यावल : प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावरील मोर नदीच्या पुलाजवळ रविवारी सकाळी एक खाजगी लक्झरी बस गणेश ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी.३०.९००९ पलटी होऊन भीषण अपघात घडला. ही बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना सकाळी सुमारे १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती असून २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. सविस्तर वृत्त असे कि, बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना हा अपघात घडला आहे. जखमींना तात्काळ फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले, मात्र बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. अंत्यसंस्कारासाठी घरी सर्व नातेवाईक आले आणि रडारड सुरू झाली. मात्र, ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली, ते रघुनाथ वामन खैरनार (६५, रा. पाळधी, ता. धरणगाव) हे साक्षात घरी परतले. यामुळे कुटुंबीय, नातेवाईक थक्क झाले आणि हा नेमका काय चमत्कार आहे, या विचारात पडले. प्रत्यक्षात ज्या मृतदेहाची ओळख पटविली, तो दुसऱ्याचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि तो पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परत नेण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे घरी कोणाला काहीही न सांगता गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा येथील मोर नदी पुलाजवळील अपघातांच्या मालिकेने आता वाहनधारक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी पुन्हा दोन अपघात झाले. त्यात दोन वाहने समोरासमोर धडकली तर एक ट्रक सरळ शेतात जाऊन फसला. दुपारी ३ वाजता झालेल्या पावसानंतर हे अपघात घडले. गेल्या तीन दिवसांतील हा पाचवा अपघात आहेत. दोन महिन्यातील जवळपास ३० वा अपघात आहे. पहिल्या अपघातात, यूपी. ८३ सीटी. ८३१२ क्रमांकाचे मालवाहू वाहन भुसावळहून फैजपूरकडे जात होते. त्याचवेळीलहान मालवाहू वाहन फैजपूरहून भुसावळकडे निघाले होते. ही मोर नदी पुलाजवळ समोरासमोर येऊन धडकले. या धडकेत चालक किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर मोठे वाहन रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक…
पाचोरा : प्रतिनिधी बसस्थानकावर शुक्रवारी खून झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वीच दोन्ही संशयितांवर पिस्तूल रोखले होते. त्याचा बदला म्हणून या दोघांनी गोळी झाडून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे दोन्ही संशयितांना पिस्तूल पुरविणाऱ्याही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत आकाश कैलास मोरे (२६) याचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे (२७) आणि एक अल्पवयीन असे दोनजण जामनेर पोलिसांना शरण आले होते. त्यांना पिस्तूल पुरविणारा शरद युवराज पाटील…
जळगाव : प्रतिनिधी परिवहन महामंडळातील महिलेचे सेवापुस्तक भरण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार वर्षभरापासून सुरू होता. याप्रकरणी वरिष्ठ लिपिक रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, परिवहन महामंडळामध्ये २००८ पासून एक महिला कार्यरत असून, त्याच ठिकाणी जुलै २०२४ पासून रामलाल पवार हा वरिष्ठ लिपिक म्हणून कामाला आहे. सुरुवातीला त्याने महिलेच्या मोबाइलवर असभ्य भाषेत मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेवापुस्तिका भरण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही कोणतेही अडकलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. चांगल्या परिणामासाठी तुम्ही एक छोटासा सकारात्मक बदल करण्याचा विचार कराल. तुमच्या विनम्र स्वभावामुळे समाजात आणि नातेवाईकांमध्ये योग्य स्थान टिकून राहील. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत अचानक एखादा मुद्दा उद्भवू शकतो. हे प्रकरण शांततेने मिटवा. तुमच्या कामांची आणि योजनांची कोणाशीही चर्चा करू नका. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील कामांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण सुखद राहील. तुमची दिनचर्या संयमित ठेवा. वृषभ राशी जुन्या चुकांमधून धडा घ्या आणि आज चांगल्या धोरणांचा विचार करा. आज तुम्हालाही यश मिळू शकते. घराच्या नूतनीकरणाची आणि सजावटीची रूपरेषा देखील तयार होऊ शकते. कधीकधी कोणत्याही कामात अपेक्षित…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, आज बऱ्याच वर्षांनंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचाईत अशी आहे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक बँकांना चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. या विनंतीनंतर निहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली. अमेरिकन न्याय विभागाने अटकेची पुष्टी केली आहे. न्यूयॉर्कमध्येही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. निहालवर २.६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आता निहालचे भारतात प्रत्यार्पण केले जाईल. निहाल मोदीला १७ जुलै रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या जामीनाला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. निहालवर पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित १३,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप…
राज ठाकरेंच्या विधानानंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान ! पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्याचा जीआर रद्द केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संयुक्त विजयी मेळावा आज (दि.५) वरळी येथील एनएससीआय डोम येथे झाला. या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुमारे २० वर्षांनी उद्धव आणि मी एकत्र येत आहे. आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, जे इतर कोणालाही जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चिमटा काढला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, राज ठाकरेंचे आभार…

