नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या आंदोलनामुळे मनसे पक्ष चांगलाच चर्चेत आला असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाच्या विषयावर भाष्य केले. त्यानंतर नाशिक येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.9) रोजी गोदावरी नदीवरील रामकुंडात डुबकी मारत आंदोलन केले. गोदावरी नदीचे पावित्र्य राखत गोदा प्रदूषणमुक्त न झाल्यास मनपा प्रशासनाला शहरातील प्रत्येक नदीतील पाणी प्राशनासाठी दिले जाईल. तसेच याच नदीतील दूषित पाण्याने अंघोळ घातली जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. गोदावरी नदीसाठी मनपा प्रशासनाकडून स्वच्छतादूत नेमून आदी उपक्रम राबवूनही स्वच्छता मोहिमेवर प्रचंड खर्च करण्यात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी दिनांक 9 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आकाशवाणी चौक येथे आंदोलन करण्यात आले केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल पासून गॅस दरवाढीत मनमानी पद्धतीने लागू केलेली असून या दरवाढीने जनतेस असंतोष निर्माण झाला आहे केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल पासून गॅस दरवाढीत मनमानी पद्धतीने लागू केलेली असून या दरवाढीने जनतेस असंतोष निर्माण झाला आहे. आकाशवाणी चौक येथे रस्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात आले आंदोलनात भीक लागलेल्या सरकारसाठी नागरिकांकडून भीक जमा करून सरकारला पाठवण्यात येतील. सदर आंदोलनात केंद्र सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या व केदारवाडी लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. हातात लाकडी दांडके घेऊन तरुणाच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याच जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी भडगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयित बाप आणि मयताच्या भावाला अटक याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी- सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि.…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित बांगलादेशी घुसखोरांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा-२०२४ निवडणूक प्रचार व आचारसंहिता काळात माेठ्या प्रमाणावर बाेगस जन्म दाखले दिल्याचे समोर आले आहे. याची चाैकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आतापर्यंत अशी २ लाख २३ हजार प्रकरणे उघडकीस आली, अशी माहिती भाजपचे वरिष्ठ नेते किरीट साेमय्या यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी ८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील एका घरातून पाच लाखांचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव रूपचंद पाटील यांच्या घरातून हे पाच लाखांचे दागिने अज्ञाताने चोरून नेले होते. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनचे सपोनि. प्रकाश काळे आणि कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरविली. तपासामध्ये संशयित म्हणून आनंदराव पाटील यांच्या शेजारीच राहणाऱ्या राजेंद्र किसन पाटील याला ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…
जळगाव : प्रतिनिधी नांद्रा बुद्रुक गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. यात दंगलीचेही कलम लावण्यात आले आहे. सोमवारी हा वाद झाला. या प्रकरणी तुळसाबाई बळीराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी चंद्रभान किटकुल सोनवणे, रवींद्र चंद्रभान सोनवणे, कोकिळा सोनवणे, मंगला सोनवणे, शोभा सोनवणे, रत्ना सोनवणे यांनी तुळसाबाई यांना जुन्या वादातून शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तुळसाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिस हवालदार अभिषेक सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल आहे. दोन्ही…
जळगाव : प्रतिनिधी दाणा बाजार भागातील एका बँकेच्या समोरून जात असताना, अज्ञातांनी महिलेची पर्स लांबवून, त्यातील ३८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७वाजता घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता एकनाथ वाणी (वय ५०, रा. पाटीलवाडा) या पतीसह शोभायात्रा पाहण्यासाठी आल्या होत्या. मिरवणुका पाहून झाल्यानंतर दाणा बाजार परिसरातील एका बँकेच्या ठिकाणी काही अज्ञातांनी सुनीता वाणी यांच्या हातातील पर्स लांबवली. त्या पर्समध्ये ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५०० रुपयांची रोख रक्कम असा ऐवज होता. काही वेळानंतर महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून…
जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा भागातील सेंट्रल बैंक कॉलनी भागातून एका मजुराच्या घरातून, मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने व काही रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ एप्रिल रोजी समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, संजय सुकदेव भोई (वय ५४) हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १९ व २० एप्रिल दरम्यान मुलीचे लग्न असल्यामुळे लग्नासाठी सुकदेव भोई यांनी काही सोन्याचे दागिने घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी ते आपल्या परिवारासह मुलीच्या लग्नासाठी साड्या व कपडे घ्यायला सुरत येथे गेले होते. ते सोमवारी आपल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर…
मेष राशी संयम राखा. रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. असे केल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या नातेवाईकांशी प्रेमाने वागा. तुमच्या भावंडांशी समन्वय ठेवा. तुमच्या संयमाची आणि धाडसाची लोकं प्रशंसा करतील. वृषभ राशी सामाजिक कार्यात आर्थिक लाभ होईल. जमीन, इमारत, वाहन खरेदी करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. कपडे आणि दागिन्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना अचानक मोठा आर्थिक फायदा होईल. तुमच्या जोडीदाराकडून मौल्यवान भेटवस्तू किंवा पैसे मिळण्याचे संकेत आहेत. मिथुन राशी आज प्रेमसंबंधात एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांबद्दल काही आनंद आणि शंका असतील. प्रेमसंबंधांमध्ये प्रेमविवाहाची चर्चा होऊ शकते. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये काही मतभेद असू शकतात. कर्क राशी तुमचे आरोग्य…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मोठ्या चर्चेत आले होते. तनिषा भिसे या गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, वेळेवर उपचार न भेटल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवालात देखील मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.…

