Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था नुकताच दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे तर आता राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यातील प्रत्येक शाळेसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथील खासगी शाळेत दोन बालकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आणि तक्रार पेटी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी थेट शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) मंगळवारी जारी केला. याअंतर्गत प्रत्येक शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी बालपणीच वडील मयत झाले. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी आईचे दीर्घ आजाराने निधन झाले. असे आघात सहन करणाऱ्या येथील तरुणाचाही ११ रोजी अपघाती मृत्यू झाला. काळाचे हे क्रूर आघात येथील चौधरी (माळी) कुटुंबावर झाले. सविस्तर वृत्त असे कि, दि.११ रोजी झालेल्या अपघातात मयत झालेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव अजय सुरेश चौधरी (माळी) असे आहे. आई आजारी होती म्हणून नोकरीला जाता आले नाही. तिची अजयने मनापासून सेवा केली. वडिलांच्या निधनानंतर अजय हा आईसोबत मामा श्रीकृष्ण भिवसने व दगडू भिवसने यांच्या छत्रछायेखाली वाढला. बारावीनंतर आयटीआय इलेक्ट्रिकल डिप्लोमा केलेला अजय चौधरी व गणेश गीते हे दोघे मित्र ११ मे रविवारी नाचनखेडा येथून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली रोडवर दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या विनोद गोविंदा हटकर (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, जळगावकडून शिरसोलीकडे विनोद हटकर हे दि. २ मे रोजी जात असताना इकरा युनानी महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकों समाधान टहाकळे करीत आहेत.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाऊंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम तरुणाला अखेर नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँचच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ही व्यक्ती कोण ? त्याला पाहण्यासाठी शहर पोलिसांत गर्दी उसळली होती. या तरुणाचे नाव रणजितकुमार सुदेशकुमार दराडे (३२, रा. गवळीवाडा, नेताजी चौक, चाळीसगाव) असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या एक-दीड वर्षापासून फेसबुक या सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने अकाउंटद्वारे दररोज एक-दोन व्यक्तींवर चिखलफेक करून बदनामी केली जात होती. त्यामुळे ‘शांताबाई’ आज कोणावर तोफ डागणार याकडे सबंध…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर राहील. सध्या ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. जवळच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. घरी काही चांगल्या कामाचे नियोजन होऊ शकते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला बळी पडू नका. वैयक्तिक कामे तसेच कुटुंबाच्‍या व्यवस्थेकडे लक्ष द्‍या. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात, आज तुमची अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल जाणवेल.कला आणि क्षमता इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळू शकते. मुलांच्या सकारात्मक कार्यामुळे मन प्रसन्न राहील. जवळच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संबंध बिघडू नयेत, याची काळजी घ्या. मिथुन राशी कोणत्याही कामात हृदयाऐवजी मनाचा आवाज ऐका. तुम्हाला नवीन शक्यता…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्यापासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी घटना १२ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील ही तरुणी आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर येत असे. तिला  रात्रीचीही कधी भीती वाटली नाही. धाडसी कन्या भाग्यश्रीमुळे दीपक पाटील याने व्यवसायात वृद्धी केली होती.  दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचा अपघात झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवायला बंदी घातली होती. नेहमीप्रमाणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या घरफोडीच्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, जगवानीनगर गेटसमोर असलेल्या एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे ३५० किलो वजनाचे ६५ हजार रुपये किमतीचे जुने तांबे आणि १५० किलो…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांना मोठं यश दरम्यान, मंगळवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथील केलर वनक्षेत्रात घेराव आणि शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर, परिसराची घेराबंदी कडक करण्यात आली आणि परिसरात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले. परिसरात २ ते ३ दहशतवादी घेरले असल्याची बातमी आली. वृत्तानुसार, तो दहशतवाद्यांचा टॉप कमांडर…

Read More

अमृतसर : वृत्तसंस्था पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मजीठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे’ संपूर्ण प्रकरण अमृतसरमधील मढई गाव आणि मजिठा येथील भागली गावाचे आहे. ही घटना सोमवारी (१२ मे) रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस पथक त्या दारूचा स्रोत शोधत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रविवारी (११ मे) संध्याकाळी ही दारू एका ठिकाणाहून खरेदी करण्यात आली होती. त्यातील काही व्यक्तींचा मृत्यू सोमवारी सकाळीच झाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर यंदा उशीर न होता वेळेत मान्सूनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. सोबतच राज्यात अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांना सतर्क करत महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. राज्यात 12 मे ते 20 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होणार आहे. हा पाऊस अगदी पावसाळ्यासारखा मुसळधार असेल. 12 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होईल. यावर्षी मान्सून साधारणतः 8 ते 10 दिवस लवकर दाखल होत आहे. 19 मे पर्यंत तो बेटांवर स्थिर राहील आणि 21 मे नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 12 मे पासून अवकाळी…

Read More