नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याच्या अफवा जोर धरत असतानाच केंद्र सरकारने शुक्रवारी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार सरकारच्या स्तरावर सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारमधील तीन वरिष्ठ मंत्री — निर्मला सीतारामन, किरण रिजिजू आणि हरदीप सिंग पुरी — यांनी स्वतंत्र निवेदने जारी करून या अफवा निराधार असल्याचे ठामपणे सांगितले. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी या अफवांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “या अफवा नेमक्या कोण पसरवत आहे, हेच समजत नाही. पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) मोठी कपात केली आहे. या निर्णयामुळे तेल कंपन्यांना दिलासा मिळण्याबरोबरच सामान्य नागरिकांनाही अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटरवरून तब्बल १० रुपयांनी कमी करून ३ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. तर डिझेलवरील १० रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले असून, ते शून्यावर आणले आहे. या कपातीमुळे इंधन दरवाढीचा दबाव काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. उत्पादन शुल्क हा केंद्र सरकारकडून वस्तूंच्या उत्पादनावर आकारला…
नाशिक : वृत्तसंस्था अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू असून, न्यायालयाने खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या माहितीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान अशोक खरातने केलेले दावे अत्यंत वादग्रस्त ठरत आहेत. महिलांसोबत केलेली कृती ही ‘विधीचाच एक भाग’ असल्याचे सांगत त्याने आरोपांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच “मी कुणावरही जबरदस्ती केली नाही” आणि “मी लोकांचे भले केले, पण तेच माझ्यावर उलटले,” असे म्हणत त्याने आपली बाजू मांडली. याशिवाय “माझ्या अंतर्मनाने मला धोका…
जळगाव : प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत विविध पौराणिक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलाकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते ‘महाबली मारुती’च्या वेशभूषेत सहभागी झालेल्या एका तरुणाचे. प्रभावी व्यक्तिमत्त्व, आकर्षक पोशाख आणि साजेशी अंगभाषा यामुळे हा तरुण मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईमध्ये अक्षरशः चढाओढ लागल्याचे चित्र दिसून आले. यावेळी शोभायात्रेत आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका व राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान यांसह…
रावेर : प्रतिनिधी पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक करताना चार जणांना रंगेहात पकडले असून, त्यांना मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपी गणदास गबू डुडवे (वय ३८), अमित सुजाण मोरे (वय २१), सावन रणजित मोरे (वय २४, सर्व रा. मेंढागड, खरगोन), हेमराज होरपाल चव्हाण (वय २२, रा. मांडवखेडा, खरगोन) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत पाल येथील व्यापारी यांचे अवैध गोडाऊनमध्ये धाडी टाकून धावडा, सलाई, कड प्रजातीचा एकूण ७ हजार ५०० किलो अंदाजित रक्कम १५ लाख रुपये किमतीचा डिंक जप्त करण्यात आला. तसेच…
जळगाव : प्रतिनिधी शाळेतून घरी जाणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून रस्त्यावर थांबवून तिचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका शाळेजवळ घडली. याप्रकरणी एकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून आपल्या घराकडे जात असतांना संशयित याने स्कुटीवरून या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार २४ मार्चला दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास घडला. याच संशयिताने यापूर्वीही पीडित मुलीस चिठ्ठी देवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पीडिताने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून तपास पो. उ.नि. अरूण बाविस्कर,…
भडगाव : प्रतिनिधी सततच्या तक्रारी आणि गुन्ह्यांच्या तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक शर्मा यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः दाखल गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपींना अटक करण्यात झालेली दिरंगाई, तसेच पोलिस ठाण्यातील लूज सुपरविजन याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई करत त्यांची तत्काळ बदली करण्यात आली. यापूर्वीही निरीक्षक महेश शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी असताना पाणीपुरवठा पाइप चोरी…
आजचे राशिभविष्य दि.२७ मार्च २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. तुमच्या सर्व समस्या लवकरच सुटतील. तुम्हाला शासकीय नोकरीत मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता आणि त्यांच्यासोबत तुमचा वेळ खूप छान जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही एका प्रकल्पावर सर्वोत्तम सल्ला द्याल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वृषभ राशी तुमच्या सध्याच्या समस्या सुटतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाऊ शकते. तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या वागणुकीतील सकारात्मक बदलांमुळे तुम्हाला नवीन मित्र मिळू शकतात. मिथुन राशी विद्यार्थ्यांना…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल जाणवत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना, अवकाळी पावसाची चाहूल लागल्याने वातावरण अस्थिर झाले आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो, तर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार करत खळबळजनक विधान केले आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडले, तेथून पोस्टमॉर्टमपर्यंतची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा थेट इशारा तटकरे यांनी दिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी दावा केला होता की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवायचा होता. या आरोपांनंतर तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आज पत्रकारांशी संवाद साधत रोहित पवारांवर निशाणा…

