जळगाव : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच आत्महत्या केली. ममुराबाद व पाचोरा येथे झालेल्या या घटनांमुळे दोघांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. भावेश मधुकर महाजन (वय १९, रा. एरंडोल) आणि ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील (१८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना अनुक्रमे ४२ व ४९ टक्के गुण मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथे राजीव गांधी काॉलनीत बहिणीकडे आलेल्या भावेश याने बहिणीच्या घरीच गळफास घेतला. तो एरंडोल येथे डीडीएसपी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. बहीण आणि मेहुणे विशाल महाजन हे पुणे येथे लग्नानिमित्त गेले होते. भावेशची दुसरी बहीण…
Author: editor desk
मेष राशी आज कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्या नातेवाईकांशी समन्वय ठेवा. निरुपयोगी वादविवाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही जे काही बोलाल ते काळजीपूर्वक विचार करून बोला. काम पूर्ण होईपर्यंत त्यावर चर्चा करू नका. वृषभ राशी आज जमा केलेल्या पैशाचा गैरवापर करण्याऐवजी त्याचा चांगला वापर करा. जेणेकरून तुमचे भविष्य आनंदी होईल. मालमत्तेशी संबंधित खरेदीसाठी परिस्थिती अनुकूल नाही. या संदर्भात काळजीपूर्वक विचार करा आणि निर्णय घ्या. मिथुन राशी आज तुम्हाला देवाच्या पूजेमध्ये कमी रस असेल. मनात नकारात्मक विचारांचा ओघ राहील. सकारात्मक विचार वाढवण्यासाठी, तुमच्या देवाची पूर्ण भक्तीने पूजा करा. प्रेमाच्या नात्यात प्रेम आणि शंका येऊ देऊ नका. कर्क राशी आज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केंद्र सरकारवर पहलगाम हल्ल्यानंतर कोणतेही ठोस पाऊल न उचलण्याचा आरोप केला. हे सरकार पहलगा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेणार नाही. ते केवळ विमाने व रणगाडे पळवून डिझेलची नासाडी करताना दिसून येत आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गत 22 एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह एकूण 26 पर्यटक मारले गेले होते. या घटनेनंतर भारत- पाकमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते सोमवारी येथे…
पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. निकाल जाहीर होण्याआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावुक झाली.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण होते. वडिलांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुखांची कन्या वैभवी मोठ्या हिमंतीने लढत आहे. या कठीण परिस्थितीतही वैभवीनं बारावीची परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. संकट काळात वैभवीने अभ्यास करुन बारावीमध्ये 85.33 टक्के गुण मिळवले आहेत. निकालाआधी माध्यमांशी संवाद साधत वैभवी म्हणाली की, ‘माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाहीत. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमध्ये बिघाडी होत असल्याचे वक्तव्य मंत्री करत असल्याचे महायुती सरकारमध्ये देखील वाद सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मी अंगावर घेतले तर पूर्णपणे घेतो, कसली फिकीर करत नाही. त्यामुळे मला अजून बंगला मिळाला नाही, लय अन्याय होतोय माझ्यावर, अशी खंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. ‘पण मी ७२ व्या मजल्यावर राहतो आणि आज इथून झोपडपट्टी बघतो, ज्या झोपडपट्टीतून मी आधी मोठ्या इमारती पाहायचो’, असंही शिरसाट पुढे म्हणाले. बदलापूर शहरात शतकोत्तर शिवजयंती साजरी केली जाते आहे. ९८ वर्षांपूर्वी बदलापुरात साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. ३ मे १९२७ रोजी हा कार्यक्रम…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी १ ते दीड वाजेच्या सुमारास मालवाहू रिक्षा आणि प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. यात ट्युशनला जात असलेली सावदा येथील एका डॉक्टरांची १२ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे. तर इतर २ विद्यार्थ्यांसह एक प्रवासी गंभीर जखमी झाला. फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अदिती सोपान खडसे (वय १२, रा. सावदा ता. रावेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची ती कन्या आहे. अदितीच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे. रविवारी दि. ४ रोजी प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्लू…
जळगाव : प्रतिनिधी चारा घेण्यासाठी जात असल्याचे सांगून शेतात गेलेल्या भरत रतन वाघ (३०, रा. बिलवाडी, ता. जळगाव) या पशुपालकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (४ मे) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जाचे ओझे वाढत गेल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बिलवाडी येथील रतन वाघ यांचा दुग्धव्यवसाय आहे. बचत गटासह पतसंस्थेकडून कर्ज काढून त्यांनी म्हशी खरेदी केल्या होत्या. मात्र, त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते. रविवारी वाघ हे गुरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेले होते. तेथे त्यांनी झाडाला दोरीच्या…
जळगाव : प्रतिनिधी आपल्याच घरातून बाहेर आल्याच्या संशयावरून राजेंद्र हरिचंद्र सपकाळे (४०, रा. समता नगर) यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्याने दगडाने मारहाण केली. ही घटना ३ मे रोजी समता नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. सेंट्रिंग काम करणारे राजेंद्र सपकाळे हे नळाला पाणी आल्यामुळे मोटार लावत होते. शेजारच्या दाराजवळ असलेला कॉक सुरू करण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी सपकाळे हे आपल्याच घरातून बाहेर आले असा संशय शेजारी राहणाऱ्यास आला. या कारणावरून सपकाळे यांना गच्चीवरून दगड मारून फेकले. यामुळे त्यांच्या पाठीवर आणि हातावर दुखापत झाली. याचा जाब विचारला असता त्यांना मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी राजेंद्र सपकाळे यांनी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात २३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जळगावचे डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या प्रकरणात अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शाहूनगरात शहर पोलिस ठाण्याने टाकलेल्या धाडीत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यामधील मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत याकुब याचे नाव समोर आले. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता, भुसावळ येथील अन्सार भिस्ती, वसीम खान यांची नावे समोर आली. वसीम खान याच्या घराची झडती घेतली असता, घरात २३…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याकडून मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याचा प्रकार दोन रोजी घडला. घटनास्थळी वन विभागीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली झालेल्या प्रकाराने २ रोजी जनार्दन तुकाराम महाजन यांचे शेत गट नंबर ११२ दहिगाव शिवार मध्ये यादव कुटुंब मेढ्यांसह मुक्कामी आहेत. प्रत्यक्षदर्शी मेंढपाळांनी बिबट्या झाडावरून उतरताना बघितला त्याने लागलीच त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्यास लंपास केले, तर काही वेळातच बाळू रमेश माळी यांच्या शेतातही मेंढपाळाची एक बकरी लंपास केली. घटनास्थळाजवळ उमटलेले ठसे हे तडसाचे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे, मात्र पाहिलेला बिबट्याच होता असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे सध्या शेतकऱ्यांना मजूर मिळणे…

