Author: editor desk

मेष राशी आज सौख्याचा दिवस आहे. आज तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाकडेही लक्ष द्याल. मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्ही कोणत्याही वादविवादात अडकू नका, हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुमचा मुलगी किंवा मुलगा आज एखाद्या स्पर्धेत भाग घेईल, आणि त्यात त्याला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तुमचाच एखादा निर्णय तुमच्यासाठी अडचणीचं कारण ठरू शकतो. वृषभ राशी आज कर्जातून मुक्त व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचं कौशल्य इतरांना दाखवू शकाल. आज बजेट तयार करून पुढे गेलात, तर ते भविष्यासाठी लाभदायक ठरेल. भपकेगिरीपासून दूर राहा, अन्यथा तुमचा पैसा अधिक खर्च होऊ शकतो. एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने माऊली आणि तुकोबांच्या पालख्या सुरु होण्याअगोदर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांवर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांंचा पंढरीच्या दिशेने प्रस्थान सोहळा येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला सुरूवात केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाकऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे माहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ७५० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागातील १४ आगारांतून पंढरपूरसाठी एसटी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सहा जुलै रोजी आषाढी…

Read More

किल्ले रायगड : वृत्तसंस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला. हा दिवस आज सर्वांसाठी पवित्र आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला तरी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व ओळखून शासनाने हा दिन राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि.६) केली. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित लाखो शिवभक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर तारखेनुसार आज (दि. ६) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील  वाडी गावाजवळील शेवाळे येथे एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथे एका उघडकीस आली आहे.  या घटनेत जनाबाई माहरु पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून पोबारा केला. या घटनेने पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेवाळे येथील जनाबाई पाटील या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) धोरण आढाव्यात रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज (दि. ६ जून) आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट हे तात्काळ लागू होईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, एकीकडे, दर कपातीमुळे सामान्य लोकांवरील गृहकर्जाचा भार कमी होईल तर दुसरीकडे, त्यांच्या FD वरील व्याज देखील कमी हाेणार आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्‍हणाले की, एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील विचेखडेजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ४ रोजी घडली घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विचखेडेजवळ दि. ४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजय अंभोरे (२४), नितीन पगारे (२४), रामा कौतिक कंडारे (१८, पारोळा) हे दुचाकीने वसनगर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना गाडी नादुरुस्त झाली होती. ही गाडी लोटून आणत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच०१/एएक्स ९९१६) जोरदार धडक दिली. त्यात तिघेही गंभीररित्या जखमी झाले. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिघांनाही तात्काळ रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता विजय अंभोरे याचा वाटेतच मृत्यू…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी मेहुणबारे येथून जवळच असलेल्या शिदवाडी येथे शेतीच्या वादातून सख्ख्या काकांच्या त्रासाला कंटाळून ४१ वर्षीय पुतण्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. चरणसिंग जाधव (राजपूत) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकून आपले जीवन संपवले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. चरणसिंगचे भाऊ चेतन जाधव (राजपूत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जामदा शिवारातील शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका व त्यांची मुले यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. चरणसिंग जाधव याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून दिल्या जात होत्या. शेतीचा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी विजेच्या तारांचे काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप व पहारने मारून गंभीर जखमी केल्याची घटना २९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पातोंडा येथे वि. का. सोसायटीच्या गोदामात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे राजेश शामसिंग प्रजापती (खापरखेडा, ता. पिपरिया, मध्यप्रदेश) याने विद्युत वाहिनी टाकण्याचे काम घेतले असून त्याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा कामासाठी मजूर आणत असतो. २९ रोजी तो बिजाधना छिंदवाडा येथून मजूर घेऊन पातोंडा येथे पोहचला. २९ रोजी कैलास मजुरांसह पातोंडा येथील वि. का. सोसायटीच्या गोदामात झोपले होते. रात्री सलीम उर्फ संदीप धुर्वे, गोपाळ धुर्वे, साहुलाल धुर्वे, पंकज सेलू उमरावसिंग, शिवम फुलसिंग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आजारातून होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (६०, रा. जामणेगाव, ता. पाचोरा) यांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्याप्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (७७, रा. जाखनीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगीच्या मुलाचाही समावेश असून, त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी, भजे गल्लीतून पायी जाणाऱ्या कस्तुराबाई पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांची सोन्याची पोत दोन अज्ञातांनी फसवणूक करून लांबविली होती. याचा तपास सुरू असताना फसवणूक करणारे बाप-बेटे असून ते जाखनी नगरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी पोउनि. शरद बागल, सहायक फौजदार अतुल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली प्र.बो येथे घरासमोर लावलेल्या कारवर सिमेंट उडण्याच्या कारणावरून हेमंत साहेबराव खलसे (वय २२) यांच्यासह त्यांच्या घरातील चार जणांना चौघांनी कोयता, फायटरने मारहाण केली. ही घटना ४ जून रोजी शिरसोली येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे हेमंत खलसे यांच्या शेजारी घराच्या अंगणात कार उभी होती. त्यावर सिमेंट उडाल्याने वाद झाला. त्यातून चार जणांनी हेमंत यांच्यासह त्यांचे काका भगवान खलसे यांना कोयत्यासारख्या शस्त्राने व फायटरने मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच भाऊ किरण खलसे व आई मंगलाबाई खलसे यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली.  या प्रकरणी हेमंत…

Read More