मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. संशय घेतल्याने नातेसंबंध बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. प्रतिकूल परिस्थितीचा दबाव घेवू नका. कोणत्याही समस्येत मुलांना मदत करा. सध्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही समस्येत जीवनसाथीचा सल्ला घ्या; तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळेल. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, दुपारनंतरची परिस्थिती अनुकूल असेल. दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या कामांची रूपरेषा तयार करा. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात चांगला वेळ जाईल. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकाशी मतभेद टाळा. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही अडचणी आल्यास अनुभवी लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मिथुन राशी श्रीगणेश म्हणतात की, आज उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही समाजात तुमची प्रतिष्ठा राखाल. सामाजिक…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था येत्या दोन वर्षांत संपूर्ण देशभरातील महामार्गांच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. यासाठी 10 लाख कोटी रूपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, विशेषतः ईशान्य भारतातील रस्त्यांचे जाळे अमेरिकेतील रस्त्यांच्या तोडीस तोड असेल. देशात आगामी दोन वर्षांत 10 लाख कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू होणार असून, त्यात ईशान्य भारत व सीमावर्ती भागांवर विशेष भर असेल. ईशान्य भारतातील खडतर भौगोलिक रचना आणि सीमावर्ती भागांतील महत्त्व लक्षात घेता, त्या भागातील रस्ते पायाभूत सुविधा भक्कम…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जात असाल तर ही वाचा. हिंदू देव देवतांच्या मंदिरात अनेकदा तोकडे कपडे घालून भाविक येत असताना. यामुळे मंदिराचे पावित्र आणि संस्कृती धोक्यात येत असल्याचे मत समाजात मांडले जाते. यामुळे अनेक मंदिरांनी वस्त्र नियमावली जाहीर केली आहे. अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आलीये. ही पाच मंदिर ज्या ट्रस्टच्या अंतर्गत आहेत, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आलीये. मात्र ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेते महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतांना आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. अरविंद सावंत म्हणाले कि, संविधान खरेच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचे राज्य नाही, असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. नाशिक येथे शनिवारी भगवान महावीर जनकल्याण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरविंद सावंत यांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर भाष्य केले. अरविंद सावंत म्हणाले, संसदेत पूर्वी विरोधकांना पण ऐकले जात होते. तेव्हा प्रसिद्धी माध्यमे वेगळी होती. दूरदर्शन आले आणि क्रांती झाली. नवनवे प्रसिद्धी माध्यमे आली आणि…
जळगाव : प्रतिनिधी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी असणारा मेल पाठविण्यात आला असून, सीएमओ कार्यालयाने त्याची दखल घेत तो गृहसचिवांसह जळगाव पोलिसांना पाठविला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात अनेक अधिकाऱ्यांनादेखील असे धमकीचे मेल आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसा मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन मेल अकाउंटवर पाठविला आहे. गृह खात्याने त्यावर चौकशी करीत तो जळगाव पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, जळगाव जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, महाराष्ट्र पोलिसांच्या मेलवर पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची धमकी देण्यासह १ मे २०२५ नंतर…
भुसावळ : प्रतिनिधी भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळातील महिला भाविकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी कळवणनजीक घडला. गौरीबाई बटलू पासी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने शहरातील पासी वाड्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री भुसावळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी कळवण पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पासी वाड्यातील २० ते २२ भाविक सप्तश्रृंगगडाकडे पदयात्रेने निघाले आहेत. गुरुवारी कळवणजवळ आले असता एका भरधाव कारने गौरीबाई यांना जबर धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तत्काळ कळवण येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कळवण येथे शवविच्छेदन करण्यात…
मेष राशी आज आराम मिळेल. मनोरंजनासाठी चांगली रक्कम खर्च कराल. तुमच्या नव्या योजनांमुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. भविष्यासाठी थोडीशी बचत करण्याचा विचार करा. बऱ्याच दिवसांनी एखाद्या नातेवाइकाला भेटण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. आज जिवावरचं संकट टळेल. वृषभ राशी नशीब आज तुमच्या दारात पाणी भरेल. कोणत्याही व्यवसाय भागीदारीत सहभागी होण्याआधी नीट विचार करा. विचार न करता कोणालाही पैसे देण्याचे आश्वासन देऊ नका, अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. निर्णय हुशारीने घ्या. जर तुमच्या मुलाने शिक्षणाशी संबंधित परीक्षा दिली असेल, तर त्यात चांगले यश मिळेल. मिथुन राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस नरमगरम असेल. आहारावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्या पुन्हा उभ्या…
मुंबई : वृतसंस्था हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४५ वी पुण्यतिथी असून त्यानिमित्त मी ऐतिहासिक रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. शिवरायांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेऊ नका. तर छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत. राज माता जिजाऊंना माझा प्रणाम. त्यांनी शिवरायांना केवळ जन्म दिला नाही, तर स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्वातंत्र्यांचा विचार दिला. त्यामुळेच शिवरायांनी महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात आगीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी मधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा शोध अद्याप घेतला जात आहे. या स्फोटामध्ये ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी अॅल्युमिनियम इंडस्ट्रीजमध्ये संध्याकाळी ७ वाजता स्फोट झाला, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी पाहणी केली. या स्फोटाबद्दल त्यांनी सांगितले की, हा कारखाना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीर मधील अखनूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ९ पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद शहीद झाले. शुक्रवारी रात्री उशिरा अखनूरच्या केरी बट्टल भागात ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. त्याचवेळी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्रीपासून ऑपरेशन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मारले गेलेले तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश आहे. अखनूरच्या केरी बट्टलमध्ये शुक्रवारी रात्री सीमेपलीकडून पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांशी झालेल्या…

