पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विठ्ठलाच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्याच्या दौंड येथे घडली आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांत एकच खळबळ माजली आहे. आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. यात लहान – थोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. सर्वांना विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यातच दौंड येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही संतापजनक घटना घडली आहे. मजल दरमजल करत…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सरकारने हिंदीची सक्ती रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद झाल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील गावागावात व कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा बुलंद झाला आहे. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला नसता तर 5 जुलैच्या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते पक्षभेद विसरून सहभागी झाले असते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारने शिक्षण विषयात अर्थतज्ज्ञांची समिती नियुक्त केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे आज विधानभवनात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात व कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. हा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. त्यांची या पदासाठी निवड…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला हिंदी सक्तीबाबतचे दोन जीआर रद्द करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानले. पण मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलै रोजी विजयी मेळावा होईल. त्यासाठी ठिकाण एकत्र मिळवून ठरवू. पण याला पक्षीय लेबल लावले जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी सोमवारी (दि. ३० जून) स्पष्ट केले. सर्व बाजूने तो रेटा आला. गरज नसताना विषय आले. त्याबाबत मराठी जनांचे, साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी पत्रकार आणि संपादकांचे आभार. हिंदीचा विषय श्रेयवादाचा नाही. सरकार पुन्हा या वाटेला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. मराठीच्या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षेपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सरकार अपयशी ठरले असून, हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले आहे. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकतो, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, हिंदी सक्ती, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, आता मात्र समित्या बसवून वेळकाढूपणा सुरू आहे. ज्याच्या श्रमावर आपण पोट भरतो, त्या बळीराजालाच सरकारचे लोक ‘तुला…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत आहे. मात्र, यामध्ये पावसाचा मार खाल्लेल्या टोमॅटोचे प्रमाण जवळपास निम्म्यावर पोहचले आहे. पावसाच्या तडाख्याने दर्जात घसरण झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कोसळले आहेत. मध्यंतरीच्या काळात बाजारात बंगळुरूचा टोमॅटो दाखल होत होता. मात्र, तेथील स्थानिक बाजारपेठांमध्येही टोमॅटोचे दर वाढल्याने तेथील व्यापार्यांनी पुण्यातील बाजारपेठेकडे टोमॅटो पाठविण्यास बंद केल्याचे निरीक्षणही व्यापारीवर्गाकडून नोंदविण्यात आले.स्थानिक गवारीचा हंगाम संपल्याने बाजारात गवारीची आवक घटली आहे. याखेरीज, स्थानिक कोबी व फ्लॉवरच्या दर्जात घसरण झाली आहे. परराज्यातून…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी वाहनात भरून ठेवलेल्या चार लाख दोन हजार ७५ रुपये किमतीच्या सिगारेट चोरट्यांनी लांबविल्या. हा प्रकार २७जून रोजी रात्री ते २८ जून सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, नवीपेठ परिसरात चंद्रशेखर जवरीलाल राका (५०, रा. नवीपेठ) यांचे सी. जे. ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. दिवसभरात जिल्हाभरातून आलेल्या ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे सायंकाळी गाडीत माल भरून हे वाहन गोविंदा रिक्षा थांब्याजवळ उभे केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑर्डरप्रमाणे सिगारेट…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील बामनोद येथे कामानिमित्त आलेले तिघे मित्र हे जळगाव कडे परत जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांना वळण रस्त्यावर जोरदार धडक दिल्याने यामध्ये दुचाकी वरील जळगाव चा तरुण जागीच ठार झाला असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर घडली. मयूर अण्णा गवळी असे जागीच मयत तरुणाचे नाव असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ गुळाची ‘महाबासुंदी’ नावाने चहा विक्रीचा व्यवसाय करणारे मयूर अण्णा गवळी…
जळगाव : प्रतिनिधी नाशिक येथे कामासाठी गेलेल्या जळगावच्या मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी परस्पर लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर लग्नासाठी दिलेले पैसे व सोने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सचिन अडकमोल, मनीषा जैन आणि सुजाता (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. जळगाव या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्न झाले तेव्हा ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समजते. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या त्यांच्या ४१ वर्षीय भावाची मुलगी जानेवारी २०२५पासून नाशिक येथे मैत्रिणींसोबत कामासाठी गेली होती. मे २०२५मध्ये मुलीच्या भावाला सचिन अडकमोल…
मेष : स्वतःशी एक खोल नाते आहे, स्वतःला स्वावलंबी बनवून तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा. वृषभ : तुमच्या मेहनती आणि अपेक्षांनुसार तुम्हाला निकाल मिळत आहेत. तुमच्या आळशीपणामुळे गोष्टी बिघडू देऊ नका. तरीही, तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा किंवा नकारात्मकता निर्माण करणाऱ्या लोकांशी अंतर ठेवणे आवश्यक असेल. मिथुन : कामाशी संबंधित कोणतीही महत्त्वाची गोष्ट तुम्ही ठरवू शकता, ज्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करण्यास तयार आहात. तुमच्या भावनिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवल्याने तुम्ही योग्य निर्णय देखील घेऊ शकता. कर्क : तुम्ही जुन्या गोष्टी मागे सोडून…

