नाशिक : वृत्तसंस्था सध्या चैत्रोत्स्वानिमित्ताने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रशासनाचे नियोजन फिस्कटले आहे. परिणामी, गडाच्या पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार, भाविकांनी बुधवारी रात्रीपासूनच चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर गर्दी सुरू झाली होती. गुरुवारी सकाळी या गर्दीत आणखी भर पडली. यामुळे गडाच्या पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली. भाविकांच्या या गर्दीमुळे मंदिर प्रशासन, पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्माचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. प्रशासनाने भाविकांना सुलभपणे आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी दर्शन मार्गात बॅरिकेड्स लावले होते. पण काही ठिकाणी हे बॅरिकेड्स तुटले. यामुळे परिस्थिती गंभीर बनली. त्याचा फटका दर्शनासाठी आलेल्या लहान मुले व वयोवृद्धांना बसला. या गर्दीमुळे भवानी चौकातील व्यापाऱ्यांचे व्यवहार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका पत्रकाराच्या घरात भर दिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावर असलेल्या मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची चव्हाण यांच्या पत्नी दोन्ही मुलांना घेऊन अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये गेले असता. अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमधील दुसऱ्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात, ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची मुदत आता वाढवून ३० एप्रिल करण्यात आली आहे. त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. सर्वोच्च न्यायालय, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या. ही प्रलंबितता मोठी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना आता चेंबूरमधील आचार्य अत्रे उद्यानाजवळील सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 9.50 वाजता घडली. दोन अज्ञात बाईकस्वारांनी सद्रुद्दीन खान (वय 50) या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान सद्रुद्दीन खान यांना एक गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली, तर दुसरी गोळी त्यांच्या गाडीला लागून काचा फुटल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होते पंचनामा केला आहे. सद्रुद्दीन खान यांना उपचारासाठी झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार का आणि कुणी केला हे…
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एरंडोलकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकरने पायी फिरायला गेलेल्या प्रौढास मागाहून जबर धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिलला रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील भावे नगरमधील रहिवासी योगेश चंद्रकांत देशमुख (वय ४८) हे दररोज रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी रस्त्याच्या कडेने चालत होते. या वेळी मागाहून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकर (एमएच १७, बीडी ७७२२) ने त्यांना जबर धडक दिली. यात योगेश देशमुख यांच्या डाव्या पायावरुन टँकरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या योगेश देशमुख यांना जळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात…
धरणगाव : प्रतिनिधी भावाच्या आजारासाठी व्याजाने घेतलेले पैसे चेकद्वारे व ऑनलाइन परत केले तरीसुद्धा हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना धरणगाव येथे घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील अवधेश वाजपेयी यांनी पोलिसात तक्रार दिली असून, त्यात म्हटले आहे की, त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. मोठे बंधू आशिष वाजपेयी हे कॅन्सरने आजारी होते. भावाच्या उपचारासाठी त्यांनी जी. एस. लॉन्सचा पार्टनर व व्याजाचा व्यवसाय करणारा सुनील पंढरीनाथ चौधरी (कोर्ट बाजार, धरणगाव) याच्याकडून ५ वर्षांपूर्वी सावकारी टक्केवारी व्याजाने रोख ५ लाख रुपये घेतले होते. नोव्हेंबर २०२३मध्ये त्यांचा मोठा भाऊ आशिष वाजपेयी हे उपचार घेत…
जळगाव : प्रतिनिधी तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करुन बोगस आदेश तयार करणारा मुख्य सूत्रधार अॅड. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान व अॅड. शेख मोहसीन शेख सादीक मन्यार या दोघांना अटक करण्यात आली आहे. आदेशावर तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या अॅड. शेख मो. रईस बागवान यांच्या अक्षरासह त्याच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने छत्रपती संभाजीनगर येथील वादग्रस्त दस्ताऐवज पडताळणी विभागात पाठविण्यात येणार आहे. जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने बोगस आदेश प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना सुरुवातीला प्रकरणे दाखल असलेल्या…
यावल : प्रतिनिधी ५५ वर्षीय महिला दुचाकीने यावलला येत असताना तालुक्यातील साकळी बसस्थानकाजवळ दुचाकी चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला. या अपघातात अरुणा सुधाकर पाटील (५५, रा. यावल) ही महिला ठार झाली. याप्रकरणी दुचाकीचालक लोटन भास्कर पाटील (रा. मनवेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, साकळी, ता. यावल या गावातील बसस्थानकाजवळ अंकलेश्वर बहऱ्हाणपूर राज्य मार्गावरून लोटन पाटील यांच्या दुचाकीवर मागे बसून अरुणा पाटील (रा. तिरुपतीनगर, यावल) या येत होत्या. दरम्यान, लोटन पाटील यांनी निष्काळजीपणाने दुचाकी भरधाव वेगात चालवली आणि अपघात घडला. या अपघातात अरुणा पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून लोटन पाटील…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा बु, येथे एका महिलेने राहत्या घरातील स्वयंपाकाच्या खोलीच्या छताच्या अँगलला अडकविलेल्या दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोहनी संदीप पारखे (२६, पिंपळकोठा ब.) या महिलेने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात स्वयंपाकाच्या खोलीच्या छताच्या अँगलला अडकविलेल्या दोरीने गळफास लावून घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एरंडोल पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शंकर पवार करीत आहेत.
मेष राशी आजचा दिवस कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला जाईल. मित्रांसोबतच्या भेटी फायदेशीर ठरतील. कोणत्याही महत्त्वाच्या संभाषणात उतरण्यापूर्वी किंवा अनोळखी व्यक्तीसोबत काम करण्यापूर्वी, योग्य ती काळजी घ्या, असा सल्ला श्रीगणेश देतात. एखाद्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसायात कोणत्याही प्रकारचा बदल विचारपूर्वक करा. पती-पत्नींच्या सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्या गुणांचा सकारात्मक पद्धतीने वापर केला तर चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याने इतरांवर प्रभाव टिकवून ठेवाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. घरात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन देखील एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकते. आज तुमचे अडकलेले पैसे गोळा करण्यावर…

