Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला ही स्वतःच्या फायद्यासाठी काही महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तशी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिपेठ…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात जळगाव शहरात एका रात्रीत तीन महागड्या चारचाकी गाड्या चोरीला गेल्या होत्या. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. रामानंद नगर, जळगाव तालुका आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी एका धाडसी कारवाईत आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे.  जळगाव एलसीबीच्या पथकाने बारकाईने तपास करून आरोपींचा मागोवा घेतला. आठ दिवस राजस्थानच्या वाळवंटात आणि जंगलात दबा धरून बसल्यावर आंतरराज्यीय वाहनचोर टोळी गजाआड करण्यात पथकाला यश आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातून एकाच रात्रीत तीन चारचाकी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक डॉ.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारत चोखपणे उत्तर देत आहे.  पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेश सिंदूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी महत्वाची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे आणि मागणी देखील भारताने फेटाळून लावली आहे. भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये आमचे 26 नागरिक मारले गेले आणि 46 जण जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता, तसेच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचं…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात 6 आणि 7 जून रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव व चोपडा तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी स्पष्ट केले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शासकीय मदतीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यात गट…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या आतंकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानवर हल्ला केलाय.  आज सकाळी लवकर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणी हवाई हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मुख्यालय व मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबा मुख्यालय ही मुख्य लक्ष्य होती. हल्ल्याचे नियोजन इतके गुप्त होते की पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने कराची व लाहोरचा एअरस्पेस बंद केला आहे. भारतातही सुरक्षा कारणास्तव श्रीनगर (SXR), जम्मू (IXJ), अमृतसर (ATQ), लेह (IXL) आणि धर्मशाळा (DHM) येथील विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे संकेत स्वतः शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावे, असे वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर भारतीय संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचे की विरोधी पक्ष सोबत, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षांतर्गत दोन मतप्रवाह असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. आमच्यातील एका गटाला आम्ही अजित पवार यांच्या सोबत जावे, असे वाटत असल्याचे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू आहे, असे स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईनंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावून विविध राजकीय पक्षांना या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून त्यांचा पूर्ण नायनाट केला, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. संरक्षणमंत्री…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली. यामध्ये दहशतवादी, त्यांचे अब्बाजान ठार झाले. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त झाले. भारताच्या या हल्ल्याने पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला. भारताने ऑपरेशन सिंदूर पुढे न राबवण्याची घोषणा केली आहे. पण पाकड्यांची खुमखुमी काही कमी झालेली नाही. पाकिस्तानने रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. पीएम शहबाज शरीफ यांनी हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली आहे. योग्य उत्तर कसं द्यायचे हे पाकिस्तानला माहिती असल्याचा दावा त्याने केला. पण भारताने जेव्हा हल्ला चढवला त्यावेळी एक मोठी घटना घडली. ऑपरेशन सिंदूरनंतर लागलीच हा फोन आला. पाकचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. भारतीय लष्कराने यशस्वी पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्करावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरू केले आहे. ही फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाष्य केले आहे. योगेश कदम म्हणाले, जम्मू काश्मीर येथील पहलागममधून पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर कायम हल्ला करत राहणे, जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देत राहणे, हे पाकिस्तान कायमच करत आला आहे, त्यांनी यातून कधी शिकवण घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ज्याच्यासोबत लग्न ठरले तो तरुण पसंत नसल्याने विवाह मुहूर्त चार दिवसांवर आलेला असताना उपवर तरुणी पसार झाली. ऐनवेळी या तरुणीच्या लहान बहिणीचे उपवर तरुणाशी लग्न लावून देण्यात आले. पसार झालेली तरुणी कॉलनीत कामानिमित्त आलेल्या तरुणासोबत गेल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात नुकताच घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तरुण कामानिमित्त शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता.  या तरुणाचे तो राहत असलेल्या परिसरातील एका २० वर्षीय तरुणीशी प्रेम जुळले. मध्यंतरी दोघेही घर सोडून पसार झाले होते. मात्र, नंतर ते…

Read More