भुसावळ : प्रतिनिधी परतवाडा पोलिस स्टेशन येथे ७ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मझर अब्बास जाफर ईरानी याला मुस्लिम कॉलनी, भुसावळ येथून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. फिर्यादी महिलेच्या गळ्यातील १ लाख १७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून त्याने पलायन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत मंदिरात जात असताना दोन अनोळखी इसमांनी अचानकपणे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासाअंती, ५ मे रोजी परतवाडा (जि. अमरावती) येथील अधिकारी व कर्मचारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले असता, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विजय…
Author: editor desk
मेष राशी सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. तुम्हाला नवीन कपडे मिळतील. नोकरीत बदल होऊन पदोन्नती मिळेल. तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागू शकते. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल. वृषभ राशी आज व्यवसायात अपेक्षेनुसार पैसे न मिळाल्याने तुम्ही नाराज असाल. घरे आणि व्यावसायिक ठिकाणी आग लागू शकते. ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. मिथुन राशी मुलांच्या आनंदात वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. दूरच्या देशातील एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात, पती-पत्नीमध्ये परस्पर आनंद आणि सुसंवाद वाढेल. कर्क राशी आज वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून, सतर्क…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,मोहोपाडा-रसायनी शाखा,ग्रुप ग्रामपंचायत मोहोपाडा व अक्षर मानव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.०६मे २०२५ रोजी मोहोपाडा ग्रामपंचायत हाॅलमध्ये ‘तिच्या मनाचिये गुंती’ हा संवाद कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)वैभव पाटील यांचे हस्ते दिव्यात पाणी भरून शास्रीय पद्धतीने दीप प्रज्ज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील आणि लोकमतचे पत्रकार बाळासाहेब सावर्डे यांचा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ( मोहोपाडा रसायनी ) आणि अक्षर मानव ग्रंथालय अध्यक्ष रोहिदास कवळे यांच्या हस्ते पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. संवादक आरती नाईक ( राज्य कार्यवाह महिला विभाग महा. अंनिस) यांनी स्रीचा शरीर धर्म(मासिक पाळी),शारीरिक,मानसिक बदल आणि समजूतींचा गोंधळ,त्यातून…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला असून ज्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला परंतु पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अचानक झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार बुधवारी दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. चक्रीवादळ वारे दक्षिण तेलंगणा आणि जवळच्या प्रदेशांवर परिणाम करत आहेत. तामिळनाडू पासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, जालना आणि बीड…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मसूद अझहरचे एक स्टेटमेंट समोर आल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात अझहरच्या परिवारातील १० आणि जवळचे ४ लोक ठार झाले आहेत. हे पाहून मसूद अजहरने ‘मी ही मेलो असतो बरं झालं असतं,’ असे स्टेटमेंट दिल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. जिथे प्रत्येक ठिकाणी २५-३० दहशतवादी ठार झाले. पैकी बहावलपूर आणि…
मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलेल्या नातेवाइकांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर समाधान व्यक्त केले आहे. सर्वांनीच ‘धन्यवाद मोदी’जी अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व शहीद पर्यटकांच्या विधवा आणि नातेवाइकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आभार व्यक्त केले आहे. या सर्वांच्या मनामध्ये आम्हाला न्याय मिळाल्याची भावना असल्याचे दिसून आले. भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय महिलांचे कुंकू पूसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला आहे. या घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांच्या हत्येचा बदला एका अर्थाने भारतीय सैनिकांनी घेतला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील देखील सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांनी बदला पूर्ण झाला असल्याची…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रुळांजवळ दगड ठेवले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी यामुळे रेल्वेच्या यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. रेल्वे फाटकाजवळ रेल्वे थांबल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले होते. त्यातील एकाने रुळांमधील ही खडी ही रुळावर ठेवल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वे विभागातील म्हसावद रेल्वे फाटकाजवळील रेल्वे रुळाजवळ आणि रुळावर सोमवारी दगड ठेवलेले असल्याचा प्रकार ट्रॅकमन व काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ रुळावर ठेवलेले दगड बाजूला करण्यात आले. ही बाब त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या प्रकारामुळे रेल्वेला…
जळगाव : प्रतिनिधी मामाच्या मित्राशी ओळख करीत त्यांच्याकडील मोबाइल अॅपद्वारे परस्पर कर्ज घेऊन दोन मोबाइल घेत ५८ हजार ६०५ रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वित्तपुरवठा कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यासाठी कॉल आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी नासीर शेख निसार (२०, रा. नाशिक) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शाहरुख शेख नजीर (३२, रा. शाहूनगर) यांची त्यांच्या मित्राचा भाचा नासीर शेख याच्याशी ओळख झाली. त्यामुळे नासीर हा शाहरुख यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर येऊन बसायचा. दररोज गप्पा मारून त्याने विश्वास संपादन केला व विक्रेत्याचा मोबाईलही वापरू लागला. त्यादरम्यान त्याने २१ फेब्रुवारी व २५ फेब्रुवारी…
जळगाव : प्रतिनिधी उन्हाळी सुट्यांमुळे कुटुंबीय महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेलेले असताना अजय प्रकाश छाडीकर (रा. राम नगर) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह आठ ते १० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. त्याच रात्री आरटीओ कार्यालयाजवळील आणि काव्यरत्नावली चौकातील दूध केंद्र फोडून चोरट्यांनी महागड्या चॉकलेट, बिस्कीटसह चिल्लर चोरुन नेली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असते की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, मिनी स्कूल बसचालक असलेले अजय छाडीकर हे उन्हाळी सुट्यांमुळे ३० एप्रिल रोजी कुटुंबासह महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेले होते. ४ मे रोजी त्यांचा भाचा झाडांना पाणी देण्यासाठी…
पाचोरा : प्रतिनिधी सोशल मीडियावर प्रेम संबंध जुळलेल्या बारामती येथील विवाहित महिलेने पाचोरा येथील विवाहित तरुणासोबत स्वतःच्या बालकासह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ५ मे रोजी रात्री घडली. राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरे (२५, रा. बारामती, जि. पुणे) व तिचा चार वर्षाचा मुलगा सारंग ठाकरे अशी मयतांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा-परधाडे रेल्वेमार्गावर रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुरुष व महिला तसेच लहान मुलाचा मृतदेह आढळला. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. हे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. मृतांची ओळख बराच वेळ पटत नव्हती. ६ रोजी सकाळी हातावर…

