Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी साकरी गावात किरकोळ कारणावरून एका तरुणावर आठ जणांच्या टोळक्याने संगनमत करून निघृण मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सुरेश तायडे (वय ४८, रा. तठोरा, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या दरम्यान साकरी गावातील किन्ही रोडवर, खोकली माता मंदिरासमोर ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा हेमराज हा साकरी गावात कार घेऊन आला, या कारणावरून आरोपींनी वाद उकरून काढला. त्यानंतर प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आम्हीच जळगावचे डॉन… आत्ताच जेलमधून बाहेर आले असून कोणी पुढे आले तर मुडदे पाडू असे म्हणत चार ते पाच जणांच्या टोळके हातात कोयते घेवून अरुणाबाई करतार पवार (वय ५०, रा. सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा, ता. जळगाव) यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. ही घटना दि. २१ रोजी दुपारी ४ वाजता कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगरात अरुणाबाई पवार या वास्तव्यास आहे. दि. २१ मार्च रोजी जून्या भांडणाच्या कारणावरुन चार ते पाच जणांच्या टोळके हातात कोयत्या सारखे हत्यार घेवून पवार यांच्या घराचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भांडण पाहण्यासाठी थांबल्याचा राग आल्याने वसीम शेख शब्बीर शेख (वय ३७, रा. बिलाल चौक, तांबापुरा) या तरुणाला चापटा बुक्क्यांसह हातातील कडे मारुन जखमी केले. ही घटना दि. २२ मार्च रोजी मेहरुण परिसरातील घरकुल घरांसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील मेहरुण परिसरातून वसीम शेख शब्बीर शेख हे जात असतांना रस्त्यामध्ये प्रकाश उर्फ दादू दगडू कालपे, धनराज भिका हटकर यांच्यात वाद सुरु होते. त्यांच्यातील वाद पाहत असल्याचा दोघांना राग आला. त्यांनी शिवीगाळ करीत वसीम शेख याला मारहाण केली. यावेळी धनराज हटकर याने त्याच्या हातातील लोखंडी कडे वसीम शेख याच्या गालाला मारुन गंभीर जखमी केले.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२४ मार्च २०२६ मेष राशी आज तुम्ही तुमचा बहुतेक दिवस प्रवासात जाईल. कुटुंबातील जवळचे नातेवाईक आज तुम्हाला भेटायला येऊ शकतात. एखाद्या जवळच्या मित्राचीही अचानक भेट होईईल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आधीचे अपयश धुवून चांगलं यश मिळेल. मेष राशी आज तुम्ही तुमचा बहुतेक दिवस प्रवासात जाईल. कुटुंबातील जवळचे नातेवाईक आज तुम्हाला भेटायला येऊ शकतात. एखाद्या जवळच्या मित्राचीही अचानक भेट होईईल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आधीचे अपयश धुवून चांगलं यश मिळेल. मिथुन राशी आज नव्या नोकरीची, मोठ्या पगाराच्या कामाची ऑफर मिळेल, नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला कामात हमखास…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक अभिमानास्पद घटना समाजात चर्चेचा विषय ठरली आहे. मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर, छोट्या भावाने आपल्या भावजयीशी विवाह करून उघड्यावर पडलेल्या भावाच्या मुलांच्या डोक्यावर पुन्हा पितृछत्र ठेवले. प्रफुल्ल पाटील या तरुणाने या धाडसी निर्णयाद्वारे कुटुंबातील नातेसंबंध, माणुसकी आणि जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण साकारले आहे. किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील अष्टपाल पाटील यांचे गत महिन्यात प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आणि दोन लहान मुलं — ८ वर्षीय मुलगी व ६ वर्षीय अंध मुलगा — अचानक उघड्यावर पडले. वडिलांचे छत्र हरवल्याने संपूर्ण कुटुंब संकटात आले. भाकऱ्याच्या या दुर्दशेचे निराकरण करण्यासाठी धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा राहिलेला वाद आता राज्याच्या राजकारणातही उग्र रूप घेताना दिसत आहे. सत्ताधारी शिवसेना आणि मित्रपक्ष भाजप यांच्यातील मतभेद सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेतून उफाळून आले. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच आपली सत्ता प्रस्थापित केली, मात्र या प्रक्रियेत मंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली, ज्यामुळे त्यांना जखम झाली. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आज विधिमंडळात आक्रमक झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली तक्रार मांडून भाजपकडून सुरु असलेली “गळचेपी” आणि दुय्यम वागणूक सहन न करता, अन्यथा राजीनामे देण्याचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया देत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी या प्रकरणातील मंत्र्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी केली आणि त्यांच्या राजीनाम्यांचा आग्रह धरला. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे, तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्य रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु या प्रकरणात काही उच्चपदस्थ नेत्यांचा हात असल्यामुळे राजकारण तापले आहे. वडेट्टीवार म्हणाले, “पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला भोंदूगिरीचा बाजार आणि त्याला मिळणारे राजकीय व प्रशासकीय संरक्षण…

Read More

भडगाव : प्रतिनिधी शहरातील जुन्या पारोळा रस्त्यावर पोलिसांनी एका कारमधून १० पुडी अमली पदार्थ (ड्रग्स) हस्तगत केले आहे. या कारवाईत एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, तालुक्यात अमली पदार्थ हा पहिलाच प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथून एका कारमधून (एम.एच. ०१ बी.बी. २२१६) अमली पदार्थचा (ड्रग्स) साठा भडगावच्या दिशेने येत होता. या माहितीच्या आधारे भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास संशयास्पद कार अडवून पोलिसांनी तिची कसून तपासणी केली असता, त्यात १० पुडी अमली पदार्थ एमडी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कार आणि त्यातील आरोपी योगेश हरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जैनाबाद परिसरात केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद) यांचा सोमवारी (दि. २३) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जैनाबाद परिसरात नितीन काळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. आई-वडील, पत्नी, एक मुलगा तसेच भाऊ-बहीण असा त्यांचा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना गोवा येथे कटलरी दुकानात नोकरी मिळाली होती. तेथे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, सुट्टीसाठी ते…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे दि. २२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत एरंडोल येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा आरटीओ एजंट मंगेश शिवदास पाटील वय ६६, रा. पाटीलवाडा, एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी बोगद्या अभावी यापुर्वी अनेक अपघात झाले असून त्याच ठिकाणी आणखी एका निष्पापाचा बळी गेला आहे. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षा आणि प्रस्तावित बोगद्याच्या प्रलंबित कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील हे रविवारी दुपारी आपल्या दुचाकीने (क्र.एम एच १९ डि एक्स १०९४) शेताकडे जात होते. अमळनेर – नाका परिसरातील कासोदा फाटा क्रॉसिंग – ओलांडत असताना…

Read More