जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्हे शोध पथकाला कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी स.पो.नि. सुरेश आव्हाड, सफौ. सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिष पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दीपक शिरसाट, पोकों. अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेनंतर रस्त्यावर कोसळलेल्या दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेडीगावाजवळील महामार्गावर घडली. बुधवारी (दि. १ एप्रिल) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव समाधान बापू भोई (वय ३२, रा. भालगाव, ता. एरंडोल) असे आहे. समाधान भोई हे फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी ते भुसावळ येथून दुचाकीने आपल्या गावी परतत होते. दरम्यान, खेडीगावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी…
जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर स्वतःला ‘भाई’ म्हणून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात एका तरुणाला पोलिसांच्या कारवाईचा चांगलाच फटका बसला आहे. इन्स्टाग्रामवर भाईगिरीची भाषा वापरत रील पोस्ट करणाऱ्या चेतन सोळंके या तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेत कायद्याचा धडा शिकवला. पोलिसांचा ‘खाक्या’ पाहताच संबंधित तरुणाने हात जोडून माफी मागितल्याची घटना समोर आली आहे. सध्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर भाईगिरी, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा गुंडशाहीचे समर्थन करणाऱ्या रिल्स बनवण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चेतन सोळंके याने इन्स्टाग्रामवर भाईगिरीची भाषा वापरत एक रील पोस्ट केली होती. संबंधित व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला. मात्र, या प्रकाराची गंभीर दखल घेत जळगाव शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित…
जळगाव : प्रतिनिधी पूर्वसूचना न देता व विनापरवानगी रस्त्याचे काम सुरु केल्याचा महापालिका स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी जाब विचारल्याने दारुच्या नशेत असलेले ठेकेदाराने शिवीगाळ केली. ही घटना दि.३१ मार्च रोजी रात्री दादावाडी परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात १ एप्रिल रोजी ठेकेदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या वॉर्डातील दादावाडी परिसरात रस्त्याच्या कामाचा ठेका कंत्राटदार यांनी घेतला आहे. याच परिसरात भुयारी गटारी मंजूर झालेल्या असून त्याचे काम अद्याप बाकी आहे. दि. ३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ठेकेदार यांनी परिसरातील नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाला कोणतीही…
जळगाव : प्रतिनिधी कार खरेदीनंतर ‘कॉम्प्लिमेंटरी टुर पॅकेज’ जिंकल्याचे आमिष दाखवून आर्थिक सल्लागाराची तब्बल १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ ते १८ एप्रिल २०२५ दरम्यान घडली असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गौतमराव साळुंखे (वय ४७, रा. रणछोडदास नगर, सिंधी कॉलनी रोड) हे ‘राजलक्ष्मी फिनसॉल्व्ह’ या नावाने विमा एजन्सी चालवितात तसेच आर्थिक सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी अलीकडेच कार खरेदी केली होती. त्यानंतर १७ एप्रिल २०२५ रोजी ‘विन्स सिग्नेचर क्लब प्रा. लि. (ओपीसी)’ या कंपनीकडून त्यांना कॉल आला. कार खरेदीच्या निमित्ताने ‘कॉम्प्लिमेंटरी…
आजचे राशिभविष्य दि.२ एप्रिल २०२६ मेष राशी आज पालकांच्या पाठिंब्यामुळे तुमचं काम लवकर पूर्ण होईल. एखादा वर्गमित्र तुमच्याशी आपले विचार मांडू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुम्ही तुमच्या शिक्षकांशी अवघड विषयांवर चर्चा करू शकता. आरोग्याच्या दृष्टीने, तुम्हाला थोडे अशक्त वाटू शकते. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आज तुम्ही आर्थिक व्यवहार टाळावेत. वाद होण्याची शक्यता असल्याने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे. वृषभ राशी आज, एक विशेष महत्वाचं काम पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. नवीन पाहुणे येणार असल्याची आनंदाची बातमी मिळाल्यावर तुमच्या घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आज तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमचा दिवस तुमच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळाची आज पार पडलेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून विविध विभागांशी संबंधित सहा महत्त्वाचे निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आले. या निर्णयांचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जलसंपदा, पर्यावरण, महसूल आणि सामाजिक न्याय या प्रमुख विभागांमध्ये व्यापक बदलांना मंजुरी देण्यात आली. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल १,२३४ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना पाणीपुरवठा होणार असून ९,६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादन वाढीस…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी दुरुस्तीसाठीची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून आता महिलांना ३० एप्रिलपर्यंत आवश्यक कागदपत्रे व माहिती दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली. यापूर्वी या प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च होती. मात्र अनेक महिलांकडून तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात झालेल्या चर्चेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात मोठा गौप्यस्फोट करत, अजित पवार यांच्याशी विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदे म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. मात्र त्यावेळी अजित पवार गटातील काही पदाधिकारी अशा चर्चेला नकार देत होते. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या विषयावर बोलणे टाळले. पण उशिरा का होईना, आता त्यांनीही सत्य मान्य केले आहे.” तसेच या चर्चेत नेमके…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत असतानाच आज न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलिस कोठडी संपत आल्याने विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देत तपासाला वेगळे वळण दिले आहे. अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत असून या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एसआयटीचे…

