणारे प्रवासी कसे, कधी आणि कुठे प्रवास करत आहेत. कोणाच्या पैशावर प्रवास करत आहेत, अशा प्रकारची माहिती सरकारसोबत सामायिक करणे आवश्यक आहे. विमान कंपन्यांना ही माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डेटा शेअरिंग ब्रिजच्या या प्रणालीचे नियम २०२२ पासून अस्तित्वात असताना, आता १…

