मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी घरात ठेवलेल्या पैशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण त्यात गडबड होण्याची शक्यता आहे. बुडालेली रक्कम परत मिळू शकते. प्रवास आनंददायी राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील आणि मित्रांमधील संबंध सुधारतील. लहान भावांचे सहकार्य मिळेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यापारात नवीन ग्राहक मिळतील, ज्यांच्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. नवीन मित्र भेटू शकतात. विद्यार्थ्यांना काही कारणास्तव पालकांकडून ओरडा बसण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बदल संभवतात. उत्पन्नात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन कामे सुरु करण्याची योजना आखाल. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून खर्च करा. घराबाहेर जाणे टाळा, कारण दुर्घटना…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या अभिवादन कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमास आमदार श्री. सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. योगेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुर्बान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयोजित विचार प्रेरणा व्याख्यानात…
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे नेहमीच आपल्या भाषणाने चर्चेत येत असतांना सर्वांनी पाहिले आहे. आता अजित पवारांनी तरुणांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांनो, पुस्तके ही तुमचे खरे मित्र असून, ती विचार करायला शिकवतात. कल्पनाशक्तीला पंख देण्यासोबत नवीन जगाला जोडण्याचे काम करीत असतात. पुस्तकांमुळे व्यवहारिक ज्ञान वाढण्यासोबतच नवीन संधीचे दरवाजे उघडण्याचे कामदेखील होते. त्यामुळे अधिकाधिक पुस्तके वाचा आणि त्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवा, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. पंचायत समिती सभागृहात आरोग्य विभाग व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना चष्मे आणि पुस्तकवाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गट विकास…
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जळगाव महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुती सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी जोरदार घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात ‘मुख्य आर्थिक सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केली आहे, असं रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटल आहे. रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे…
वर्धा : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी जोरदार चर्चेत आणला होता त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी नाराजी झाल्याचे दिसत असतांना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील आर्वी येथे बोलत असताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. आर्वी येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले, महाराष्ट्र देशातील पहिले असे राज्य ठरले आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोअर वर्धा…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली या गावात हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून वढोदा सरपंच व त्यांचे भाऊ या दोघांना दोघांनी जबर मारहाण केली. व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम देखील लांबवली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांवर जळगावात उपचार सुरू असुन याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली या गावात एका हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून राहुल शरद कोळी व अरुण सुखराम कोळी या दोघांनी वढोदा गावाचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे व त्यांचे बंधू डॉ. रविराज प्रभाकर…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील मोठे वाघोदे येथे मुलीचे लग्न ठरलेले… सोहळा सात दिवसांवर येऊन ठेपला.. अशातच येथील जवानाचे अल्प आजाराने निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मोठा वाघोदा येथील बुधो राजाराम कचरे (५६) या सीआयएसएफमधील जवानाचे १२ रोजी अल्प आजाराने निधन झाले. बुधो कचरे यांच्या मुलीचा विवाह १९ एप्रिल रोजी असल्याने दोन दिवसांपूर्वी कचरे हे आपल्या मूळ गावी आले होते. देश सेवेबरोबर घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या जवानाचा असा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने भुसावळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. परंतु रस्त्यात त्रास…
भुसावळ : प्रतिनिधी येथील नाहाटा चौफुलीजवळ शनिवारी रात्री २ वा अॅसिडने भरलेला भरधाव वेगातील टँकर उलटल्याने त्याला लगेचच आग लागली. परंतु रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी मध्यरात्री २ वाजता जळगावहून नागपूरकडे जाणारा हा टैंकर नाहाटा कॉलेज चौफुलीजवळ उलटला. परंतु रात्रीची वेळ असल्याने समोरून व मागून येणारे वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा टँकर उलटताच त्याला लागलीच आग लागली रात्रीच्या वेळेस काही लोकांनी त्या टैंकर जवळ जाऊन पुढील काचा फोडून ड्रायव्हरला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. तसेच ट्रकला आग लागल्याने अग्निशमन व पोलिस स्टेशनला स्थानिक नागरिकांनी फोन लावून आग तातडीने विझवली. आगीमुळे रस्त्यात वाहतुकीचा खोळंबा…
रावेर : प्रतिनिधी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर छापा टाकून पिता-पुत्रासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर येथील स्टेशन रोडवरील रामचंद्र नगर भागात शनिवारी ही कारवाई झाली. त्यांच्याकडून जवळपास सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरामण दगडू चौधरी (६२) व मुलगा आकाश हिरामण चौधरी (३०, दोन्ही रा. रामचंद्र नगर, रावेर) आणि अमनखा मन्सूरखां (रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रावेर शहरात रामचंद्र नगरात पोलिसांनी हा छापा टाकला, त्यावेळी तिथे असलेल्या दोन जणांनी गल्ली बोळाचा फायदा घेऊन धूम ठोकली. मात्र जुगार घेणारे हिरामण चौधरी व त्यांचा मुलगा आकाश चौधरी यांच्याकडे…

