Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.२०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने २२ नवीन जिल्हे व ४९ नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल तसेच स्थानिक पातळीवर विकासाच्या प्रक्रिया गतिमान होतील, असा सरकारचा विश्वास आहे. महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी फक्त २५ जिल्हे अस्तित्वात होते. कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी आज ६०हजार मताधिक्याने निवडून आलो आहे. कार्यकर्त्यांची श्रीमंती हेच माझे खरे बळ आहे. “रस्ते, पाणीपुरवठा, आणि मूलभूत सुविधा ही विकासाची खरी ओळख आहे. गाव विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी नम्रतेने व प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या पाठीशी हा भाऊ नेहमीच भक्कमपणे उभा आहे, आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि विश्वासाने मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून, यापुढेही ती विश्वासार्हता कायम ठेवण्याचा माझा निर्धार आहे,”आपला विश्वास…

Read More

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सरपंच देशमुख खुनाच्या अनेक अपडेट समोर असतांना आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापूर्वी भाजपचे अधिवेशन शिर्डी येथे झाले यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर आता शरद पवारांनी देखील केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार म्हणाले कि, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहे. देशाच्या इतिहासात अनेक जण गृहमंत्री झाले पण आतापर्यंत कुणालाही तडीपार करण्यात आले नाही, जेव्हा अमित शहा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सहकार्य घेतले. अमित शहांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर देतील. 1978 मध्ये मी मुख्यमंत्री असताना गृहमंत्री कुठे होते माहिती नाही. त्यांना माहिती नसेल पण जनसंघाच्या…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहे. त्यातच काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास दोन तासांपासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी “माझ्या भावाला ज्यांनी संपवलं. ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना फाशी द्या”, अशी मागणी केली. आता याप्रकरणी नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना दि.१२ रोजी देखील अशीच एक खंडणीची घटना घडली आहे. कमरेला लावलेला चाकू दाखवून ये दारुकी दुकान चालू रखनी है, तो तुझे डेली दारु का बंफर नही दिया तो सबको मार डालूंगा, तुम्हारी दुकान चलने नही ढुंगा. असे म्हणत संशयित रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ कालीया याने खंडणी म्हणून दारु घेवून गेल्याची घटना दि.१२ रोजी दुपारच्या सुमारास ईच्छादेवी चौकातील वाईन शॉपवर घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आकाशवाणी ते ईच्छादेवी चौफुलीदरम्यान असलेल्या अशोका लिकर शॉपीवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सतगुरु नगरासी गेंदालाल मिल परिसरातून चोरट्याने दोन दुचाकी चोरुन नेल्या. ही घटना उघडकीस आलनंतर रविवारी एमआयडीसी व शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि जगवानी नगरात शुभम सागर माने (वय २५) हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास (एमएच ०९, डीएल ३८९१) क्रमांकाच्या दुचाकीने सतगुरु नगरात आले होते. याठिकाणाहून त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी सागर माने याने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रेल्वे विभागात नोकरीस असलेले कल्पेश कुमार राजेंद्र सोनवणे (रा. निमखेडी रोड) हे दि. ११ जानेवारी रोजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या महिन्यात जळगावातून दुचाकी चोरून पसार असलेल्या विजय श्रीराम बारेला (वय २४, रा. धुरकूट, जि. खरगोन) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देविदास कॉलनीतील भिकन दामू बोरसे यांची दुचाकी दि. १० डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याचा तपास करीत असताना ही दुचाकी विजय बारेला याने चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांनी बारेला याला…

Read More

जामनेर : प्रतिनिधी डंपर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील भुसावळ रोडवरील कांग नदीच्या पुलावर १३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून डंपरचा चालक फरार झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, टाटा कंपनीचे डंपर (एमएच १२. व्हीबी ८६७७) हे जामनेर कडून भुसावळकडे तर हिरो स्पेलंडर कंपनीची दुचाकी (एमएच-४८ बीएस- २३७५) ही भुसावळ कडून जामनेरकडे येत होती. हे दोन्ही वाहने कांग नदीच्या पुलावर आल्यावर त्यांच्यात अपघात झाला. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प होवून वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तर गंभीर…

Read More

मेष राशी पैसा आणि मालमत्तेचे प्रश्न सोडवले जातील. व्यावसायिक प्रवासासाठी चांगली शक्यता निर्माण होईल. तुम्हाला कोणी काय म्हणेल ते ऐकू शकणार नाही. वेषभूषा करण्यात रस असेल. राजकारणात वरिष्ठ अधिकाऱ्याशी जवळीक वाढेल. राजकारणात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. वृषभ राशी व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला दूरच्या देशातून एखाद्या प्रिय व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू मिळतील. कुटुंबातील काही शुभ कार्यक्रमावर पैसे खर्च होतील. नोकरीत बढतीसह पगार वाढेल. वाहन खरेदीची तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल मिथुन राशी आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या निकट जाल. मित्रांच्या भेटीनंतर आनंद वाढेल. प्रेमविवाहाची शक्यता बळकट होईल. प्रियजनांची साथ राहील. पर्यटन आणि मनोरंजनाचा आनंद घ्याल. समाजात तुम्हाला मान-सन्मान…

Read More