मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूनी अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात रान उठवलं होतं. त्यांचा कडाडून विरोध पाहता तसेच राज्यभरातूनही वाढता विरोध लक्षात घेतला सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता ५ जुलै रोजी ठाकरे बंधू विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. वरळीतील डोम सभागृहात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे, तर राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. जेव्हा मुंबईतील सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना मांस…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जमदाडे नाल्याजवळ गुरुवारी दुपारी भरधाव स्कूल बसने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करुन ही नोंद पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील किशोर रघुनाथ पवार (वय ४६) असे अपघातात मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. दरम्यान, ३ जुलैला दुपारी ४ वाजेच्या सुमारास किशोर पवार हे दुचाकीने घरी जात होते. याच वेळी जमदाडे पुलावर समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या स्कूल बसने किशोर पवार यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात किशोर पवार यांच्या डोक्यास…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मोहननगर येथील २९ वर्षीय तरुण व्यावसायिक विनय अशोक देशमुख याने नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दिवसभर शोधकार्य सुरू राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सविस्तर वृत्त असे कि, विनय देशमुख यांचे शहरात झेरॉक्सचे दुकान होते. तर त्याचे वडील अडावद येथील जि.प. शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. काही दिवसांपासून विनय नैराश्यात होता. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला असेल असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, तो दुकानावर पोहोचला नसल्याचे लक्षात आले. दिवसभर शोध मोहीम सुरू होती, मात्र विनयचा शोध लागला नव्हता. अखेर, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावात तरंगताना…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महात्मा गांधी मार्केटमध्ये आपल्या दुकानावर कामासाठी दुचाकीवर येत असलेल्या भादली येथील तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने, तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता आसोदा रस्त्यावर घडली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, कार चालकाने मयत मोहम्मद इब्राहीम खाटीक (वय ३८, रा.भादली, ता.जळगाव) यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने धडक दिल्याचा आरोप करत, हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप मोहम्मद खाटीकच्या नातेवाईकांनी केला. मोहम्मदला जीवे मारण्यासाठीच हा अपघात केला असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला, जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही,…
जळगाव : प्रतिनिधी सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीला तब्बल १२ लाख रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना २ जुलै रोजी समोर आली आहे. टेलिग्रामवर सोप्या टास्कच्या नावाखाली सुरुवातीला नफा दाखवून नंतर चुकीच्या टास्कचे कारण देत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील एका तरूणाने फिर्याद दिली आहे. १६ ते २२ जून या कालावधीत ही घटना घडली. त्याच्या टेलीग्राम आयडीवर एका व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या धारकाने संपर्क साधला. या सायबर गुन्हेगारांनी त्याला ‘गुगल कॉईन्स ग्रुप’ आणि त्यानंतर ‘गुगल व्हिआयपी ग्रुप’ या टेलीग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपमध्ये त्याला ऑनलाइन टास्क पूर्ण…
भुसावळ : प्रतिनिधी वलसाड गुजरात येथून खून करून फरार होत असलेल्या दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, अभिषेककुमार अर्जुन ठाकूर (२१, रा. नवडीहा गोंडा, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे व दुसरा संशयित अल्पवयीन आहे. रेल्वे प्रशासनातर्फे आरोपींना पकडण्यासाठी ऑपरेशन रेल प्रहरी राबविले जाते. त्यात मिळालेल्या माहितीवरुन वलसाड (गुजरात) येथून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना गाडी क्रमांक २२९१४ त्यातून भुसावळ रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वरून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध डोंगरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे सुरक्षा…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा येथील मोर नदीच्या पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी दुपारी मालवाहू ट्रक घसरून सरळ छोट्या पुलाजवळील नाल्यात जाऊन अडकली. या अपघातात ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या पुलाजवळ अथवा पिंपरूळ रोड ते आमोदादरम्यानच्या रस्त्यावर सुरू असलेली अपघातांची मालिका केव्हा खंडित होईल, याबाबत आता वाहनधारकही चिंतेत पडले आहेत. गुरुवारी दुपारी मालवाहू ट्रक (आर. जे. ११/ जी. सी. ८२३३) भुसावळकडून फैजपूर कडे जात होती. अपघातांचे क्षेत्र असणाऱ्या या वळणावर गाडी घसरत छोट्या पुलाजवळील नाल्यात गेली. यामध्ये ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. कालच या रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकले. काही नागरिकांचे म्हणणे होते की, काही…
मेष : दिवस समस्यांनी भरलेला असेल. काही कामाची चिंता असेल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. जोडीदाराशी सावधगिरी बाळगा, अन्यथा व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ : जर नवीन काम सुरू करायचे असेल तर ते करू शकता. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या भागीदारीमुळे तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळेल. आरोग्य चांगले राहील, वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळू शकतात. मिथुन : काही कामासाठी बाहेर प्रवास करू शकता. प्रवासादरम्यान तुमच्या सामानाची काळजी घ्या. आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकतात. कुटुंब हंगामी आजारांच्या विळख्यात येऊ शकता. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबात भांडण होऊ शकते. कर्क : कुटुंबाबाबत कुटुंबात मोठा निर्णय घेऊ…
जळगाव मिरर | ३ जुलै २०२५ चोपडा धरणगाव रस्त्याचे कोट्यावधी रुपयांचे काम सुरू आहे. दळणवळणाची साधने वाढवावी तसेच नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने रस्त्यांचे जाळे विणायला सुरुवात केली आहे अत्यंत पारदर्शक पणे काम व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत परंतु कुंपणच शेत खात आहे असा प्रकार मस्तवाल ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना खिशात ठेवून सुरू आहे. चोपडा धरणगाव रस्त्यासाठी निविदामध्ये ज्या पद्धतीने अटी शर्ती आहे त्या अटी शर्तींच्याद्वारे कुठलीही काम सुरू नाही अक्षरशः शेतकऱ्यांच्या बांधावरील काळी माती काढून रस्त्यावर टाकली जात आहे काही शेतकरी बोलायला गेले तर त्यांच्यावर दादागिरी ची भाषा वापरली जाते मस्तवाल ठेकेदाराचे आणि पराक्रम पुढे येत असून त्या ठेकेदाराचे बगलबच्चे मात्र…
मुंबई : वृत्तसंस्था सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा…

