पारोळा : प्रतिनिधी फास्टटॅग स्कॅनिंग न झाल्याच्या कारणावरुन सबगव्हाण येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून बस वाहकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर येथून ठाणे जाण्यासाठी निघालेली (एमच १४, एलएक्स ३७२८) क्रमांकाची बस दुपारी तीन वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोलनाक्यावर पोहचली. येथे फास्टटॅकच्या माध्यमातून स्कॅनिंग करण्यासाठी लेनवर जात असतांना तांत्रीक अडचणींमुळे स्कॅन झाले नाही. एक नव्हे तर तीन लेनवरुन बसने स्कॅन केल्यानंतर देखील तांत्रीक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे टोल कर्मचारी व वाहक जितेंद्र कल्याण बोरसे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी टोलवरील कर्मचाऱ्यांनी वाहकाला बसमधून ओढून मागच्या बाजूला नेवून…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री गावातील चोरट्यांनी धरणावर शेतकऱ्यांनी धरणावर बसल्या होत्या. त्या पाण्याच्या मोटारी चोरुन त्या गावातील शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीच्या मोटारी घेणाऱ्यांकडून त्या मोटारी हस्तगत करण्यात आल्या तसेच चोरट्यांकडून दुचाकी देखील जप्त करण्यात आलया आहे. अटकेतील संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शासनाची परवानगी घेवून पिंप्री गावाजवळील मध्यम प्रकल्पात आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी मोटारी बसविल्या होत्या. परंतू पिंप्री गावातील चोरट्यांनी मोटारींचे पाईप कापून त्या मोटारी चोरुन त्या कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकल्या होत्या. अनेक दिवसांपासून याबाबतची तक्रारी पिंपळगाव पोलीस ठाण्यात केल्या. या तक्रारींची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्रूा पथकाने संयुक्त कारवाईची मोहीम…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारीकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना आता एसीबीने जळगाव शहर पोलीस स्थानकात सापळा लावत दोन पोलीस हवालदार यांना ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तो कर्मचारी ठाणे अंमलदाराच्या ड्युटीवर असतांना त्याला २० हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. शहर पोलिस ठाण्यात झालेल्या या कारवाईने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला लाच दयायची…
जळगाव : प्रतिनिधी सुप्रीम कॉलनी येथील सपना विजय तायडे (वय १६) या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपनाने महिनाभरापूर्वीच दहावीची परीक्षा दिली होती. ती सुप्रीम कॉलनीत आई, वडील, लहान भाऊ यांच्यासोबत राहत होती. सपनाचे वडील विजय हे एका कंपनीत कामगार आहेत. शुक्रवारी दुपारच्या वेळेस घरात कोणीही नसताना तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब दुपारी १ वाजता कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले.
मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी होणारे बदल विचारपूर्वक स्वीकारा. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आर्थिक बाजूही चांगली राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रमोशनची संधी आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. पण आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. स्वत:ला कामांमध्ये गुंतवा, ज्यामुळे तुमचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न राहील. शैक्षणिक कामांमध्ये आवड निर्माण होईल. अचानक एखादा मित्र घरी येऊ शकतो. आज अचानक तुम्हाला भेटवस्तू मिळतील. नोकरीत प्रगतीचे मार्ग खुले होतील. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…
जळगाव : प्रतिनिधी उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून जागा उपलब्धते बाबत जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे. “ही गुंतवणूक परिषद केवळ गुंतवणुकीची नाही, तर जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार आहे. उद्योग केवळ नफ्यासाठी नसतात, ते समाज घडवण्यासाठी आणि भविष्य उभारण्यासाठी असतात. शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावने आता औद्योगिक प्रगतीचे पंख लावावे,” असे भावनिक…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दि.११ रोजी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे मोठे आणि धुराचे लोळ दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिरची बाजाराच्या अगदी जवळ पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता परिसरातील नागरिकांमध्ये अधिक घबराट निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या पहिल्या टप्प्यात मिरची बाजारात उभ्या असलेल्या काही मोटारसायकली जळाल्या, ज्यामुळे मोठे स्फोट झाले आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत एक ट्रक देखील जळून खाक झाला आहे. आगीच्या भयंकर स्वरूपामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट…
मुंबई : वृत्तसंस्था अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या तहव्वूर राणा अटकेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावलेत. मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी असणाऱ्या तहव्वूर राणाला भारतात आणल्याप्रकरणी प्रशासन व तपास यंत्रणांचे कौतुक करण्याची गरज आहे. या प्रकरणी भाजपने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर एवढे क्रेडिट घेणाऱ्या भाजपवाल्यांना माहिती पाहिजे की, यापूर्वीही अनेकांना भारतात अशाच प्रकारे आणण्यात आले आहे. यापूर्वी अबू सालेमला भारतात आणण्यात आले.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य होत असतांना आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या हिंदी सिनेमााचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, या सिनेमातील काही सीन्सवर सेन्सॅार बोर्डाने कात्री लावली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन करत फुले सिनेमा जसा आहे तसा दाखवला नाही, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सिनेमाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी…
जळगाव : प्रतिनिधी “लालपरी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती लाखो कुटुंबांच्या जीवनाशी जोडलेली आशेची दोरी आहे. आईच्या पदरा इतकाच विश्वास देणारी ही सेवा आता नव्या रूपात जनतेसमोर येतेय,” जळगाव व चोपडा येथे आधुनिक बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जळगाव येथे पाच नव्या एस.टी. बसच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. जळगाव परिवहन विभागात सध्या एकूण ११ आगार व १५ बस स्थानके असून, १३५५ वाहनांद्वारे दररोज १.६९ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. विभागातील बस दररोज २.५१ लाख किमी प्रवास करतात आणि दरवर्षी सुमारे ११९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवतात. “लालपरी ना केवळ एक गाडी आहे, ती तर…

