मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केलेली मागणी चर्चेत आली आहे. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू झाल्यास त्यांच्य कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जातात, मात्र ही मदत वाढवून द्यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते आहे. पण ही मदत वाढवून १० लाखांची करावी. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अनेक योजना सुरु करीत असतांना आता देशातील पहिल्यांदाच नोकरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या लाखो तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन’ (Employment Linked Incentive – ELI) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, पहिली नोकरी मिळवणाऱ्या पात्र तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. या योजनेचा उद्देश केवळ तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे नाही, तर संघटित क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या वाढवणे हा देखील आहे. रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना (ELI – Employment Linked Incentive Scheme) ही केंद्र सरकारच्या त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे,…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील विविध प्रश्नांमुळे गाजत आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केला होता. तर मुंडे यांचे आरोपीसोबत फोटो समोर आले होते. यानंतर काल धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या बाहेर या प्रकरणावर आपली प्रतक्रिया दिली होती. आता या प्रकरणी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रश्न विचारले आहे. धनंजय मुंडेंनी याप्रकरणाची चौकशी विशेष चौकशी समितीतर्फे केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात तृतीय भाषा म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. यातच 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वतीने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. स्वतःच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा? अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. ठाकरे बंधूंनी भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध…
भडगाव : प्रतिनिधी शहरातील पाचोरा चौफुलीजवळ सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी विचारणा केली असता त्या तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ. ज्ञानेश्वर नाना पाटील (४५) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र रमेश खैरे (३६), विक्की रमेश सोनवणे (२८), प्रतीक मार्तड सोनवणे (१९, तिन्ही यशवंत नगर, भडगाव) यांनी पोहेकॉ. विजय जाधव व पोना, मंगलसिंग गायकवाड यांच्यासह ज्ञानेश्वर पाटील हे गस्त घालत असताना हे तिघेही पाचोरा चौफुलीजवळ आढळून आले. शांततेच्या भंग करत असल्याबद्दल त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून मारहाण केली.
अमळनेर : प्रतिनिधी गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी कारवाई करत देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक केली आहे. पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, गांधलीपुरा परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर १ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली खासगी वाहनातून येऊन छापा टाकण्यात आला. वेगवेगळ्या घरांमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय उघड झाला. डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड,…
जळगाव : प्रतिनिधी साफसफाई करण्याच्या कारणावरून तीन जणांनी शरीफ खान सिकंदर खान (रा. सालार नगर) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तर एका जणाने डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेला खान यांनी दमदाटी केली. ही घटना ३० जून रोजी सेंट जोसेफ शाळेसमोर घडली आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, साफसफाई करण्याच्या कारणावरून ३० जून रोजी तेथेच काम करणाऱ्या कोकिळा गोविंद साळी यांच्याशी वाद झाला. त्यावरून सदर महिला, तिचा मुलगा व अन्य एका जणाने खान यांना शिवीगाळ व दमदाटी केली. महिलेच्या मुलाने डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. याप्रकरणी…
जळगाव : प्रतिनिधी नऊ गंभीर गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (२६, रा. गणेशवाडी) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई करीत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० जून रोजी दिले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सचिन चौधरी याच्यावर नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरी देखील सुधारणा न झाल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला होता
जळगाव : प्रतिनिधी बसस्थानक परिसरातून मोबाइल लांबविणाऱ्या शेख इम्रान शेख गुफरान (रा. गुलशननगर मालेगाव) याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाइल हस्तगत करण्यात आले. त्याचा मालेगाव येथील साथीदार सोनू हा पळून गेला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नवीन बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या मोबाइलचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पोहेकॉ नरेश सोनवणे, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, पोकों राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर यांना दिल्या होत्या. पोलिसांचे पथक बसस्थानक परिसरात गेले असता दोन संशयितांनी पोलिसांना पाहून पळ काढला. रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शेख इम्रान शेख गुफरान याला पकडले. चोरट्याकडे सापडलेल्या चार मोबाइलबाबत त्यास विचारपूस…
मेष : दिवस सामान्य राहील. वादात अडकू शकता. अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. हवामानामुळे आरोग्य बिघडल्यासारखे वाटेल. वृषभ: दिवस चांगला जाणार आहे. आत सकारात्मक ऊर्जा काम करताना दिसेल. नकारात्मक विचार टाळा. आज नवीन काम सुरू करणे चांगले असेल, परंतु कामाचे रहस्य कोणाशीही शेअर करू नका. मिथुन: दिवस खूप चांगला जाणार आहे. तुमचे मन आनंदी दिसेल. काही जुने प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. नोकरी वर्गातील लोकांना विशेष पदोन्नती मिळू शकते. कर्क: दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. कर्ज फेडण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात, ज्यामुळे तुमचा…

