लातूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा परिसर मध्ये घडलेली धक्कादायक घटना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करते आहे. भरदिवसा काही अज्ञात हल्लेखोरांनी स्पोर्ट्स कार्ड खेळणाऱ्या एका क्लबमध्ये अचानक धडक देत दहशत माजवली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या हातात बंदुका, तलवारी यांसारखी घातक शस्त्रे होती. क्लबमध्ये घुसल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांवर हल्ला केला आणि दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबारही केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे क्लबमधील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला, अनेक जण जीव वाचवण्यासाठी पळापळ करत होते. या हल्ल्यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून काही…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय मंडळींच्या अशोक खरातशी झालेल्या फोन व्यवहाराचा धक्कादायक खुलासा केला आहे. दमानियाने सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातशी तब्बल 17 वेळा फोनवर संवाद साधला आहे. त्यापैकी 10 कॉल्स इनकमिंग आणि 7 कॉल्स आऊटगोईंग होते, तर एकदा दोघांमध्ये तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले. त्याचबरोबर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातला तब्बल 177 कॉल्स केले आहेत. त्यांच्या भगिनी तृप्ती चाकणकर यांनीही 236 कॉल्स केले होते, तर माजी मंत्री दीपक केसरकरांचे विश्वासू दीपक लोंढे यांनी 189 कॉल्स केले आणि 30,579 सेकंदाचे संभाषण साधले. दमानिया यांनी सांगितले…
चाळीसगाव : प्रतिनिधी दुचाकीने जात असलेल्या विद्यार्थीनीच्या दुचाकीला डंपरने जोरात धडक दिली. वाळूने भरलेल्या या अपघातात दुचाकीस्वार चंचल नामदेव लांडगे (वय १९) या डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथे राहणारी चंचल लांडगे ही डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ती तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी हीच्यासोबत दुचाकीने दसेगाव फाट्याजवळून जात होती. यावेळी भरधाव वेगाने वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील ईच्छादेवी मंदिराशेजारी फुकटपुरा भागातील पार्टीशनच्या घरांना आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करीत आजूबाजूची तीन घरे आपल्या विळख्यात घेतली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, मनपाच्या अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ईच्छादेवी मंदिराशेजारी असलेल्या झोपपट्टी परिसरात भंगार व्यावसायीक आरिफ शेख हे घरात झोपलेले असतांना अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यांना आग लागल्याचे समजताच त्यांनी घराबाहेर पडले. दरम्यान, काही वेळातच आगीने त्यांच्या शेजारी राहणारे रफिक शेख व गंगाबाई मरसाळे यांची…
जळगाव : प्रतिनिधी दीर्घकाळाच्या ओळखीचा आणि एकाच गावचा असल्याचा गैरफायदा घेत एका कारागिराने सुवर्ण व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक अडचणीचे कारण सांगून घेतलेले २९६ ग्रॅम सोने परत न करता तब्बल ९ लाख ३३ हजार २०८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सोनू डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ओमप्रकाश सोनी (वय ४९, रा. रोहित अपार्टमेंट, भिकमचंद जैननगर) यांचे बालाजी पेठेत ‘ओम ज्वेलर्स’ नावाचे सराफा दुकान आहे. आरोपी सोनू वैष्णव (रा. लक्ष्मीनगर, जळगाव) हा त्यांचा समव्यावसायिक असून दोघांमध्ये मागील २०-२५ वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. विशेष म्हणजे, दोघेही राजस्थानमधील एकाच गावाजवळील असल्याने त्यांच्यात विश्वासाचे नाते होते.…
आजचे राशिभविष्य दि.३ एप्रिल २०२६ मेष राशी करिअरच्या बाबतीत, तुम्ही मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारू शकता. तरीही, तुम्ही त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ आज मिळेल; त्यांना त्यांच्या बहुप्रतिक्षित परीक्षेत यश मिळेल. महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या भविष्यातील योजनांबाबत शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचा विचार बदलू शकतो. तुम्ही काही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता. वृषभ राशी तुमचे कौटुंबिक जीवन उत्साहाने भरलेले असेल. संगणक दुकाने चालवणाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल. तुम्हाला एका मोठ्या कंपनीकडून चांगली ऑर्डर मिळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेसाठी पुरस्कार मिळू शकतात. शेजारी तुम्हाला शुभ कार्यांमध्ये मदत करू शकतात.…
जळगाव, दि.2 एप्रिल – जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या केळी बागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या क्षेत्रभेटीद्वारे केळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयोग तसेच कापणीपश्चात व्यवस्थापनाची प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केळी लागवडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मल्चिंग, गादीवाफा (Raised Bed) पद्धत, योग्य लागवड अंतर, तसेच दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन मिळण्यासाठी वापरले जाणारे ‘बड इंजेक्शन’ तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती घेतली. आधुनिक मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढविणे, पाण्याचा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी आणि डेटा पडताळणीनंतर सुमारे 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांच्या खात्यात गेल्या 20 महिन्यांत अंदाजे 21 हजार 300 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सुरुवातीला 2 कोटी 62 लाख अर्ज प्राप्त झाले होते. ‘अर्ज भरा आणि लाभ मिळवा’ या धोरणामुळे लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 47 लाखांपर्यंत वाढली होती. मात्र, पडताळणीदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या. चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे, उत्पन्न…
जालना : वृत्तसंस्था जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 ते 6 जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृतकांमध्ये सर्व महिला असल्याचे समजते. अपघाताची जागा जालन्यातील कडवंची शिवारात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक महिला कामगार होत्या, त्या भालगाव तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील होत्या. समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते, तेव्हा महिला कामगार पिकअप व्हॅनमध्ये आल्या होत्या. जामवाडी शिवारात पिकअप व्हॅन थांबली असताना नागपूरहून येणाऱ्या भरधाव ट्रकने या पिकअपला धडक दिली. धडक…
मुंबई : वृत्तसंस्था राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीबाबत मोठी चर्चा उभी राहिली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रात फक्त दोन पदांचे स्पष्ट उल्लेख करण्यात आले असून, इतर नेत्यांचे पदनाम अस्पष्ट राहिले आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या या पत्रानुसार, सुनेत्रा पवार यांचा ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ आणि शिवाजीराव गर्जे यांचा ‘खजिनदार’ असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, पक्षाच्या आणखी १२ पदाधिकाऱ्यांच्या नावांसमोर कोणतेही पद दिलेले नाही. यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा समावेश असून, या दोघांच्या पदनामाचा उल्लेखही वगळण्यात आलेला आहे. राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांचे हे पत्र मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे, कारण मागील कार्यकाळात…

