मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पदवीधार तरुण तरुणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ आज (दि.५) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील पदवीधरांनी महिन्याला ६१ हजार रुपये मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. ६० तरुणांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये मिळणार मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ६० तरुणांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या फेलोंना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे” देखील…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. आता यातील 43 जणांनी तहसीलदारांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळवल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारात 11 अशा व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार नवीनचंद अशोक भावसार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये 43 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. बुशरा खान मोहम्मद इस्लाउद , मोहसिन चांद मोहम्मद, निगार सुलताना हाफिज खान, समीर खान अयुब खान, नसरीन बानो आयुब खान, अफजल खान, आयुब खान, नदीम खान, हाफिज खान, शिरीष बानो फरीक शहा, आरिफ खान इसा खान,…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे अनेक अडचणीत आल्यानंतर आज पुन्हा एकदा वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. मुंडे यांनी या आदेशांना माझगाव कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर करत आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला. पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला आहे. करुणा यांची मुले मुंडे यांची आहेत, पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी यासंबंधी केला आहे. माझगाव कोर्टाने गत 29 मार्च रोजी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता वक्फ भूखंड घोटाळ्यात हात असणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवरून महायुती सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयकावर आपली मोहोर उमटवली आहे. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. तसे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. त्यांच्या मते, वक्फ कायदा अस्तित्वात आल्यानंतर वक्फ भूखंड घोटाळ्यात समावेश…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दि.०४ दिला आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे की, ५ ते ८ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट परिस्थिती असू शकते, ज्यामुळे उष्णता वाढू शकते. IMD ने शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. ५ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट हवामान राहील. हवामान विभागाने सांगितले की, पुढील सहा दिवस वायव्य भारतात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे आणि दिल्लीतील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. याचा परिणाम दक्षिण हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते सक्रीय झाले असून त्यासाठी दिग्गज नेत्यांच्या भेटी गाठी देखील सुरु झाल्या आहे तर आज शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भेटीचे नेमके कारण समोर आले नसले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यानुसार आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळीच शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट…
चाळीसगाव : प्रतिनिधी दरवर्षी तालुक्यातील हजारो आशा अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात त्या आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन तर्फे आयोजित केला जाणारा भाऊबीज सोहळा अखेर मराठी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात उत्साहात संपन्न झाला. तालुकाभरातून उपस्थित असलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या या रक्ताच्या नाही पण दरवर्षी माहेरपण साजरे करणाऱ्या लाडक्या भावाचे औक्षण करत आशिर्वाद दिले. आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील सर्व बहिणींना साडी भेट देत त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्ती केली. . राज्य शासनाने २०२४ पासून लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची योजना सुरु केली मात्र त्याच्या ४ वर्ष अगोदरच आमदार मंगेश चव्हाण यांनी १५०० हून अधिक आशा अंगणवाडी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा नेहमीच विविध कारणाने चर्चेत येत असतांना आता जळगाव जिल्हा परिषदेत बड्या अधिकाऱ्याच्या नावाने लाच घेणाऱ्या अधिकारीला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला आणि दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास लाच घेतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागातील काहींची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. अति.…
भुसावळ : प्रतिनिधी रस्त्याने पायी जात असलेल्या शहरातील ४० वर्षीय तरुणाला अज्ञात दोघांनी मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड व १४ हजाराचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार २५ मार्चला रात्री ११ वाजता घोडेपीरबाबा दर्याजवळ घडला होता. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवर मनोज रामचरण शर्मा (वय ४०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २५ मार्चला रात्री ११ वाजेच्या सुमारास मनोज शर्मा हे शहरातील नाहाटा चौफुली येथून घरी पायी जात होते. दरम्यान, घोडेपीर बाबा दर्गाजवळ अज्ञात दोघांनी त्यांना अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि दोन हजारांची रुपयांची रोकड…
भडगाव : प्रतिनिधी भडगाव शिवारात एरंडोल रस्त्यावर बिबट्याचे लहान पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. त्यामुळे या परिसरात बिबट्या मादीचा वावर असावा, असा संशय नागरिकांना आहे. यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात नेहमी बिबट्याचा वावर असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. भडगाव, कृषी विभाग परिसर, पिंपळगाव, आमडदे शिवार या भागांमध्ये बिबट्याचे वेळोवेळी दर्शन झाले आहे. अनेक वेळा पशुधनाला बिबट्याने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव-एरंडोल रोडवर बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. या पिल्लावर प्रथमोपचार करून नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष…

