Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था भारत – पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी सवांद साधल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असतांना आता प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नेहमी-नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात. पाकिस्तानच नेहमीचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसा इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला, तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि हा बच्चू कडू तयार असल्याचे प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर रावबत भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात आपलेच सरकार असल्याने कुठूनही कामे करता येतील. मात्र, काही जण नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करत असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेता लगावला. अनेक महिन्यांपासून नाशिकला पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. नाशिकची धुरा कोणाकडे जाणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. सध्या मला पालकमंत्री करा, अशी मागणी करत लाचारी पत्करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, कशाला हवे पालकमंत्रिपद जिथे दिले तिथे काम करावे. संपूर्ण राज्यात आपलीच सत्ता आहे, अशी पुष्टी खडसे यांनी यावेळी जोडली. तसेच काहींनी विशेष कारणासाठी पालकमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका मांडल्याचा आरोपही केला. कुंभमेळ्याची अनेक कामे रखडलेली आहेत. मुळात पालकमंत्री असेल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आमच्या दुकानावर येणारे ग्राहक तुम्ही वळविल्याचे म्हणत नवीद अकिल खाटीक यांच्या डोक्यात एक किलोचे माप शेजारील दुकानदाराने मारले. ही घटना १० मे रोजी कासमवाडी परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नवीद खाटीक यांचे कासमवाडी परिसरात दुकान आहे. त्यांच्या शेजारील दुकानदार त्यांच्याकडे आला व तुम्ही आमचे ग्राहक तुमच्याकडे वळविले आहे. तुम्हाला जास्त झाली आहे, असे म्हणत एक किलो वजनाचे माप डोक्यात मारले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच तेथे आणखी एक जण आला व  त्याने नवीद व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. या घटनेबाबत खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू या गाडीमध्ये १० मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्यापूर्वी ४० ते ४५ वर्षाचा अनोळखी प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मुकुंद यांनी त्यास मृत्यू घोषित केले. याप्रकरणी कलम १९४ बीएनएसएस प्रमाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार कोंडवे करीत आहे. मयत व्यक्तीच्या अंगात आकाशी निळा रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे. अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Read More

नागपूर : वृत्तसंस्था फिरायला जात आहोत, असे सांगून नागपूर येथून कुही फाट्यालगत गिट्टी खदानच्या खोल खड्यात पाच जणांना जलसमाधी मिळाली. मृतकांमध्ये धुळ्याच्या एकाच कुटुंबातील आई व तिच्या दोन लेकरांचा समावेश आहे. धुळ्यातील ही मंडळी माहेरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आली होती. सविस्तर वृत्त असे कि, रज्जु उर्फ रंजना सूर्यकांत राऊत (२२, नागपूर), रोशनी चंद्रकांत चौधरी (३२), मोहीत चंद्रकांत चौधरी (१०), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (८, तिघेही रा. लक्ष्मी नगर धुळे) व एहतेशाम मुक्तार अन्सारी (२०, नागपूर) यांचा मृतांत समावेश आहे. पाचही जण याठिकाणी पोहताना ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.   हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती चौधरी कुटुंबियांना सोमवारी दुपारी…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज एखादे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे मनःशांती लाभेल. स्व:विकासाचा विचार करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्‍या धावपळीतही कुटुंबाला प्राधान्य दिल्याने घरगुती वातावरण मधुर राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. मात्र तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकता. महिलांसाठी वेळ अनुकूल आहे. प्रापर्टी वाटपावरून निर्माण झालेला वाद परस्पर सहमतीने किंवा तडजोडीने सुटेल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्‍यासाठी यशदायक आहे. लाभाच्‍या घटनांमुळे मनात नवा उत्साह व ऊर्जा निर्माण होईल. गेले काही दिवस चालू असलेल्या चिंता…

Read More

बीड : वृत्तसंस्था अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्‍याचा प्रकार समोर आला आहे. दि. ९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक जणांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यांना सुखी संस्काराच्या शुभेच्छा दिल्या, पण यावेळी वधूच्या मनात वेगळेच काही असावे. ९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नववधू- वराने जोडीने देवदर्शन केले. त्यानंतर दि. ११ मे रोजी तिला मुराळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र त्या नंतर तिने रात्री शौचाला जाण्याच्या बहाण्याने भाजाईचा मोबाईल घेतला आणि त्याद्वारे आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराशी असलेल्या संपर्क साधला.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव वाढला असून सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे. असे असतानाच आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. मोदी आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट भागातील प्रौढ इसमाने स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम प्लॉटमधील नमस्कार मंडळाच्या मागे रहिवासी असलेले डिगंबर बढे ( वय ५२ ) यांनी आज दि.१२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवली होती. . पोलीस निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read More