Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील असे मिस्त्री यांनी सांगितले. https://x.com/PTI_News/status/1921180471033295068 मिस्त्री यांच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती केला आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना त्यांना आनंद होत असल्याचेही ट्रम्प यांनी…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग देखील सतर्क झाले आहेत. शुक्रवारी उच्च अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या बैठकीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सर्वांना मुख्यालय सोडू नका, असे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्तांसह सर्व उच्च अधिकाऱ्यांनी राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील शक्यतांवर चर्चा झाली. बैठकीनंतर संध्याकाळी विभागांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांना वैद्यकीय रजा वगळता इतर कोणत्याही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असून आता शरद पवार पक्षाचा एक गट अजित पवार यांच्यासोबत येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आता, सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या दोन्ही गट एकत्र आणण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. साताऱ्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) आपल्‍या निर्णयाची माहिती दिली आहे. आता आगामी इंग्लंड दौऱ्यावर त्याचा संघातील सहभागाची शक्‍यता कमी असल्‍याचे मानले जात आहे. दरम्‍यान, ‘बीसीसीआय’च्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहली याला निवृत्तीबाबतच्‍या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना कोहलीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे क्रिकेट विश्‍वाचे लक्ष वेधले आहे. विराटच्या आधी, हिटमॅन रोहित शर्माने बुधवारी (७ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ७ मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लाल चेंडूच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कानळदा-चोपडा रस्त्यालगत आमोदा-घार्डी जवळ कोणतीही परवानगी न घेताच उभारलेल्या गतिरोधकावर दुचाकीला दणका बसून, दुचाकीवरील आईच्या हातात असलेली ५ महिन्याच्या चिमुकलीचा रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वा. घडली. शुक्रवारी या गतिरोधकावर दुचाकी घसरून एक दाम्पत्यदेखील जखमी झाले. सविस्तर वृत्त असे कि, संदीप सोनवणे (वय २६, रा. देवगाव, ता. जळगाव) हे कोळन्हावी येथे माहेरी गेलेल्या त्यांच्या पत्नी ज्योती संदीप सोनवणे (वय २२) यांना घेऊन आमोदाकडून देवगावकडे जात होते. आमोदा-घार्डी या गावाजवळ उभारलेल्या गतिरोधकावर संदीप सोनवणे यांची दुचाकी आदळली, त्याचवेळी ज्योती सोनवणे यांच्या हातात असलेली त्यांची पाच महिन्याची चिमुकली गायत्री सोनवणे ही रस्त्यावर पडली चिमुकलीच्या डोक्याला…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, गर्भवती पत्नीस भेटण्यासाठी सासरी आलेल्या एका जावयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि संशयिताची सासू हिने फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोठी महिलेची मुलगी सध्या गर्भवती असून तिचा पती काही दिवसांपूर्वी सासरी राहण्यासाठी आला होता. दरम्यान, अल्पवयीन मेहुणीला तब्येतीची तक्रार असल्याचे सांगून जावयाने तिला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगितले. विश्वासाने त्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवले. मात्र सायंकाळपर्यंतही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चिंता वाढली.  कुटुंबीयांनी आसपासच्या गावांमध्ये…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना, भरधाव वेगातील कार पुलाच्या भिंतीवर आदळून खाली कोसळल्याने चोपडा येथील दीपक अरुण मराठे (रा. मल्हारपुरा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मे रोजी रात्री ११ वाजता उमरदे गावाजवळ घडली. दीपक मराठे, पारस महाजन (रा. चोपडा) आणि मोहित नाथबुवा (रा.धरणगाव) हे तिघे त्यांच्या मित्र चेतन वानखेडे यांच्या बहिणीच्या हळदीसाठी बिलवाडी (ता. जळगाव) येथे चारचाकी क्रमांक एम.एच.१२ ए.एन.५३४६ ने निघाले होते. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल-म्हसावद रस्त्यावरील उमरदे पुलाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर आदळून खाली कोसळली व उलटली. या अपघातात दीपक मराठे याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर…

Read More

मेष राशी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याचे संकेत मिळत आहेत. कार्यक्षेत्रात सुधारणा होऊ शकते. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या कमी होतील. व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास फायदा होईल. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणाच्या सजावटीवर किंवा सुविधांवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. व्यवसायात उत्पन्नाच्या स्रोतांकडे लक्ष देण्याची गरज असेल. मिथुन राशी श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक व आध्यात्मिक कामांत वेळ व्‍यतित कराल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस योग्‍य आहे. विद्यार्थ्यांना एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तणावातून मुक्ती मिळेल. कुटुंबातील प्रश्‍नांमध्‍ये बाहेरील व्‍यक्‍तीला ढवळाढवळ करु देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा; त्यांच्यावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला ही स्वतःच्या फायद्यासाठी काही महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तशी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिपेठ…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात जळगाव शहरात एका रात्रीत तीन महागड्या चारचाकी गाड्या चोरीला गेल्या होत्या. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. रामानंद नगर, जळगाव तालुका आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी एका धाडसी कारवाईत आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे.  जळगाव एलसीबीच्या पथकाने बारकाईने तपास करून आरोपींचा मागोवा घेतला. आठ दिवस राजस्थानच्या वाळवंटात आणि जंगलात दबा धरून बसल्यावर आंतरराज्यीय वाहनचोर टोळी गजाआड करण्यात पथकाला यश आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातून एकाच रात्रीत तीन चारचाकी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक डॉ.…

Read More